माझ्या नागपुरात कोणी जर विचारलं कि "चालेल का?" कुठल्याही बाबतीत तर नेहेमी / बहुतांशी उत्तर येते कि "धावेल हो". इतक्या वर्षांनी देखील मी तीच सौंज्ञा सातत्याने वापरते आणि ज्यांना ठाऊक नाही त्यांना ह्याचा प्रचार प्रसार पण करते. माझ्या नागपूरचे नाव उंच ठेवण्याची जबाबदारी माझी आहे ना, म्हणून.
आज सीझन १६ आणि एपिसोड १५ मध्ये श्री श्री अमिताभ बच्चनजींनी पण ह्याच संदर्भात सुतवाच्या केलं. आयुष्यात देखील आपण चालत नाही पळतो, सातत्याने. तेव्हा मला माझ्या नागपूरच्या सवयीची आठवण झाली आणि ते कित्ती अत्यावश्यक होतं आणि आहे हे समजलं / उमगलं. धन्यवाद KBC च्या लेखकांना. मी नकळत पळत होते, पळेल / धावेल हे सहजी वापरत होते पण आज त्याचं फक्त महत्व नाही पटलं तर कित्ती पळू शकले हे आठवलं. त्याची माझ्या वर कित्ती पराकोटीची कृपा आहे हे पुन्हा एकदा प्रकर्षाने. ह्या पुढे पण मला खात्री आहे कि तो मला धावण्याला मदत करणारच. प्रत्येक जण आपआपल्या चालीने / सवयीप्रमाणे / क्षमते नुसार च धावतो / धावू शकतो. किंबहुना धावायला पाहिजे. कोणाशी कोणाची कधीही यत्किंचितही तुलना होऊच शकत नाही धावतांना. किती धावायचं हे सुद्धा प्रत्येक डोई बदलतं.
पुन्हा एकदा मी माझ्या नागपूरच्या, त्याच्या पद्धतीच्या आणि मी जे त्याच्याकडून शिकले त्याच्या प्रेमात पडले. अहाहा च.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा