बुधवार, २८ फेब्रुवारी, २०२४

१०८



आपल्या भारतीय संस्कृतीत १०८ ह्या संख्येला एक अनन्य साधारण महत्व आहे. जगमान्य अशी हि संख्या आहे आणि १०८ वेळाच का जप करायचा ह्याची शास्त्रोक्त कारणे आहेत जी खालील लिंक वर उपलब्ध आहेत. माझ्या मते आणखीन एक महत्वाचे कारण असावे. रुद्राक्ष माळ वापरून, जमिनीवर किंवा पाटावर बसून जप केला जातो. रुद्राक्षाचे मणी एक विशिष्ट आकाराचे, प्रकारचे आणि खडबडीत पृष्ठभाग असलेले असे असतात. प्रत्येकाच्या गती प्रमाणे, हाती असलेल्या उपलब्ध वेळेनुसार १०८ माळ करायला वेळ लागू शकतो. पण साधारणतः ७ मिनिटे अंदाजे लागतात, श्री राम नामाची माळ करायला. मोठ्याने राम नाम म्हटल्याने घरी, दारी, आणि सर्वत्र ती कंपने सर्वांपर्यंत पोचतात, उपयुक्त ठरतात, जो करतो त्याला आणि इतरांना सुद्धा. मनात म्हटलं तरी त्याची प्रचिती वेगळी येतेच. शिवाय जप माळ धरून किंवा न धरता सुद्धा जप करता येतोच. जप माळेने ऍक्युप्रेशर सहज घडते आणि ७ मिनिटे दररोज हे एकंदरीत आरोग्याला लाभदायक असे सिद्ध झाले आहे. माळ न धरता अगदी सहज आणि सुलभ पद्धतीने जर एक माळ राम नाम जपायचे असेल तर श्री रामाची आरती म्हणा किंवा फक्त श्रवण करा. माझ्या निरीक्षणानुसार ह्या आरतीत मुख्य गायकाने शेवटी राम नाम जपले आहे समूह सोबत आणि संपूर्ण आरतीत फक्त समूहाच्या सुमधुर स्वरात राम नाम पेरले आहे. समूहाची संख्या अगदी मोजमाप करून घेतल्यासारखी आहे, किंवा ते आपोआप घडले असेल श्रींच्या इच्छेने. एक संपूर्ण माळेची सहज श्रवण भक्ती होते हि आरती ऐकल्याने. एकंदरीत राम नाम म्हण्याऱ्यांची कोरस संख्या मला ठाऊक नाही, पण निश्चित खात्री पटली आहे रोज भक्तिभावे श्रवण करून हि १०८ आहे. ह्या पेक्षा आणखीन सोप्पं काय करावं त्याने आपल्या सर्वांसाठी. आता मला हि आरती इतकी सफल का झाली हे उमगलं, समजलं आणि अर्थबोध झाला. क्या बात है. जय श्री राम. तो कित्ती सहजतेने घडवून आणतो सगळे, कमाल आहे. 


कोरस ने म्हटलेले, मुख्य गायकाच्या स्वरात आणि शिवाय वाद्यांचे बोल ह्या समीकरणाने एकत्रित उभे केलेले १०८ नाम:

नादातून या नाद निर्मितो श्री राम जय राम जय जय राम |


https://www.youtube.com/watch?v=BK8dDitz8Pk&t=142s

https://servdharm.com/blogs/post/why-we-chant-mantras-108-times

मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०२४

The other side of the coin

Being a free bird now, I recently went and attended one of the weddings of my best friend's twins. Barring the very few known people around, I met and mingled with a new group of girls there. The span of that marriage was for a week, but I could attend only a few functions. The group of girls were there throughout for the entire span, being localities and with each other for their whole lives. I was an outsider, a great listener and observer, and my sole agenda was to enjoy marriage events, new trends, food, decor, and many other things.


Unexpectedly, a new topic popped up in front of me, and being a complete newbie to that group, I just silently absorbed whatever was possible. To cut a long story short, the group was discussing "I am jealous of his cigarettes". Middle-aged girls talking about this was new and news to me for sure.


According to them, they were focusing on the other side, the girl's side, and not the boy's view, as mentioned in the same-titled song. Till then, I was not even aware that such a song existed. The song was narrated and sung by a boy, it seems. These girls were focusing on she the cigarette spending more time with him, on his lips, so close, and during that short duration of her life or puffs, they remain with each other only for multiple times a day. I was glad to then read the original lyrics, and I am still trying to digest the ultimate truth spelled out by the entire group, as if they agreed to it together. I am truly speechless, indeed.

 

I wish to extend the same feeling based on multiple write-ups about other non-living things too, including mobile phones, computer systems, and many more.

एक नियम


एखाद्याला सकाळी किंवा पहाटे जाग आली, त्याची झोप झाली निवांत ह्याचा अर्थ सगळ्याच प्राणिमात्रांची झाली असे होते का? तर स्पष्ट नाही. मग जर बाकीचे काही कारणास्तव अजून झोपले असतील तर त्यांना आवाज करून त्रास द्यायचा अधिकार कोणी दिला? कोणी रात्री जागं राहून अभ्यास करतं, काम करतं, बाळांना, आजी आजोबांना कदाचित अजून थोडसं निजावंस वाटत, कोणालाही. तेव्हा आजूबाजूचा अंदाज घ्या आणि शांततेत स्वतःची कामे करा हा अलिखित नियम आहे जो सर्वांनी पाळलाच पाहिजे, नेहेमी. मग ते कोणीही असो. एक छोटेसे उदाहरण देते, मी माझ्या मुलांना लहान असतांनाच हे सांगितले होते आणि ते अजून देखील हे कटाक्षाने पाळतात. रात्री अपरात्री जर गॅस वर काही करून घ्यायचे असेल, कॉफी किंवा मॅग्गी असे तर लायटर च्या ऐवजी काडेपेटी वापर म्हणजे दुसऱ्याला, खालच्या वरच्याला अजिबात त्रास होत नाही, त्याची झोप चालवत नाही, चिडचिड होत नाही आणि शिवाय तुमचे काम होते. 


अगदी तसेच काहीसे आताशा मी टिपते आहे. पहाटे किंवा अगदी सकाळी लवकर काही मिनिटे हि कावळ्यांची असतात, मग पोपट आणि त्या नंतरचा वेळ हा बाकी पक्षांचा. पोपट वावरत असतात आणि गुणगुणत देखील पण सकाळचा तो स्लॉट / ठराविक वेळ हि मात्र कावळ्यांचीच. उजाडलं पण नसतं नीटसं आणि ह्यांची तारसप्तकात काव काव सुरु होते. काय म्हणणं असतं त्यांचं कुणास ठाऊक. बरं त्यांना माणसांची  इतकी हालचाल नाही दिसतं त्यावेळी, बाकी पक्षी देखील अजून साखर झोपेत असतात आणि हे मात्र सुरु करतात दररोज न चुकता. करा कि राव आप आपली कामे शांतपणे. धीम्या आवाजात कोकला, एक मेकांना इशारे करा, माहिती द्या, कोण नाही म्हणतंय, पण एकसंघ असल्यासारखे सगळेच सुरु झाले कि नैसर्गिक गजर होतो. ते काही अंशी ठीक आहे म्हणावं, पण कधी कधी नको वाटतं. सगळेच पक्षी हुषार असतात, नैसर्गिक सेन्सर्स त्यांना बहाल झाले असतात, मग त्याचा सदुपयोग करावा ना. "वसुधैव कुटुंबकम" म्हणायचं आणि दररोज त्रास द्यायचा हे कुठले समीकरण. उठल्यावर अगदी आवश्यक तेवढाच आवाज करतं हवं ते खा, व्यायाम करा, उडा, शाळेत जा, मदत करा जेष्ठांना, पिल्लांना खाऊ घाला. असो. आता मला त्यांची रोजनिशी पाठ झाली आहे त्यामुळे मीच आळस झटकून त्यांच्या सोबत कामाला लागायला हवं लगबगीने दररोज. दोघे एकत्र लागू या कामाला उद्यापासून. 

तेथे कर माझे जुळती - २


संपूर्ण १०+ वर्षे मला आठवतंय त्या प्रमाणे न चुकता उगवत्या सूर्याशी हितगुज होत असे, दररोज. हितगुज कसली, ती भरभरून दिलेली पावती आणि मनःपूर्वक जोडलेले हात होते खरं तर. शतशः धन्यवाद दिले गेले, माझ्या साठी, संपूर्ण सृष्टी साठी, सर्व सजीवांसाठी आणि असेच बरेच संवाद. मावळत्या सूर्याला मात्र कधी हात जोडले गेले नाहीत, कारण तेव्हा घरच्या कामात व्यग्र असायचे. सकाळी फार लवकर कचेरीत पोचण्याची अनेक वर्षांची सवय, त्यामुळे सहज घडलं ते माझ्या हातून. किंबहुना सुर्यबाप्पाची ऊर्जाच अशी होती कि मला अगदी वेळेत ओढून आणायचीच ऑफिसला रोज. मला नव्हे तर अखंड, न थकता, न थांबता, कोणाचीही वाट न पाहता, निरपेक्ष पद्धतीने सूर्यदेव सेवा देतात. कित्ती म्हणजे कित्ती शिकण्यासारखं आहे त्यांच्या कडून. हि जरी नैसर्गिक बाब असली, निसर्ग नियमानुसार सगळं होत असलं तरी प्रत्येकाने बोध घेण्यासारखंच आहे. अगदी सहज माझे हात विनम्रपणे जोडले गेले त्या मावळत्या सूर्यासमोर, त्याचं जगावेगळं अप्रतिम सौंदर्य न्याहाळत आणि मनात विचार आले, किंबहुना विनंती केली गेली कि "अशीच निरपेक्ष बुद्धी दे, अशीच ऊर्जा दुसऱ्यांना देण्याची शक्ती दे आणि असंच कार्यसातत्य घडू दे माझ्या हातून, प्रत्येकाकडून". आणि सहज श्री संत तुकारामांच्या ओळी आठवल्या:


बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥


ह्या प्रत्येक बाप्पासाठी, त्याच्या स्वरुपा साठी लागू आहेतच. 

शनिवार, २४ फेब्रुवारी, २०२४

तेथे कर माझे जुळती


मी तरी माझ्या लहापणी पासून, किंबहुना कळायला लागल्यापासून मोठ्यांना देऊळ दिसले कि नतमस्तक होतांना बघितले आहे. त्यांचे हात आपोआप जुळले जातातच. आणि अर्थातच तीच सवय मला देखील लागली. का असं करायचं हे कधीच मी कोणालाही विचारले नाही, अर्थात त्याची गरज पडलीच नाही. "तो सुख करता तो दुःख हरता" एकदा मनी ठसल्यावर मग मागे फिरणे नाहीच. विज्ञानाने देखील अनेक सिद्धांत मांडले आहेत ती देखील करणे आहेतच. 


अगदीच माहित नाही असं का झालं, पण घडलं खरं माझ्या हातून. आमच्या बाणेर रस्त्यावर एका ठिकाणी भव्य दिव्य अशी सन्मानीय श्री शिवाजी महाराजांची मूर्ती उंचावर स्थापन केली आहे. आणि अर्थात तिच्यावर काही अंशी सजावट किंवा देवळाला जसा कळस असतो तास आहे. पण दारं नाहीत. जाता येता महाराजांचं दर्शन सहज घडतं. इतक्यांदा मी त्यांच्या समोरून गेले पण अचानक माझे हात जोडले गेले अगदी मनापासून आणि मनात म्हटलं "शक्ती, बुद्धी आणि युक्ती दे", बहाल कर तुमच्या सारखी किंवा इतकी मोठी नाही पण सातत्याने हे महत्वाचे. इतकं वेगळं वाटलं माझं मलाच कि ते शब्दात पेरणे अशक्यच. 


नतमस्तक व्हा अगदी मोकळे पणाने, सर्वांसमोर जेव्हा मनापासून साद येते तेव्हा नक्की.  

Nailpaint

 Today, after using nail paint for ages, after applying it to many hands and decorating them, I came to know the truth—the hidden one. What is the sole reason, and how does the nail paint dry immediately or after a while after applying it to the nails? Is it because of the body's heat or warmth in the surroundings or air (either natural or artificial)? or might be because of all? According to me, it's the outcome of all the events or entities working out together unknowingly, without waiting for each other.

Similarly, when we work, at home or at the office, at college or any other place, what works for us—only inner strength or outer motivation, a suitable environment, or all together with varied percentages every time? Definitely an amalgamation of all. Every entity is important and plays a crucial role always. So don't wait for someone to come and pat your back; move on, always. And while on the path of upward or forward direction, make sure to pat the backs of all, encourage many, and keep working on multiplying your inner strength.

This way, like nailpaint, our own hands look fairer, beautiful, and a source of motivation, just like our personalities or happenings around us.

नख रंगकाम


आताशा अगदी प्रत्येक जण बहुतांशी आवडीने वैविध्य पद्धतीने नखं रंगकाम करतांना दिसतात, नजरेस पडतात. दिवसाला, कपड्याला, प्रसंगाला आणि अर्थात व्हायला साजेसं असं सगळं करतात अगदी शौक असल्यासारखे किंवा अत्यानंद झाल्यासारखे. सगळेच जण पार्लर मध्ये जाऊनच करतात असे नाही, बहुतांशी घरी पण हे सगळं पट्टाकिनी करण्यात आनंद मानतात. एक सांगा, नेल पेंट नखावर लावल्या लावल्या किंवा काही क्षणात कसा काय वळतो हो? तो फक्त शरीराच्या उष्णतेने वाळतो, का बाहेरील तापमानामुळे, का पंख्याच्या हवेमुळे? नक्की काय कारणं आहेत? का सगळे मिळून तो एक संघ असा परिणाम साधला जातो? मला विचाराल तर सर्वांमिळूनच परिणाम साधतो आणि खूप लवकर त्या नखांना शोभा येते, वेगळाच आत्मविश्वास वाढतो आणि आपलीच बोटे आपल्यालाच पुन्हा नव्याने सुंदर दिसू लागतात. माझ्या काही मैत्रिणींच्या मते तर आपलाच हात किंचित गोरा दिसतो आणि संभाळल्याचा मस्त भास होतो. जसे काही तो बोलतोय, संवाद साधतोय असा. 


अगदी तस्सेच काहीसे, आपण सर्व जी आव्हाने पेलत असतो, लहान-सहान, मोठी, त्या करता फक्त अंतर्गत शक्ती, स्फूर्ती, गर्मी कमी येत नाही तर तिच्या जोडीला वातावरण निर्मिती किंवा सहाय्यक वातावरण, आणि बाहेरील जोड महत्वाची आहे. अर्थात कोणीच फक्त बाहेरील किंवा जे आपल्या हातात नाही त्या करता थांबत नाहीच, किंवा बाहेरूनच कोणी प्रेरित केलं तरच गाडी पुढे जात नाही, तर आपण सातत्याने पुढे मार्ग क्रमण करत असतो. आपल्या सोबतच्या सर्वांना सातत्याने प्रेरित करत राहा आवर्जून किंवा आपल्या कृतीतून म्हणजे एकसंघ फारच सुंदर परिणाम साधता येतील. रंगछटा स्वतःला आणि बघणाऱ्याला देखील एक उत्कृष्ट उत्साह दिवून जाईल. आपला उत्साह टिकून राहील आणि बरेच काही. तर चला मग, लागा कामाला.

वरचा मजला शांत


त्या निसर्गाने मुलींना लांब, घनदाट आणि मोठे केस का अर्पण केलेत ह्याच गुपित आणि रहस्य मला समजलं, उमगलं काल, इतक्या वर्षांनी, दशकांनी सरतेशेवटी. माझ्या आई पासून मी न कळत निरीक्षण केलं आहे कि कमीतकमी दिवसातून दोनदा तरी त्या केसांवरून फणी फिरवली जातेच. काही जणी तीनदा फिरवायच्या एक चांगली सवय म्हणून ते रात्री झोपतांना, व्यवस्थित रक्त प्रवाह व्हावा, शांत झोप मिळावी हा त्याच्या मागचा उद्देश असावा कदाचित.  


पण दोनदा ह्या मागे फक्त व्यवस्थित दिसणंच नव्हतं तर त्या निमित्याने त्या टेकायच्या. सर्वत्र आणि सारख्या भागदौडीमधून काही क्षण काढता यायचे. व्यवस्थित बसून जर त्या केसांचा सांभाळ केला नाही तर अशक्य होतं त्यामुळे हक्काचे दोन वेळा बसने होतं होते. त्यावेळी बहुतांशी उभ्या उभ्या कसे तरी केस करण्याची पद्धत अंगिकारली नव्हती मुलींनी. कधी कधी मायलेकी, जावा जावा, शेजारणी बसून गप्पा पण होतं असतं. मी त्या वेळची गोष्ट सांगते आहे जेव्हा स्वतंत्र घरे होती, अंगण होते, आता नाही हे सगळं शक्य. एकतर मुली सगळ्याच घराची ओस ओलांडून घराबाहेर पडल्या आहेत. त्यामुळे हे असं शांतपणे बसून काही करणं शक्य नाही. त्यात आपल्या सर्वांसमोर अनेकदा राण्या साकारल्या जातात, मग ते चित्रपट असोत किंवा टीव्ही वरच्या सिरियल्स. अनेक दा प्रत्येकीच्या मनात येतेच कि आपल्याला पण अशी काहीशी / काही अंशी सेवा मिळावी, जी सद्यस्थितीत अश्यक. म्हणून मग सौंदर्य कक्ष / पार्लर्स उगवले / निघाले / तय्यार झाले. तेथे महिन्यातून एक किंवा दोनदा, अर्थात जशी गरज लागेल तशी मग सेवा करून घेतली जाते, भरमसाठ पैसे मोजून. असो, वरचा मजला शांत ठेवण्यासाठी, सौंदर्य खुलण्यासाठी, किंवा बहाल केलेला बहर टिकवून ठेवण्यासाठी, काही क्षण शांत निवांत घालवण्यासाठी, आणि इतर अनेक कारणांसाठी हि सगळी धडपड. पण तेव्हा आणि आत्ता देखील आहे ते भन्नाट आणि मस्त ह्यात काहीच वाद नाहीच. 

रविवार, १८ फेब्रुवारी, २०२४

युगानुयुगे


काही दिवसांपूर्वी पंगतीच्या जेवणाचं महत्व नमूद करणारा ब्लॉग लिहिला गेला होता माझ्या हातून. त्यात मुखत्वे मी भावी जोडीदाराची निवड करण्याचा तो चपराख मार्ग आहे असं लिहिलं होतं.


पंगत जेव्हा अस्तित्वात होती किंवा सर्रास आधी घरच्या कर्त्या पुरुषांनी जेवायला बसायचं असा अलिखित नियम होता. मग अंगत-पंगत घरच्या अन्नपूर्णेची आणि इतर मुलींची व्हायची. घराच्या आत हात धुवायची सोय असो नाहीतर बाहेर, किंवा पाऊस पाणी असेल तेव्हा, आधुनिक घरात काय आजकाल बऱ्याच घरात अगदी सोप्पं जावं म्हणून दोन पाउलांवर लगेच बेसिन मांडलं असतंच. त्यामुळे तेथेच हात आणि मनोभावे स्वच्छता म्हणून तोंड देखील धुतलं जातं. हि मध्यम वर्गीय पुरुषांना, मुलांना लागलेली सवय, कदाचित लावलेली किंवा निरीक्षणातून शिकलेली म्हणावं. आता थोडासा, अगदी यत्किंचित बदल झालेला आढळतो. मुलं मुली समान, सर्वार्थाने सारखे हक्क, सगळेच घराबाहेर कामानिमित्य ई. मुळे सगळेच एकत्र जेवायला बसतात. अर्थात मागे पुढेच. आधी पुरुषांना वाढलं जातं, मग कदाचित मुलांना आणि मग मुली / घरच्या अन्नपूर्णा. अन्नपूर्णेचे लक्ष सर्वत्र. कोणाला काय हवं नको ते बघत, थोडेसे सावकाश, कारण उरलेले संपवायला, भांडी ताबडतोब घासायला टाकायला मोकळे म्हणून, आणि अश्या अनेक कारणांनी त्यांचे जेवण संपायला अवधी होतो. पुरुष मंडळी पट्टाकिनी खाऊन हात धुवायला मोकळे आणि ते देखील मोकळे पणाने. स्वतःचे यथेच्छ जेवण झालं म्हणजे झालं. बाकी कुठल्याही खिजगणतीत नाहीतच. बरं कितीही देश विदेशी जा, अंतर्देशीय शाळेत शिका, भल्या मोठ्या हुद्द्यावर काम करा, चांगल्या सवयी अंगीकारणे लक्षात येतंच नाही. बाकी सर्व समाजात, वेळे आधी चार गोष्टी सुनावल्या जातात ह्या २०२४ मध्ये देखील. पण अत्यावश्यक असे, आपल्याच घरच्या लोकांचा प्रत्येक वेळी आदर, मान, त्यांचं अस्तित्व काही म्हणजे काही नाहीच. घरात अनेक ठिकाणी हात + तोंड धुवायची सोय असतांना, दार लावून घेण्याची तसदी, चार पाऊल चालून जाण्याचे कष्ट हे सुधृढ लोक जे अती शिकलेले आणि अती अनुभवी समजतात, मिरवतात आणि दर्शवतात देखील. कुठे जातो ह्यांचा शहाणपणा कोणास ठाऊक. हे साधं सांगायची काही गरज पडावी म्हणजे अहो आश्चर्यम. बरं ह्यांच्या सोबत बसलं नाही तर चालत नाही, त्यावरून सुरु होतं, त्यांच्या नंतर बसावं तर अन्न थंड होतं, उशीर होतो. आधी जेवलं तर शिष्ठपणा (त्यात घरी सासू सासरे असतील तर) आणि खूप बारीक सारीक उरतं. सगळ्याच बाजूने गोची करून ठेवली आहे मुलींची. असो. 


पंगतीत असलेला एक नियम लावणं आता फारच आवश्यक झालाय. सर्वांनी एकत्र वाढल्यावरच सुरु करायचं आणि सर्वांचं झाल्याशिवाय उठायचं नाही, मग काहीही झालं तरी. ह्या नियमामुळे मुली व्यवस्थित जेवतील तरी. 


काही घरात म्हणतात कि रात्रीचे जेवण तरी सर्वांनी एकत्र करावे. मग ते अन्न उपभोगू द्या ना सर्वांनाच. बसा जरा त्यांच्या सोबत. त्यांना वाढा, आग्रह करा, गप्पा मारा, किस्से ऐकवा. आताशा सर्वच नियम धाब्यावर बसवले आहेत आपण, मग जेवल्या जेवल्या च हात धुवायचे हे पण थोडेसे बाजूला सारा. जेवा आणि जेवू द्या.  

गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०२४

फेशियल


फेशियल हे खूळ इतक्यातच जास्त जोम धरतेय. इतक्यात म्हणजे झाले असेल एक तप कदाचित. मला काही त्यात फारसा रस नाहीच. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आधीच्या मुली / स्त्रिया काय करत असतील? हा प्रश्न मला नेहेमी पडतो. काही दिवसांपासून मला त्याचं उत्तर गवसलं म्हणून हा पंक्ती प्रपंच. आधी एक तर संपूर्ण पौष्टिक असे पदार्थ सेवन होत असतं. त्यात परसात उगवलेल्या भाज्या, स्वतःच्या शेतीतले पिकलेले सगळे भरपूर प्रमाणात मिळत होते. मुबलक होते सारेच, त्यात स्वच्छ हवा, निरोगी वातावरण, निर्मळ प्रदूषण विरहित श्वास देखील सामील होते. पाणी लख्ख असे आणि दगदग त्या मानाने फारच कमी. घड्याळाच्या काट्यावर दुर्लक्ष करत पळापळ नव्हती घरच्या स्त्रीची. घरचे आणि बाहेरचे, मुलांचे, पैशाचे, आणि इतर अनेक असे विविध मार्गी क्लेश नव्हतेच. त्यामुळे देखील एक तेज कायम होतं त्यांच्या चेहेऱ्यावर आणि व्यक्तिमत्वावर देखील. बाहेर खायला उपलब्धच नव्हतं त्यामुळे आईची घरी किंमत होती, फारच मोठ्या प्रमाणात. आता हॉटेल / रेस्टारंट मध्ये पाटी असते अगदी घरच्या सारखं म्हणून आणि घरी आणण्या च्या मसाल्यांवर म्हणतात हॉटेलचा स्वाद. सगळा सावळा गोंधळ उडाला आहे. म्हणून मग नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवायला, स्ट्रेस नावाचा सवंगडी झाकायला तो फेशियल चा आधार. 


आणखी एक पराकोटीचे महत्वाचे कारण म्हणजे तेव्हा सातत्याने स्वयंपाक घरीच होत होता, मसाले घरचे आणि बहुराशी सगळेच घटक स्वच्छ आणि शुद्ध स्वरूपाचे. त्यामुळे मसाले युक्त, ठराविक वेळी, दररोज कमीतकमी दोनदा उत्कृष्ट वाफ मिळायची. ती योग्य प्रमाणातली उष्णता, आणि एकंदरीत बाष्पीभवन फारच सर्वांसुंदर, बहुमूल्य असा परिणाम द्यायचा. तो नजरेस पडायचा. विहिरीवरचे पाणी, जात्यावरच्या दळण, पाट्यावरचे ओले मसाले, गॅस + कोळशाचे समीकरण, तुळशीच्या प्रदक्षिणा, जमिनीवरची उठबस, विविध पीठं मालाने + लाटणे, वैविध्य तेलांचा सर्वतोपरी वापर ई. आणि अनेक अश्या कारणांमुळे उत्कृष्ट उपयोग होत असे. मुख्य म्हणजे चिमण्या तेव्हा फक्त घराबाहेर वास्तव्याला असायच्या. जेव्हा पासून चिमण्यांना स्वयंपाक घरात अनन्य साधारण महत्व प्राप्त झालं तेव्हा पासून बिघडलंच सगळं, म्हणजे प्रकृती स्वास्थ्याच्या दृष्टीने हो. "कालाय तस्मै नमः". मी आणि आमची अख्खी पिढी ते जगलो आणि आता हे जगतोय, सुंदर आठवणी जाग्या झाल्या, आई, आजीची भेट घडली आज नव्याने पुन्हा एकदा. त्यांच्या सगळ्यात आधुनिक अश्या तेव्हाच्या माजघरात, स्वयंपाकघरात, कोठीच्या खोलीत चक्कर मारता आली मला. 

तांदूळ


गेले काही दिवस किंवा महिने म्हणा आमच्या घरी एक नवीन वारं वाहतं आहे, ब्राउन राईस नावाचं. बदल हाच स्थिर आहे ह्यावर माझा दृढ विश्वास असल्यामुळे आणि मी दररोज च्या जेवणात भात खात नसल्यामुळे मी तो सहज करायला सुरवात केली. ह्यांना आवडतो ना, गरजेचं आहे ना मग चला तर पुढे. तो भात शिजायला जरा जास्त वेळ घेतो नेहेमीच्या पांढऱ्या तांदळापेक्षा. म्हणजे अगदी कुकरला लावा नाहीतर भांड्यात शिजवा वेगळा तो वेळ घेतोच हे प्रकर्षाने जाणवलं. थोडसं डोकं लावलं तेव्हा समजलं कि पांढरा म्हणजे पॉलिश केलेला, वरचे थर काढून तयार केलेला असा. त्यामुळेच तो पट्टाकिनी शिजतो हो. 


ह्या छोटयाश्या अनुभवावरुन एक सहज जाणवलं कि प्रत्येकाने अगदी असेच राहावे प्रतिदिनी. जेव्हा हवे तेव्हा थर पांघरावे. नाण्याच्या दोन बाजू इथे देखील निदर्शनास येतात. एक म्हणजे गेंडा कातडी व्हावे गरजे नुसार आणि काही म्हणजे काही अंगाला न चिटकू देता पुढे मार्ग क्रमणा करत राहावी. आणि दुसरे म्हणजे विविध गूण संपादन करत राहावे, शिकावं, नवनवीन गोष्टी आत्मसात कराव्यात, व्यक्तिमत्व बाहेरून जाईल असे नेहमीच पाऊल उचलत राहावीत आणि त्याचे थर पण भार नाही असे मार्गस्थ होत राहावे. ह्या मुळे स्वतःला अत्यानंद होतोच, अनुभवामृत चाखायला मिळते आणि तुमच्या आदर्शांवर बाकींना पण मग मार्ग दिसतो. 


अजून एक कंगोरा असा कि हवं तेव्हा थर काढून पण टाकता आले पाहिजेत. आजची पिढी त्याला अन लर्निंग असे संबोधते. नको ते झटकून टाका पट्टाकिनी आणि पुढे मार्ग स्वच्छ मोकळा निर्मळ असा तय्यार होतो. असे नको असलेले थर काढून टाकले कि अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी, गमती, आत्मसात करण्यास सुकर जातं, अगदी त्या पांढऱ्या तांदळासारखे. 


बघा म्हणजे ते इतके बारीक तांदुळाचे दाणे देखील मला कित्ती शिकवून गेले आज. अर्थात आपण हे सगळं करतंच असतो सदोदित न कळत, पण आता कळते पाणी करा, थोडीशी मेहेनत घेऊन करा, करत राहा. एकदा करून भागणार नाहीच, सदोदित पुढे चालायचं म्हणजे सातत्य महत्वाचे. असे केल्याने मग अमृतानुभवची प्रचिती नक्की येईल.  

प्रसिद्ध उपयुक्त म्हणी


शहाण्या माणसाने कोर्टाची आणि पोलिसांची पायरी कधीही चढू नये म्हणतात. मला ह्यात एक अजून ठिकाण जोडावंसं वाटतंय ते म्हणजे हॉटेल / रेस्टॉरंट्स. घरच्या अन्नाला तोडच नाही. अगदी अपरिहार्य कारणांमुळे किंवा अगदी क्वचित बाहेरचं खाणं ठीक पण शक्यतो नकोच. अगदी स्टार हॉटेल मध्ये तरी अनेकविध नियम, अटी लागू पडतात, पाळाव्याच लागतात त्यामुळे ते उत्तम दर्जाचे घटक पदार्थ वापरात असतील अशी आशा आहे. पण छोटी ठिकाणं म्हणजे जरा प्रश्नचिन्हच. काही अपवाद वगळता बाकींबद्दल न बोललेलं बरं. पैसे देऊन तब्बेत स्वतःच्या हाताने बिघडवून घेण्यात काय अर्थ आहे. आणि आधुनिक गुरु आणि त्याच्या संस्था पण सांगतात कि बाहेरचं खाणं टाळा, अनेक अर्थाने. त्यांच्या दुर्ष्टीने घरी जशी आई स्वयंपाक करतांना तिच्या मायेचा स्पर्श आणि मसाला त्यात मिसळतो, आशीर्वाद असतो आणि मनापासून इच्छा देखील कि हे अन्न सेवन केल्यावर माझ्या कुटुंबाला फायदा व्हावा, तब्बेती सुधृढ राहाव्यात ई. तसे बाहेर जे स्वयंपाक करतात, तुम्हाला वाढून आणून देतात त्यांना जर बरं नसेल, त्या वेळी भूक लागली असेल किंवा ते चमचमीत पदार्थ खायची इच्छा उत्पन्न झाली तर मग तो मसाला मिसळला जातो न कळत त्या अन्नात. त्याचे कदाचित परिणाम होतात खाणाऱ्यावर. हे एक महत्वाचे कारण आहे स्वच्छता आणि घटक पदार्थांशिवाय. 


मला एक सांगा, जे घरी, फ्लॅट मध्ये राहतांना सहज कुत्रा पाळतात, तो एक सजीव प्राणीच आहे. त्याला माणसापेक्षा जास्त वास टिपण्याचे इंद्रिय आहेत. तो एक घराचा सदस्य म्हणून राहतो किंबहुना त्याला तसे पाळले जाते, माणसासारखे. पण अनेक संशोधकांनी सांगितल्याप्रमाणे कुत्र्यांना माणूस जेवतो ते अन्न चालत नाही त्यांचं स्वतःच वेगळं असतं आणि तेच द्यावं लागत त्यांच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने. बंद, वातानुकूलित फ्लॅट मध्ये राहतांना त्या श्वानाला घरची सगळी मंडळी जेवत असतांना सुगंध येत असेल आणि खायची इच्छा देखील, साहजिक आहे. त्याचं वेगळं खाणं झालं असलं तरी देखील. आणि आपण टाळतो द्यायला. मग त्याची इच्छा नेहेमी होते त्याचं काय? 


प्रत्येक जणच घरी काम करणाऱ्यांना खाऊ पियू घालतातच असे नाही. आणि आजकाल तर कधीही कोणीही त्यांच्या वेळेनुसार खातात. मग ती पण हाडामासाची माणसेच आहेत ना. 


माझ्या मते ह्याचा पण परिणाम होत असावा. तेव्हा अगदीच गरज असेल तरच घरी पक्षी, प्राणी पाळा, त्यांना त्यांच्या कळपात राहू द्या. आणि घरच्या मावशींना कणभर द्याच आवर्जून. त्या देखील घरच्या सदस्य आहेतच.

बुधवार, १४ फेब्रुवारी, २०२४

वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे...


आपल्या सर्वांसाठी, मानवांसाठी अनेक गोष्टींना महत्व आहे, आई वडील, नातेवाईक, मोठ्यांचा आदर, शिक्षण, समाजाचं ऋण, अर्थार्जन, योग्य विनियोग वेळेचा आणि पैश्यांचा सुद्धा ई. यादी फार मोठी आहे. माझ्या दृष्टीने ह्या यादीत सर्वात अग्ग्रगणी येते ते भोजन, अन्न. अन्नाचं महत्व अनन्य साधारण असेच आहे. जीवनाचे सार आहे. आग्रहण म्हणजे एक मोठी साखळी आहे, ज्यात शेतकऱ्याचे प्रचंड कष्ट, निसर्गाची कृपा, शारीरिक मानसिक आरोग्य ते अन्न तय्यार करण्यासाठी, पचवण्यासाठी आणि रिचवण्यासाठी देखील. शेतकरी ते स्वयंपाक घर ह्यात अनेक अजून व्यवसाय / व्यावसायिक येतातच. हे सगळे साखळीतले माणिकमोती सातत्याने राबत असतात तेव्हा चार घास लाभतात आणि सुख देऊन जातात. ह्याच साठी अगदी न कळत्या वयापासून, शाळेतच अन्नाचं महत्व समजावून सांगितले जाते, विविध प्रकारे. श्लोक पाठ आणि पठण करून घेतले जातात नियमित पणे, मग तो विद्यार्थी कुठल्याही माध्यमात, जगातल्या शाळेत जावो. मराठीत, इंग्लिश, आणि बाकी स्थानिक भाषेत तोच मतितार्थ असलेले शब्द / रचना असतात. मुलं अगदी तन्मयतेने ते म्हणतात देखील. 


शाळेत शिकवलेले, किंवा त्या कोवळ्या वयात शिकवलेले बाकीचे विषय म्हणे जन्मभर न चुकता लक्षात ठेवायचे कारण ते जगायला आवश्यक आहेत. जसे कि गणित, भूमिती, भूगोल, इतिहास, विज्ञान आणि इतर. 


माझ्या अनेक प्रसंगी मिळालेल्या / चाखलेल्या अनुभवातून एक समजलं आहे कि माणूस फार उच्च कोटींचा हुशार आहे. तो हवं ते हवं तेव्हा लक्षात ठेवतो किंवा विसरतो, किंवा तसे उपदेश करतो. विषय, त्यातली समीकरणे ई. लक्षात ठेवून वापरायची, मग अन्नाचे महत्व सांगणारा श्लोक किंवा त्यातला मतितार्थ का नाही? त्या अन्न पुरवठा साखळीतले कित्येक जणांचे अपार कष्ट कसे काय बाजूला सुरू शकता, विसरू शकता, अन्नाला उठता बसता, समोर आले कि सातत्याने नाव ठेवता आणि का? काय मिळतं असं करून? पैसे फेकलं कि सगळं मिळालं का? तर नाही.  हि उच्च कोटीच्या शाळेत गेलेल्यांची गत.


माझ्या मैत्रिणीचा नवरा म्हणायचा, जेव्हा ती त्याला विचारायची कि स्वयंपाक कसा झालाय ते, पानात मीठ, लोणचं, लिंबू का वाढतात? तर प्रत्येकाची चव, पातळी वेगळी असते. ज्याला जे हवं ते लावून घ्यावे. इतकं सोप्पं आहे ते. अन्नाविषयी नको ती चर्चा नको. अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरणं नोहे जाणिजे यद्न कर्म.  जे पेराल तेच उगवतं, ज्वारी पेरली तर ज्वारीचं मिळणार ना. अगदी तस्सेच, सातत्याने अन्नाविषयी कुरकुर केली कर ते तस्सेच लागणार चवीला. एकदा आणि नेहेमीच नतमस्तक व्हा आणि सेवन करा. त्या प्रत्येक घटकाला धन्यवाद द्या ज्यांच्या परम कष्टामुळे पुढ्यात आयतं सुग्रास मांडलंय, चारीठाव. कित्येक जण आहेत ज्यांना दिवसाला फक्त एक भोजन लाभतं. 

कलियुगात मुंग्या येतच नाहीत का?


माझ्या लहानपणी प्रचंड कडक शिस्त होती, प्रत्येक गोष्टीच ठिकाण ठरलेलं असायचं, आणि हो वेळ सुद्धा. कधीही काहीही चालायचं नाहीच. स्वयंपाक घरातच किंवा डायनिंग टेबल वर बसूनच जेवायचं, ई. "झोपायच्या ठिकाणी खायचं नाही, मुंग्या येतील"  इति आई. तेव्हा अजून एक महत्वाचा दुवा होता तो म्हणजे हॉटेल, रेस्टॉरंट्स असे बाहेर हादडायचे पर्याय सर्रास उपलब्ध नव्हते. अगदीच बाहेर गावी ते देखील गाडीने / बसने प्रवासाला गेलो तर धाबे दिसायचे रस्त्याच्या काठी, किंवा चहाच्या टपऱ्या असायच्या, बास. उठ सुठ बाहेर खाणे खिजगणतीत नव्हतेच. त्यामुळे पण असेल कदाचित मुन्यांना घरीच खाद्य मिळत असावं. त्या वेळी साखर गोड होतीच आणि माणसांमधला गोडवा पण टिकून होता. कुणालाही साखरेचा बाऊ नव्हता. शारीरिक कामे, चालणे, घरकाम, अंगमेहेनत, बघीच्यातले काम, शेतीची कामे ई. मुळे असणार नक्कीच. आताशा मी स्वतः आई असून हे वाक्य वापरायची पुरती विसरूनच गेले. हा झाला एक भाग, का साखरेतला गोडवा कमी झालाय? ह्या कलियुगातील साखरेतला हो मंडळी. माझ्या मते कलियुगातील मुंग्यांना एकतर गगनचुंबी इमारतीमध्ये चढायला नकोसं होतं असेल. किंवा त्यांना देखील आता इतके पर्याय उपलब्ध आहेत अगदी देश विदेशातील मग तुमच्या कडचं मिळमिळीत घराचं, तेच ते सारखं कोण चाखणार हो? छे छे. सगळेच बदललेत, अत्याधुनिक झालेत, मग मुंग्यांनी तरी का मागे राहावं? मानव जर सर्रास स्मार्ट फोन वापरात आहेत तर ह्या मुंग्या पण स्मार्ट झाल्या असतील. आताशा त्या AI च्या मदतीने आधीच विचारपूस करून, पोटभर खाऊन लुप्त होतं असतील, सोशल मीडिया संलग्न काही वर वेळ व्यतीत करत असतील, आभासी जगाचा आनंद लुटत असतील. त्यामुळे मुंग्या लागल्या, साखर किंवा गोड पदार्थ उन्हात ठेवा असे काहीच कुठेच कानावर येत नाहीच माझ्या. मी तरी काही एअर पॉड, इअर प्लग्स, इअर फोन ई. पैकी काहीच वापरात नाही, कधीच. आणि हो स्क्रीन वर सुद्धा मोजक्या वेळी असते मी.  जे अश्या यंत्रणा वापरतात सातत्याने, त्यांना ना दिसणार ना ऐकू येणार. काही तरी गोम आहे हे निश्चित. मुंग्यांसाठी पण "चेंज इज द ओन्ली कॉन्स्टन्ट".  

मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०२४

आभासी भेट


एक दिवशी गाडी चालवतांना अचानक एका वाहिनीवर खूप सुंदर रचना ऐकायला मिळाली. त्यात असं म्हटलं होतं कि "मीरे सारखी साद घातली तर श्री कृष्ण पण भेटीस येतो". इतकी आर्तता हवी, आपण वर वर आठवण करतो मग ती पोचणार कशी कोणापर्यंत?


माझ्या दृष्टीने दोन पद्धतींच्या आभासी भेटी असतात. एक म्हणजे मनःपूर्वक स्मरण ज्यात भावना, कंपन / व्हायब्रेशन्स अगदी नक्की पोचतात अगदी नैसर्गिक रित्या, प्रगतशील आर्टिफिशियल तंत्रज्ञान न वापरता आणि दुसरे म्हणजे विडिओ कॉल, किंवा सोशल मीडिया वापरून पाठवलेले निरोप. एखाद्या व्यक्तीची आठवण करून त्याची भेट सिम्यूलेट करणं, सदृशीकरण करणं म्हणजे एक आत्मिक भेट होय. तंत्रज्ञान विकसित होण्याआधी आणि आता देखील अशी भेट घडतेच. स्वानुभव घ्या नक्की. 


एकदा एक अनुभवामृत कानावर पडले सहज, ते येथे मांडते आहे. एक प्रयोगातून विज्ञान अशा पद्धतीने काही अंथरुणावर खिळलेल्या रुग्णांना सदृशीकरण करायला सांगितले सूर्यनमस्काराचे. जे शारीरिक पद्धतीने सूर्यनमस्कार घालून फळ मिळवतात त्यांच्या मानाने आभासी पद्धतीने केल्यामुळे, असे त्यांनी पडल्या पडल्या डोळ्यासमोर मांडले, किंवा स्वतःला भासवले कि ते प्रत्यक्ष १२ आसने करत आहेत. थोडा जास्त अवधी लागला पण बहुतांशी सगळ्यांनाच फायदा झाला. प्रत्येक वेळी, प्रत्येक जणांना हे फायदेशीर ठरेलच असे नाही पण हा एक तरणोपाय आहेच. सरते शेवटी दुधाची तहान ताकावर, नाही का?

सोमवार, १२ फेब्रुवारी, २०२४

तो अद्वितीय अनोखा कळप

 

सर्वांच्या भावनांचा आदर करून मी हा पंक्ती प्रपंच येथे मांडत आहे. पण हा माझा एक पिटुकला दृष्टिकोन आहे ह्या बाबतीत. 


अशी कल्पना करा कि एक माणूस किंवा व्यक्ती किंवा माणसाचे पिल्लू हत्तीच्या कळपात नेऊन ठेवलंय. आणि ते तेथेच मोठं होतंय. हत्ती नक्कीच त्याची जीवापाड काळजी घेतील. कंदमूळ, केळ-फळ ई. खायला आणून देतील, भरभरून प्रेम देतील वगैरे. हे सगळं घडत असतांना त्या माणसाच्या जीवाला मात्र हत्ती हेच सर्वस्व वाटेल कदाचित कारण त्याला माणसांमध्ये राहणं ठाऊकच नाही. तो अनुभव त्याने घेतला नाही, चाखला तर नाहीच. दोघेही जीवित प्राणी आहेत, माणसं आणि हत्ती तरी फरक आहेच ना? असं देखील संभव आहे कि हा बाळ तेथेच मोठा होतोय, सर्व आयुष्य तेथेच व्यतीत करतोय आणि एक दिवस निघून जातोय. कदाचित आपण टीव्ही वर मोगली बघतो तसं काहीस होईल कदाचित. अर्थात त्या व्यक्तीला स्वच्छ वातावरणात राहायला मिळेल, सदा मौन कारण भाषा न शिकल्यामुळे आणि ती न वापरल्यामुळे, शिक्षणाची जबरदस्ती नाहीच, नोकरी, कुटुंब पण नाही. आणि हे मोठ्या प्रमाणात घडायला लागलं तर? म्हणजे काही माणसांची पिल्ले वाघाच्या, हरणाच्या, उंटांच्या आणि इतर प्राण्यांच्या समूहात गेली राहायला तर? 


मी एवढ्यात बघते आहे कि श्वान घरी पाळण्याचा माणसाने जसा ध्यास घेतला आहे. त्या मागची कारणं मला ठाऊक नाहीत. कुत्रांना माणसांच्या बुद्धी प्रमाणे उत्कृष्ट जीवन लाभते, सुरक्षा, खाणं ई. पण त्या पल्याड काही आहे ना? हा अगदीच एखादा रुग्ण एकटा असेल, त्याला उच्च कोटींचा मधुमेह झाला असेल आणि औषध पाणी देण्याकरता अत्यंत हुशार आणि निपुण श्वान हवा आहे तर मान्य आहे. पण उठसुठ काय हे. त्यात माणसंच आधी कुठेतरी लटकलेली आहेत, उंच फ्लॅट मध्ये राहतात आहे. अंगण नाही. मग त्या कुत्र्याने करायचे काय? मला प्रचंड कीव येते अश्यांची खरंच. माणसाचे काम वाढते ते वेगळेच. आपल्या माणसांसाठी करा ना असं काही खास दररोज, न चुकता. त्यांच्या साठी आणा ना उत्कृष्ट दर्जाचं विविध्य खाणं, जा ना त्यांच्या सोबत फिरायला दररोज दिवसातून ४ दा. तुम्ही माणसं आहात तर "माणसाने माणसाशी माणसा सम वागणे" जास्त योग्य नाही का? भलं मोठं आंगण आहे, शेती आहे, कुत्रांना पाळायला धावायला त्यांच्या सख्यांसोबत वेळ घालवायला मिळतोय तर पाळा त्यांना. अवश्य. नाही तर नाही हो.  

तुम्हाला जर फारच लळा असेल तर जा ना एखाद्या श्वान निवाऱ्यात जा, खेळा, वेळ घालावा / सदुपयोगी लावा, त्यांना औषध गोळ्यांचा पुरवठा करा, दानधर्म करा, पण त्यांना त्यांच्याच कळपात राहू द्या. तो पण राजहंस आहे. त्याच्यात अत्यंत वेगळे गूण आहेत. त्यांना जगू द्या. आणि हे सगळ्याच पाळीव पक्षी, प्राणी ह्यांना लागू पडतं. 


अतिथी देवो भव


मध्यम वर्गीय महाराष्ट्रीयन कुटुंबात, बहुतांशी सगळ्यांकडेच पूजा अर्चा, नित्यनेमाने पोथी वाचन, स्तोत्र पठण, व्रत वैकले, उपवास ई. अगदी दररोजच्या रोजनिशीत आहेतच. खूप जण अनुग्रह घेतात, गुरु करतात, त्यामुळे त्यांची ठरवलेली साधना होणे अत्यावश्यक असते. आजी, आजोबा, आई बाबा, काका काकू, मामा मामी ई. सगळेच तन्मयतेने सगळं करतात. एवढ्यातच मी गावी गेले होते, माझ्या माहेरच्या ठिकाणी, आणि एका खास मैत्रिणीकडे उतरले होते. "त्याच्या" कृपेने तिचं घर अगदी भरलेलं आणि बहरलेलं असं आहे, गेली २६ वर्षे, एक नाही दोन नाही. आपली माणसं सभोवताली, अगदी उत्साहाने सगळे सामील होऊन दिनचर्या करणारे असे. काकू, तिच्या सासूबाई, म्हणजे माझी अजून एक लाभलेली खास मैत्रीण देखील अगदी प्रेमाने पूजाविधी ध्यानमग्न होऊन शास्त्रोक्त पद्धतीने, विधिपूर्वक करते. ज्या दिवशी मी पोचले त्या दिवशी गप्पांच्या नादात त्यांचं काही तरी वाचन राहून गेलं असं त्या म्हणाल्या. आम्हा दोघींना वाईट वाटलंच त्याचं.

 

आपल्या संस्कृतीत पाहुण्याला प्रचंड उच्च स्थान आहे. बरोबर ना? ह्यावरून मी सहज बोलून गेले काकूंना कि "अतिथी देवो भव". आज माझ्याशी मनापासून वैविध्य विषयांवर बोलण्यात वेळ गेल्यामुळे वाचन जरी राहून गेलं असलं तरी ते पोचलं त्याला. कदाचित हेच वाचन होणं असेल आज. आमचे विषय देखील पूर्णपणे आध्यात्मिक नसले तरी त्यावर आधारित होते, अगदी श्री राम आरती, अयोध्या, रामदास स्वामी, आधुनिक संतांची शिकवण, हार, फुले, प्रसाद, वाचन, लिखाण, जुन्याचे नवीन मॅपिंग, नवी पिढी, सवयी असे असंख्य होते. म्हटलं झाली तुमची पूजा / वाचन आजचं. असं देखील बघता येईल ना ह्या म्हणीला कधी तरी जर लागलंच तर, चुकीचे काहीच नाही त्यात. मी कधी रोज जाणार त्यांच्याकडे राहायला. किंवा असं जर कधी झालंच तर दृष्टिकोन बदला म्हणजे अपराधी वाटत नाही, किंवा उगाच मनस्ताप होतं नाही. अतिथीला म्हणजे मला अगदी माहेरपणापेक्षा जास्त काळजी घेतली गेली, खाऊ पिऊ घातलं गेलं, मस्त चक्कर झाली, देवदर्शन झालं, अगदी मला जे जे आवडतं ते ते आठवणीने भरपूर केलं. हे सगळं "त्याच्या" चरणाशी रुजू झालं, त्याची नोंद झाली. मग ह्याच अश्या खास अतिथीशी बोलतांना वाचन राहून गेलं असं म्हणण्यापेक्षा त्या दिवशी संभाषण, वैचारिक देवाण घेवाण झाली जी रोजच्या वाचनामुळे, सातत्यामुळे संभव झाली, नाही का? "असे पाहुणे येति आणिक स्मृती ठेवुनी जाती". 

रविवार, ११ फेब्रुवारी, २०२४

तो बहरलेला मोहोर


मी एवढ्यातच एका रस्त्यावरून जात होते आणि माझ्या चार डोळ्यांनी काही अद्भुत टिपलं. म्हटलं काही तरी वेगळं बघितलं, खात्री पटली नाही पहिल्यांदा. त्यानंतर दोन दिवस सलग त्याच रस्त्याने जाणं-येणं झालं आणि ते दृश्य बघून अचंबित व्हायला झालं. अगदी भर चौकात एक आंब्याचं मोहोराने बहरलेलं ते झाडं. त्याच्या आसपास फक्त सातत्याने वाहणारा रस्ता, किंबहुना आऊटर रिंगरोड, जो कधी म्हणजे कधीच शांत किंवा मोकळा नसतो असा. मागे भली मोठी इमारत आणि शेजारी भिंत. आता ह्या सगळ्यात कोठेही मानवी वसाहत नव्हती. त्यामुळे कोण खत पाणी देणार त्या झाडाला, कोण मशागत करणार? तर कोणी म्हणजे कोणीच नाही. चार प्रेमाचे शब्द कानावर पडत नाहीत, कोणीच अंगावरून हात फिरवत नाही. खाली बुंध्याशी माती पण नाही नो, आळ वगैरे तर सोडाच. कसे तरी ते झाडं ठेवलं आहे इमारत बांधते वेळी हे नशीब. तरी पण अश्या ठिकाणी असलेल्या झाडाला मग इतका प्रचंड बहर कसा काय आला? बरं त्याची फळं देखील दगडं मारून अवेळी सतत रस्त्यावरची लोकंच तोडणार, जखमा होणार, त्रास होणार. हे माहिती असून देखील झपाटल्यासारखा तो बहरलेला बघितला आणि फार वेगळं वाटलं मला. मुळे जाऊन जाऊन किती खोल जाणार आणि किती पाणी किंवा आवश्यक घटक शोषून घेणार? फार दुर्मिळ आहे ह्या मानवी सिमेंट च्या जंगलात. तरी देखील फुलांनी आणि सुगंधाने मुसमुसलेला तो बघून परमानंद झाला, खूप शिकवून गेला आणि वेगळी ऊर्जा  देखील तो मोहोरलेला बहर.


आपण मानव स्वतःला भयंकर आणि प्रचंड जगावेगळे हुशार बुद्धिवान समजतो सतत. सगळ्या सुख सोयी पायाशी लोळत असून, सगळे "त्याने" देऊन देखील सातत्याने तक्रारीचा च स्वर, जेथे बघावं तेथे. काय नाही, दुसऱ्याला काय मिळतंय ह्याची यादी तय्यारच असते नेहेमी. आणि हा पठ्या बघा, काहीही म्हणजे काहीही योग्य, उपयुक्त आणि गरजेचा  पुरवठा नसतांना (नैसर्गिक किंवा मानवी) बहरला आहे. प्रत्येकाला छाया, सावली आणि आंबट-गोड फळं देतोय आणि ते देखील निरपेक्ष, शांतचित्ताने, न बोलता. काय बोलावं ह्या बद्दल, मी तर निःशब्द झाले किंबहुना त्या अवलियाने मला निःशब्द केले असं म्हणावं लागेल. जागे व्हा लोकांनो, पुढे चला, देवाण घेवाण असते नेहेमी, मुक्त हस्ताने द्याल तरच मिळेल. इंग्लिश मध्ये सुद्धा गिव्ह अँड टेक आहे, हे कधीही विस्मरणात जाऊ देऊ नकाच.    

काहीच नाही


काही दिवसांपासून मी एक जाहिरात बघते आहे आणि तिच्या प्रेमात पडले आहे. प्रेमात ह्याच्या साठी कि त्यात एक फारच गोड, अतिशय हुशार आणि उत्सुक, चौकस, जिज्ञासू असा मुलगा दाखवला आहे. त्याचे कुरळे केस, चेहेऱ्यावरचे भाव प्रचंड भुरळ पडणारे आहेत. ती जाहिरात फारच मोठा संदेश देऊन जाते, अर्थात माझ्यासाठी, ह्या सगळ्या कारणांमुळे मी तिच्या आणि ज्याने अशी जाहिरात करावी ह्याबद्दल विचार केला त्यांच्या देखील प्रेमात पडले आहे. 


आई डेटॉल चा सर्वत्र वापर करत असते, उपयोगात आणत असते, त्या जाहिराती मध्ये आणि हा पठ्या तिच्या मागे मागे, सतत एक प्रश्न विचारात असतो. "असं डेटॉल सगळीकडे लावल्याने काय होतं?" आणि आई सांगते "काहीच नाही". तो पुन्हा विचारतो आणि आई पुन्हा तेच सांगते. सरते शेवटी आई म्हणते कशी डेटॉल लावल्याने कधीच कोणाला काही होतं नाही, कुटुंबातले सगळे सुरक्षित राहतात, किटाणू निघून जातात ई. आणि मग त्या पठ्ठ्याच्या डोळ्यातील चमक वाखाणण्यासारखी आहे. इतक्या लहान वयात इतकं अप्रतिम काम. क्या बात है?


अजून एक कारण:

मी अगदी न कळत्या वयापासून एक निरीक्षण केलं आहे माझ्या घरी कि आई प्रत्येक तय्यार केलेला पदार्थ देवासमोर आधी ठेवायची आणि मग सर्वांना खायला द्यायची, अगदी न्याहारी सुद्धा. त्यावेळी कधीच विचारलं नाही पण माझ्या हातून पण ते घडत गेलं आपोआप. माझ्या मुलांनी आणि एका सोशल मीडिया वर आलेल्या लेखात विचारलं होतं कि "हे केल्याने काय होतं?" आणि त्यावर अर्थात उत्तर होतं कि "काहीच नाही". देव कुठे खाणार हो फोटो आणि मूर्तीतून बाहेर येऊन. पण त्यामुळे अर्पण करण्याची भावना येते, "तो" सर्वश्रेष्ठ पहिल्यांदा आणि मग सगळे, ज्याने दिलं त्याला आधी समर्पण, सर्व मोठ्यांना आधी देण्याची, त्यांचा मान राखण्याची सवय होते, नतमस्तक व्हायला होते, हात जोडले जातात, त्याच्या समोर काही सेकंद उभे राहिले जाते, त्याचा आशीर्वाद मिळतो सातत्याने, ह्या सगळ्यांमुळे मग स्वस्थता, स्तभता, शांतात लाभते. ह्या सगळ्यांमुळे मग कोणाला काहीच होतं नाही. हो कि नाही. असं आहे त्या मागचं गमक. 


माझी माउली तर नवीन आणलेला प्रत्येक घटक "त्याच्या" समोर ठेवायचीच, मग ते कपडे असोत, फळं, बक्षिसं आणि औषधे सुद्धा. त्यामुळे ह्या सगळ्या संस्काराबद्दल फक्त एवढंच म्हणू शकते "काय वर्णू तव गूण अल्पमती नारायण".  


https://www.youtube.com/watch?v=eKCA5cYx7EM

शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०२४

जलतरणपटू

 

एका राष्ट्रीय स्तरावर, समुद्रात आणि ओलीम्पिक सारख्या भल्यामोठ्या शर्यतीत तब्बल एक नाही, दोन नाही तर १६ वर्ष वैविध्य स्तरावर जलतरण केलेल्या जलपरीसोबत आज प्रवासाचा योग आला. अहो भाग्य माझे, फार कमी वेळ होता सोबत पण त्यात काही अंशी माहिती मिळाली. जगावेगळे स्वानुभव, प्रशिक्षक, ती प्रचंड शिस्त, ठराविक आहार, आणि "त्याच्यावर" अतोनात श्रद्धा. हे सगळं जमेल तेवढं मी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. पण अजून काही भेटी नंतरच जास्त आणि अनोखी माहिती मिळेल. इतक्या तरुण वयात इतक्या संधी उपलब्ध झाल्या आणि त्यांचं ह्या परीने चीज केलं. बरं इतकी वर्ष फक्त स्विमिंग एके स्विमिंग केलं का? तर नाही. चार पिढ्यांची नाती मनापासून सांभाळी, माणसं जोडली, खूप वाचन केलं आणि ते स्पष्ट मी अनुभवलं ज्या पद्धतीने हि परी चपराख आणि अनोखे शब्द प्रयोग करत होती. शेअर मार्केट मध्ये माहीर इतक्या लहान वयाची मुलगी मी आज पर्यंत बघितली नाहीच. मग ते केकचं व्यापार असो, नाही तर भला मोठा मॉल ह्या परीला त्यांचे सगळे आकडे अगदी तोंडपाठ आहेत. इंग्रज आणि बाकी आले, राज्य करून गेले आणि तिथपासून कॅपिटल मार्केट ची कशी नीव बांधली गेली ह्याची सुद्धा इतंभूत माहिती आहे ह्या पिटुकलीला. क्या बात है? हे काय कमी होत म्हणून पौष्टिक आहाराची खडान्खडा माहिती. जेन झी बद्दल संपूर्ण स्वभाव आणि हाताळण्याचे मंत्र मुखोद्गत. "काय वर्णू तव गूण..." असं काहीसं झाला होत मला आज. सर्वात महत्वाचं म्हणजे, इतके काही इतक्या कमी काळात कमावून सुद्धा पाय अगदी जमिनीवर घट्ट रोवलेले असे. माझ्याशी अगदी अदबीने साधेपणाने प्रवास केला. खूप शिकण्यासारखं आहे ह्या जलपरीकडून. पुन्हा मला अवश्य भेटायला आणि भरपूर किस्से ऐकायला खूप आवडेल मला निश्चित.   

मिसेस आनंद जयशेट्टे हे त्यांचं नाव. डॉ. आनंद हे नॅशनल कायदा विश्वविद्यालय औरंगाबाद येथे कार्यरत आहेत. ह्या त्यांच्या अर्धांगिनी. मी एवढ्यातच गेले होते ह्या विश्वविद्यालयात दोन दिवसीय संशोधन वर्कशॉप घ्यायला तेव्हा पुण्याला परत येतांना त्या सोबत होत्या. "चार तास भारावलेले" असा तो अनुभव होता. 

गुरुवार, १ फेब्रुवारी, २०२४

निवड


प्रत्येक टप्प्यावर परीक्षा असते हे फारच लहानपणापासून मी ऐकत आले आहे, शिक्षकांकडून, थोरा मोठ्यानं कडून, आई वडील आणि इतर. त्यावेळी वाटायचं फक्त शाळेत परीक्षा असतात ज्या कठीण असतात. एकदा मोठ्ठं झालं, महाविद्यालयांत गेलं कि सगळं रंगी बेरंगी आणि सोप्पं. अर्थात माझ्या वेळेला खरंच ते थोडसं सोप्पं होताच म्हणावं. 


मध्ये एकदा मला एका संस्थेच्या कुलसचिवांचा दूरध्वनी आला, मला आमंत्रण देण्याकरता होता तो. एक वोर्कशॉप घ्यायचं होतं. तारखा ठरवल्या गेल्या, मग बदलल्या गेल्या आणि मग दिवस, असे अनेक चर्चा सत्र झाले आणि मग थोडीशी शांतता होती. मी म्हटलं नक्की काय होतंय? आणि इतक्या मोठ्या मंडळींना जमेल का मला काही माहिती द्यायला? काय झालं असेल नक्की? होणार ना माझे वोर्कशॉप? ई. 


परवा मी त्या संस्थेत पोचले. ठरल्याप्रमाणे कुलसचिवांना, बाकी मोठ्या मंडळींची भेट घेतली, आणि नंतर व्हाईस चॅन्सेलर सर ह्यांच्या दफ्तारात गेले. अगदी मोजक्या शब्दात त्यांनी ऐकून घेतलं, ते बोलले आणि म्हटले कसे, कुलसचिवांनी तुमचे नाव सुचवले पण मी माझ्या ओळखीच्यांना पण विचारपूस करून, माझा वेळ घेऊन मग परवानगी दिली. तेव्हा समजलं कि जो थोडासा वेळ / अवधी लागत होता सगळं ठरायला तो का ते. व्हाईस चॅन्सेलर सरांची खात्री पटली कि योग्य व्यक्ती येतोय हि माझ्यासाठी खूप मोठी शाबासकी होती. ह्यावर मी पुढचे सगळे क्षण जगेन अत्यानंदाने. ह्या वयात जाणवतंय "दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्यावाचून झुलायचे". 

२२ जानेवारी २०२४


"आजी सोनियाचा दिनू..." अशी सर्व भारतीयांची अवस्था झाली होती ह्या दिवशी, हे सर्वश्रुत आहे. एक फक्त ८५ वर्षांचे तरुण व्यक्तिमत्व मला भेटायला त्यांच्या कचेरींतुन बाहेर आले, माझ्याशी बोलले, पोटभर हातरखून नाही तर अगदी मनापासून आशीर्वाद दिले. हि माझी त्यांच्याशी केवळ दुसरी भेट आहे. परवाच अगदी काही मिनिटांसाठी त्यांचा वेळ ठरवून मी भेटायला गेले होते. आज म्हणतात कसे, आज म्हणजे १ फेब्रुवारी ला पुन्हा एकदा २२ जानेवारी चा आनंद उपभोगला. जणू काही माझ्या ह्या विश्वविद्यालयात सोहोळा सुरु होता. जो तो मला संशोधन कार्यशाळेबद्दल सांगत होता, त्यात हजर राहण्यासाठी उत्सुक होता, आणि मला भेटत देखील नव्हता. प्रत्येकाला लगबग होती ह्या कार्यशाळेत सांगितलेल्या गोष्टी आत्मसात करण्याची, अगदी जसे कि अयोध्येत होती. हे म्हणणारे ८५ वर्षांचे तरुण म्हणजे त्या विश्वविद्यालयाचे व्हाइस चॅन्सेलर सर. ह्या पेक्षा जास्त मोठी शाबासकी कोण आणि कधी देणार मला. मी कृतकृत्य झाले. सगळे श्रम कामी आले. पेरलेल्याची फळे दृष्टीस पडत आहेत. आणि हे सर नक्कीच तोंडारवर बोलण्यापुरते कधीच असे म्हणणार नाहीत ह्याची खात्री आहे. प्रत्येक अणूरेणूला शतशः मनःपूर्वक धन्यवाद ज्यांनी माझी जडणघडण केली, विश्वास ठेवला, पाठीवर थाप दिली.  

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...