मी तरी माझ्या लहापणी पासून, किंबहुना कळायला लागल्यापासून मोठ्यांना देऊळ दिसले कि नतमस्तक होतांना बघितले आहे. त्यांचे हात आपोआप जुळले जातातच. आणि अर्थातच तीच सवय मला देखील लागली. का असं करायचं हे कधीच मी कोणालाही विचारले नाही, अर्थात त्याची गरज पडलीच नाही. "तो सुख करता तो दुःख हरता" एकदा मनी ठसल्यावर मग मागे फिरणे नाहीच. विज्ञानाने देखील अनेक सिद्धांत मांडले आहेत ती देखील करणे आहेतच.
अगदीच माहित नाही असं का झालं, पण घडलं खरं माझ्या हातून. आमच्या बाणेर रस्त्यावर एका ठिकाणी भव्य दिव्य अशी सन्मानीय श्री शिवाजी महाराजांची मूर्ती उंचावर स्थापन केली आहे. आणि अर्थात तिच्यावर काही अंशी सजावट किंवा देवळाला जसा कळस असतो तास आहे. पण दारं नाहीत. जाता येता महाराजांचं दर्शन सहज घडतं. इतक्यांदा मी त्यांच्या समोरून गेले पण अचानक माझे हात जोडले गेले अगदी मनापासून आणि मनात म्हटलं "शक्ती, बुद्धी आणि युक्ती दे", बहाल कर तुमच्या सारखी किंवा इतकी मोठी नाही पण सातत्याने हे महत्वाचे. इतकं वेगळं वाटलं माझं मलाच कि ते शब्दात पेरणे अशक्यच.
नतमस्तक व्हा अगदी मोकळे पणाने, सर्वांसमोर जेव्हा मनापासून साद येते तेव्हा नक्की.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा