रविवार, ३० नोव्हेंबर, २०२५
2317: The Discipline of Visual Reinforcement
2316: The Ecosystem of Self-Satsang
The truth behind the saying, "It takes a village to raise a child," is crystal clear now, to me. It emphasizes that our surroundings, our ecosystem are paramount.
In recent times, this truth constantly intersects with another crucial mandate: "Love yourself."
The link is crystal clear: Our immediate environment, or what we might call our 'Satsang' (Positive Association) comprised of like-minded, solution-oriented, and visionary people is vital. But we must acknowledge that we are the foundation of our personal environment.
While we cannot control others' thoughts, we have absolute dominion over the air we breathe internally. This means our self-talk, the way we speak to ourselves can either make or break us.
The individual is made up of their internal states and external actions / representations (back end and front end in technical language). Think of it like soil: it does not judge, it simply grows whatever is seeded. If we seed healing, love, and nourishment internally, that forest will grow, nurture us, and reach others around us.
This leads directly to the most vital instruction (just like the air hostess in an airplane): Self-oxygen first.
Heal yourself inside and out. It reflects in your walk, your talk, and your entire vibration. This healed energy slowly and steadily creates a uniquely different atmosphere around you, one that naturally attracts and benefits your entire 'village.'
Pl listen to the audio narration to know more, here is the link:
शनिवार, २९ नोव्हेंबर, २०२५
2315: From Foodie to Monarch
It is true that for many, following a strict diet appears to be a global fad, often inspired by celebrities and public figures. For these renowned personalities, maintaining a disciplined regimen, with restricted food and consistent physical training, isn't a choice; it is a mandatory requirement of their royal status and visibility. Their figure is part of their professional identity.
As someone who truly lives to eat, I initially found the necessary food restrictions, like the "no sugar, no oil/ghee" mandate lovingly insisted upon by my healthcare professional son and of course my dietician and team of doctors to be a form of punishment.
But now, I've realized the third, crucial side of this coin.
Accepting these dietary boundaries is a voluntary act of self-governance. It mirrors the demanding discipline required of any monarch or celebrity. I am no longer merely restricting myself; I am performing a mandatory duty to my own well-being.
This shift in perspective is the highest source of live learning: learning to distill the positive and necessary points from every constraint around you.
I now welcome all food restrictions, as they deliver the deep satisfaction of being in complete command of one's own vessel. To all those navigating diet recommendations: You ate well, you loved food, and now you have embraced a higher self-discipline. Enjoy the restricted course; you have achieved a celebrity status of the self.
गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०२५
२३१४: निवडक सांस्कृतिक स्वीकार
आदरपूर्वक एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे आपण भारतीय, विशेषतः मध्यमवर्गीय समाज, जगभरातील फॅशन, खानपान आणि उपभोग घेण्याच्या पद्धती अत्यंत वेगाने स्वीकारतो. परदेशी 'टेस्ट' आणि 'स्टाईल' स्वीकारायला आपल्याला कोणताही संकोच वाटत नाही.
पण जेव्हा सामाजिक स्वायत्तता (Social Autonomy) स्वीकारण्याचा विषय येतो, तेव्हा मात्र आपला स्वीकार निवडक (selective) असतो.
अमेरिकेत अनेक वर्षे वास्तव्यास असताना मी पाहिले आहे की, कोणत्याही वयोगटातील अनेक लोक आनंदाने एकट्याने राहण्याचा किंवा अविवाहित राहण्याचा निर्णय घेतात. महत्त्वाचे म्हणजे, त्यांच्या निर्णयाचा तिथे आदर केला जातो. कोणीही त्यांना त्रास देत नाही किंवा अनावश्यक चौकशी करत नाही.
जर आपण परदेशी पाककृती आणि कपड्यांची स्टाईल इतक्या सहज स्वीकारू शकतो, तर व्यक्तीच्या 'एकटे' राहण्याच्या निर्णयाचा आदर का करू शकत नाही? तो आदर आपल्या सामाजिक प्रणालीचा भाग का बनत नाही? भारतात, जो व्यक्ती स्वतः एकट्याने राहण्याचा निर्णय घेतो, त्यापेक्षा आजूबाजूचे लोकच अधिक बेचैन का दिसतात?
ती व्यक्ती तुमच्याकडे अन्न किंवा आश्रय मागत नाही. मग इतरांनी त्यांच्या आयुष्यात अकारण ढवळाढवळ का करावी? 'जगा आणि जगू द्या' (Live and Let Live) या साध्या नियमाचा वापर का केला जात नाही?
जर आपण जागतिक संस्कृतीतून काही ट्रेंड्स स्वीकारत असाल, तर ते पूर्णपणे स्वीकारावे लागते; सोयीनुसार त्यात निवड करता येत नाही.
म्हणून, यापुढे 'अनावश्यक हस्तक्षेप' करणाऱ्यांसाठी हे दोन नियम लक्षात ठेवावेत:
५-सेकंदाचा नियम: जी समस्या तुमच्याशी संबंधित नाही आणि जी ५ सेकंदांत सोडवता येत नाही, त्याबद्दल तक्रार करणे किंवा चिंता करणे त्वरित थांबवा.
अधिकार नियम: तुम्ही त्या व्यक्तीचे आयुष्य जगलेले नाही, तुम्हाला त्याच्या/तिच्या सर्व परिस्थितीची पूर्ण माहिती नाही. मग त्यांच्या निर्णयावर भाष्य करण्याचा किंवा त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?
2313: The Selective Borrowing
With due respect, it's observed that we, particularly the urban middle class in India, have wholeheartedly welcomed global trends in food, fashion, and consumption. We borrow styles and tastes from around the world without hesitation.
Yet, there is a selective resistance when it comes to adopting global social autonomy.
I recall my years in the USA, where I observed many individuals happily maintaining single status across various age groups. Crucially, their decisions to live alone were generally respected; no one felt the need to interfere or question their chosen lifestyle.
If we are so quick to imbibe global fashion and culinary trends, why do we hesitate to integrate this fundamental respect for individual autonomy into our social system? Why are others often more restless than the individual who has made the conscious choice to live alone in India?
That single individual is not asking for shelter or support. The best approach is to simply "live and let live," offering support only if genuinely needed. Unnecessary interference and constant questioning provide no gain to the questioner, only stress to the individual.
If we choose to follow trends from other cultures, we must follow them completely, not just the parts that fit our immediate comfort.
For those prone to unsolicited advice, consider these two rules of thumb:
The 5-Second Rule: If the issue cannot be fixed in five seconds, acknowledge it, and then drop it. Do not dwell or complain about decisions that are not yours to make.
The Authority Rule: You do not know everything about that individual. You have not lived their life. On what basis do you assume the authority to question or judge their choices?
गुरुवार, २० नोव्हेंबर, २०२५
2312: The Flavor Bomb
I am much more than a foodie; I love food, I live for food. When I was at my beloved Orange City (Nagpur), I used to cherish one of the breakfast dishes called Upma, with or without any condiments. But when I reached the City of Nizams (Hyderabad), they automatically served spicy chutney with Upma. I love to try new things and immediately fell in love with that combination too. Since then, I prefer to have Upma with spicy chutney.
Now I realized the "why" behind the chutney. No matter what the base taste of the Upma is, the chutney takes care of everything. You could even say it overpowers the main dish. The taste is so complete and compelling that the Upma becomes secondary. Hence, they must be focusing more on the chutney than the Upma, in my opinion.
You have a choice: focus primarily on the main dish and serve only that. Or, the option is to focus intensely on that tiny side dish and win. What say?
मंगळवार, १८ नोव्हेंबर, २०२५
2311: The Magic of Minor Shifts
I recently visited one of my neighbor's flats on the highest floor of my building. The flat’s orientation is slightly different, perhaps due to Vastu principles. It’s the same building, the same dimensions, and the same size as my own flat, yet with her authentic and simplistic decor, and a slight change at the entry door, I suddenly felt how large her space was. Her flat looked significantly more spacious than mine, in the very same building.
This proves that by slightly changing our orientation or perspective, things will change. Completely new insights will pop up, allowing us to experience that "aha!" moment. This principle applies to all areas of life and should truly be an iterative process—something we do every now and then to enjoy the thrill and the difference it makes.
रविवार, १६ नोव्हेंबर, २०२५
२३१०: जमिनीवरचे ढग
लहानपणापासून मी फक्त जमिनीवर उभी राहून ढग बघितले. मग जेव्हा असंख्य वेळा विमान प्रवास केला तेव्हा घाबरून फक्त डोळे बंद करूनच बसले, किंवा बहुतांशी प्रवास हे अपरात्री होत असल्यामुळे डोळे बंद असल्याचे, बाहेर अंधार असायचा. पण जशी माझी पिल्लं मोठी झाली, किंवा त्या नंतर माझा एकटीचा प्रवास सुरु झाला तेव्हा चार डोळ्यांनी बाहेरचा नजारा फक्त बघतच राहिले, तेव्हा ढगांवरून ढगांचे कुटुंब, वस्ती, पळापळ, धावपळ सगळं म्हणजे सगळं भरभरून टिपलं. तेव्हा का कुणास ठाऊक भीती कशी पळून गेली आणि कुठे गेली, पत्ता देऊन नाही गेली असं काहीसं. त्यामुळे माझी त्या ढगांशी वेगळीच दोस्ती आहे, एक वेगळं नातं आहे. आज मी पुन्हा एकदा जमिनीवरचे ढग अनुभवले. पुन्हा एकदा ह्या करता कारण ह्या आधी पण असा नजारा बघितला होता पण आज त्याला बघण्याचा नजरीया बदलेला आढळला. फक्त विचार करा मंडळी, एक तर जमिनीवर पाय रोवून उभं राहायचं, त्यात सर्वत्र ढगच ढग, आच्छादलेलं सर्वत्र, हे काय कमी होतं म्हणून दिग्गज समोर बसलेले, प्रेक्षक दोन्ही पद्धतीने न्याहाळत असलेले ऑनलाईन आणि ऑफलाईन सुद्धा, भन्नाट वाद्यवृंद, हे सगळं असतांना स्पर्धात्मक पद्धतीने गाऊन जिंकायचं प्रचंड मोठ्या कॅमेरांच्या, ड्रोनच्या गर्दीत, बाप रे. हे काय कमी होतं म्हणून गाणं सादर करतांना आपलाच स्वर, सूर, ई. आपल्यालाच ऐकता यावं म्हणून असेल ईअर फोन कानात नीट राहावे म्हणून लावलेल्या चिकटपट्ट्या...
अगदी आत्ताच मी इंडियन आयडल च्या नवीन भागाचे प्रत्यक्ष प्रसारण बघून, आनंद घेऊन उठले. थक्क व्हायला झालं पुन्हा एकदा. काही गायक इतके लहान आहेत वयाने पण सादरीकरण अगदी पहाडी.
ढगात उभे राहणं भलभलत्यानां अशक्य, आणि हे संपूर्ण ताकदीने, आत्मविश्वासाने सादर करतात, त्यात विविधता आणतात, त्यांचे रंग भरतात. नो वंडर ढग जमिनीवर येऊन ते ऐकण्याचा मोह टाळू शकत नाहीत. कमाल आहे, सर्व गायकांना माझा सलाम, ढगाएवढा.
शनिवार, १५ नोव्हेंबर, २०२५
माझ्या मते
माझ्या मते
मेंदूचं सगळा विचार, आचार आणि दिशादर्शकाचे काम करतो,
इतर अवयवांना सूचना देतो
आणि नाव मात्र माझे होते
हृदय रक्ताभिसरण करतं, पोटऱ्यांशी संवाद साधतं
अविरत धडधड सुरूच ठेवते,
कार्यरत राहते, मला अग्रक्रमी ठेवते,
आणि नाव मात्र माझे होते
पाय सर्वत्र नेतात, गाडी चालवतात, चढ उतार करतात
त्यांच्याच मुळे मी हव्या त्या ठिकाणी वेळेआधी पोचते
आणि नाव मात्र माझे होते
पाच इन्द्रेन्द्रिय त्यांचे कार्य करतात,
बघायला, ऐकायला, चव घ्यायला, सुवास आणि स्पर्शाची जाणीव देतात,
आणि नाव मात्र माझे होते
मी हाडाची शिक्षिका
गळ्याने, स्वरयंत्रानेचं संपूर्ण कार्य सिद्धीस नेले
आणि नाव मात्र माझे झाले
गुरुत्वाकर्षण, हवा, पाणी, माती, इतर जिवाणू
आणि इतर सगळे वैज्ञानिक सिद्धांत आहेत म्हणून
माझे अस्तित्व आहे,
ते घडवून आणतात सगळे
मी खरं तर फक्त नाममात्र आहे
आणि हेच त्रिवार सत्य आहे
मग माझ्या नावात काय आहे?
शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०२५
2309: Vital team
On this same vibrant platform, I keep observing photos celebrating team lunches. I've also heard for many years, especially in the software industry, about teams going out for lunch after a successful deployment of their software, code, or module. In general, we are all very well acquainted with the importance of teamwork, whether at the office, on the home front, or everywhere else. Every achievement is definitely the result of teamwork, requiring support provided seamlessly, effectively, and constantly at different levels.
Today I am going to shed light on a similar, yet vitally important, team. To me, a team requires collaboration, communication, coordination, connection, and much more. Only with these features can teams work wonders.
Almost every day, some of us keep praying for our own physical fitness and mental wellness, right? Until now, this meant to me that all the organs in the body were working fine, functional, and happy. But it’s more than that. Every entity working fine is not sufficient; it has to be in a group, in a team, and in coordination for sure. The back-end or inner engineering of our body is a team; it must work as a group, not in silos, otherwise nothing can be accomplished for the individual.
We are human beings, and syndromes like "Why me?", "Why should I do everything?", or "Others are sitting silently, enjoying themselves, and only I am working" are very common. These thoughts are always 'up,' ready to fight and make unnecessary comparisons with others. Just imagine if our inner self decides to do this. What would happen then?
And occasionally, some of our inner parts do show their presence (as illness). We fix it temporarily with antibiotics and move on because we don't make time or rather, we fail to pay attention and accept that we are nothing without the teamwork of our inner entities.
So, let's take an oath to take care of all of them, talk to them, and thank them. Definitely do this for your physical and mental "back-end supporters," but don't forget your loved ones, making sure to take utmost care of them which is essential to doing well at inner-engineering levels, too.
2308: The Grass Isn't Greener
Since ages I felt guilty being a full time working mom, and hence never spent enough time with kids when they needed me the most. I literally curse myself badly and consistently, well, till date.
Suddenly from past 3-4 months I am observing something different. I came across many moms, new and experienced, in offline and online modes. They started sharing their thoughts opening, well, not to mention but it was clearly visible in offline mode via their actions. The actions speak louder than words and I became just the observer. In an online mode, via multiple mediums and that too one after the other, via celebrities, well known figures, experienced moms the same stories in different forms popped up in front of me. I was clueless why its happening? And the answer is very simple, it was crystal clear but it took time for me to understand "to pacify me that I am not the only one, there are equally suffered moms and those who are (extremely sorry to say, with due respect and no comparison) worst than what I behaved with my kids at home." This is how it is. The grass only looks greener on the other side from far. That's it. Some are bold enough to agree and others are not.
With so many use cases produced in front of me every now and then, now its my duty to leave that feeling completely aside and live guilt-free life. Whatever happened is history. Let's live and let live now. Can't change the past at all.
2307: The bill drill
The modern rhythm of life is a continuous drill. We rise, we hustle, our digital purses begin to fill. But before those hard-earned funds can ever stand still, A relentless, everyday parade hits us with a new bill.
There's the grocery haul, the weekly fuel, the service-provider bill, A non-stop financial drumbeat giving us a constant chill. We navigate the expenses, trying not to spill The budget with a single, unplanned purchase, against our best will.
It’s an uphill climb, a never-ending financial drill, Just to keep the status quo and swallow the monthly pill. After the aggressive payments are done, what’s left? It’s often close to nil.
And that’s the true cost: No wonder this generation says, "A wedding? Kids? We'll just chill." We are too busy mastering the financial drill To willingly take on a bigger emotional and monetary hill.
मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०२५
२३०५: वळी दोघांना, मंगळसूत्र एकाला?
मला फक्त महाराष्ट्रीयन चालीरीतींबद्दल ठाऊक आहे, पण भारतात बहुतांशी सर्वत्रच असे आढळते, काही किंचित बदल इकडे तिकडे, एवढेच. लहान बाळ जन्माला आलं की त्याच्या हातात काळ्या मण्यांची वळी घातली जातात. काही घरांमध्ये परंपरागत चालत आलेले वळे घातले जाते आणि शिवाय त्याच्यासाठी खास नवीन पण केले जाते. असंख्य प्रकाराने ती वळी नटलेली, सजलेली असतात, पण बहुतांशी एक सोन्याचा मणी आणि त्यानंतर काळा मणी अशी ती वीण असते. थोडक्यात काय, तर काळे आणि सोन्याचे मणी विणून तयार केलेला सुबक सुंदर दागिना त्या नवीन बाळासाठी.
माझ्या माहितीप्रमाणे हा असा दागिना मुलगा झाला तरी केला जातो अगदी कौतुकाने. बऱ्याच घरी आजी-आजोबा करून आशीर्वाद म्हणून बारश्या दिवशी भेट देतात. नाहीतर आई-वडील नक्कीच करतात. त्यात सोनं किती घातलंय हे महत्त्वाचं नसतं. ते काही जणांच्या मतांप्रमाणे नजर लागू नये म्हणून घालतात, किंवा बाळाच्या गुटगुटीत हातात सौंदर्याची भर पडावी म्हणून घालतात किंवा सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सोन्याचे पाणी जावे म्हणे अंगावरून, ते चांगलं असतं. त्याला कोणी बचत ह्या आरशातून बघतात, तर कोणी शान म्हणून पण. असो.
तर असं आपण मानलं की हा उत्कृष्ट दागिना मुलगा आणि मुलगी दोघांसाठी सारख्याच पद्धतीचा केला जातो, भेदभाव न ठेवता, तर मग एक यक्ष प्रश्न मला पडला आहे आता. तो विचारण्याआधी थोडंसं अजून काही ह्या दागिन्यांसंबंधी.
आताशा गेले काही वर्ष हातात परिधान करण्याच्या मंगळसूत्राची फॅशन आली आहे. बहुतांशी सर्वजणी, मुख्यतः ज्या नोकरी करणाऱ्या मुली आहेत, त्या ह्याला पसंती देतात आणि परिधान करतात देखील. ह्या नाविन्यपूर्ण दागिन्यांसंबंधी मी ह्या आधी लिहिलं आहेच. आता एका वेगळ्या अर्थाने येथे मांडते आहे. पाश्चात्त्य पद्धतीचा ड्रेस जर घातला, तर त्यावर पारंपरिक भारतीय मंगळसूत्र बरं दिसत नाही, पण घालावं लागतं, घालावंसं वाटतं म्हणून हा पिटुकला बदल. तुम्ही ह्या नवीन दागिन्याला नीट बघितलं आहे का हो? असेल तर तुम्हाला तो लहान मुलांच्या वळ्यासारखा नक्कीच दिसेल/भासेल. मला तरी अगदी तसेच वाटले जेव्हा मी हातातले मंगळसूत्र पहिल्यांदा बघितले. माझ्या दोन मुलांची वळी एकत्र करून घालण्याचा मोह आवरता आला नाही मला. फक्त लांबीमध्ये बदल आहे आणि अर्थातच फॅशनमध्येसुद्धा. दोन्ही दागिन्यांमध्ये प्रचंड विविधता उपलब्ध आहे. खूप सुंदर प्रकार दुकानात पाहायला मिळतात.
मुलं लहान असताना, अगदी शाळेत जाण्याच्या वयापर्यंत जर ती वळी घालतात दोघांना (मुलाच्या हातात देखील), मग लग्न झाल्यावर फक्त मुलींनाच हे बंधन किंवा अट्टाहास का? असे हातातले मंगळसूत्र मुलांनी पण घालावे. कळू दे ना समाजाला ह्याचं पण लग्न झालंय ते. अर्थात काही फरक पडणारच नाही आहे, पण सक्ती नको. बचत म्हणून बघताय तर, किंवा रूढी परंपरा ज्या आधुनिक होत चालल्या आहेत, आणि अश्या पद्धतीने ह्यात भरच पडणार आहे, काही कमी होत नाहीच आहे. किंबहुना मुलीच्या एका टिपिकल मंगळसुत्रात दोघांची हातातली होतील, बघा विचार करून.
नाहीतर आताशा बरीच मुलं मुलींसारखी वेशभूषा, केशभूषा, आणि आभूषणं परिधान करतातच, मग अजून एक भर त्यात? काय म्हणताय मंडळी? सर्वसमभाव किंवा दोघे महत्त्वाचे, किंवा लग्न झाल्याची पावती/निशाण इत्यादी. तुम्हाला हवे तसे बघा आणि जमल्यास आचरणांत आणा. सहज सुचलं म्हणून हा पंक्ती प्रपंच.
2304: The Power of Verbal Gratitude
I recently found myself with a moment of available free time, indulging in my favorite pastime: watching TV and admiring the craft of good actors. I spotted a simple scene that completely shifted my perspective on enjoying life's smallest pleasures.
It was just two characters having tea. The girl casually told the boy, "Whenever you get the chance, slurp your tea without holding back. Make a nice, loud sound!"
The boy was understandably stunned. We've all been taught the exact opposite, politeness demands silence while consuming food or drink. "Why would you say that?" he asked.
Her answer struck me with such force that I had to rewind it. She said: Of our five main senses, our eyes can see the steam rising from the cup, confirming the warmth. Our skin confirms the hot temperature when we hold the cup. Our nose gets the beautiful, fresh aroma. Our tongue tastes the excellent flavor.
But what about our ears? We deliberately exclude them from this beautiful sensory experience. Why? Let the ears participate! Let them also know how truly wonderful this ambrosial tea is. That sound is a confirmation of pleasure. So, when the moment is right, slurp away!
As a teacher who does a lot of talking, I rely heavily on good tea for my throat, so I am already a devoted fan of the brew. But that scene sparked a deeper reflection.
Is just slurping enough? No. The girl's wisdom about the fifth sense made me realize we are missing the most important way to engage our sense of hearing, our voice, in the process of eating.
Following the principle of 'Annam Brahma' (Food is God/The Ultimate Reality), we should treat every meal not just as sustenance, but as a sacred transaction. This means using your voice not just to confirm pleasure, but to convey gratitude.
It's time to intentionally include our voice by following a simple protocol:
Thank the Provider: Offer sincere appreciation to the person who brought the food to you.
Affirmation: If you cooked it yourself, affirm that it turned out well!
Give Specific Praise: Make a point of thanking the mother, sister, aunt, daughter, or anyone who prepared the meal. Give them genuine, positive feedback.
Acknowledge the Joy: Express that you feel truly blessed or satisfied after tasting the dish.
Focus on the Effort: Speak about the benefit the meal gives you, focusing on the energy, time, and ingredients invested, not just the final flavor.
We often default to commenting only when something is wrong—the salt is low, the spice is high—and we often do this critique publicly among family members. If we have spent years criticizing, let's now consciously use the other side of the coin. I don't know what change it will bring in the person across the table, but I guarantee you will experience immense internal satisfaction.
I know some of you will ask the practical question: "What if I really don't like the dish? What if the salt is genuinely low or it's too spicy?"
Here's my teacher's advice on that:
If the salt is low: Discreetly add salt to your portion and move on. Everyone's palate is different.
If it's too spicy: Take smaller bites, balance it with other dishes, drink water or buttermilk, or have a sweet item in between.
If all else fails: Cook a dish yourself and serve others, or simply fast. Fasting is excellent for your health.
Remember to shift your focus from the immediate taste to the larger process: the labor, the ingredients, the time, and the energy that went into the preparation. Criticizing the taste is not a useful option; it achieves nothing positive. Instead, it only creates distance and damage that is hard to repair. Therefore, be mindful and deliberate in your actions.
So let’s start now, with our next cup of tea or our next meal. Let's slurp with gusto, and more importantly, let's sow the seeds of appreciation.
२३०३: पंचेंद्रिय अनुभव
मला सध्या हातात थोडासा मोकळा वेळ आहे, टीव्ही बघायला आवडतो, काही कलाकारांची कामे खूप आवडतात, ते कलाकार कला सादर करताना आवडतात, इत्यादी. अनेक कारणे आहेत ज्यामुळे मी मस्त एन्जॉय करते आहे. एवढ्यातच एका सिरीयलमध्ये एक दृश्य होतं, त्यात एक मुलगा आणि मुलगी चहा पिताना दाखवले आहेत. ती मुलगी म्हणते, "जेव्हा जमेल तेव्हा बिनधास्त चहा ओरपून प्यायचा, मस्त आवाज करतं." त्याला महद आश्चर्य वाटतं ते ऐकून. किंबहुना चहा पिताना आवाज करायचा नाही असं नेहमी म्हटलं आणि शिकवलं जातं, आणि ही अशी का म्हणते आहे?
त्यावर तिने दिलेले उत्तर किती योग्य आहे ते बघा. तर ती सांगते की आपल्या पंचेंद्रियांपैकी डोळ्यांना दिसतं की चहा किती वाफाळलेला आहे, कारण ते वाफ बघू शकतात. त्या चहाच्या कपाला हात लावला की कातड्याला समजतं की चहा गरमागरम दिला गेला आहे. सुंदर सुगंध येतो ताज्या चहाचा आणि नाकाला कळतं. जीभ चव घेते त्या उत्कृष्ट चहाची. पण कानांचे काय? त्याला तर आपण सामावून घेत नाहीच ह्या सगळ्या सुंदर अनुभवात, असं का? त्याला पण कळू दे ना की हा चहा किती उत्तम आहे, चहा / त्याला उगाच अमृततुल्य असं संबोधत नाहीत. म्हणून जमेल तेव्हा बिनधास्त ओरपून चहाची मजा घ्यायची, म्हणजे कानांना पण समजेल. नाही का?
हे मला खूप म्हणजे खूपच भावलं, कारण मी एक शिक्षिका असल्यामुळे, प्रचंड बडबडी असल्यामुळे घश्याला सतत चहा लागतो, मी त्याची पण भक्त आहे.
सहज एक विचार ह्यावरून मनात डोकावला तो असा की फक्त ओरपून पिणं पुरेसं आहे का? तर नाही. मग काय काय करता येईल? तर मला असं वाटतं की फक्त चहाच नाही, तर "अन्न हे पूर्णब्रह्म" ह्या नियमानुसार प्रत्येक पदार्थ चाखल्यानंतर:
तो पदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचविणाऱ्यांना धन्यवाद द्या.
तो पदार्थ जर तुम्ही केला आहे, तर म्हणा तो मस्त झाला आहे.
आवर्जून आई, ताई, मावशी, मुलगी ज्यांनी कोणी हा पदार्थ केला आहे, त्यांना धन्यवाद द्या, अभिप्राय द्या.
तो पदार्थ चाखून तुम्ही धन्य झालात हे सांगा.
तो पदार्थ सेवन केल्यामुळे तुम्हाला जो फायदा झाला, त्याबद्दल बोला, तुमचे कान तृप्त नक्की होतील.
आणि असे इतर अनेक मार्ग आहेत ज्यामुळे तुमचा पाचवा इंद्रिय देखील सामील होईल सगळ्यात, नाही का?
नाहीतर नेहमीच आपण फक्त पदार्थ चांगला झाला नाही तरच भाष्य करतो आणि ते देखील आपल्या लोकांसमोर. ते जर आपण सवयीनुसार, आजूबाजूला बघून अनेक वर्ष करत आलो आहोत, तर आता नाण्याची दुसरी बाजू बघा, ती वापरून बघा. समोरच्यात काय बदल होईल का नाही होईल हे मला ठाऊक नाही, तुम्हाला मात्र प्रचंड समाधान मिळणारच.
चला तर मग ओरपायला आणि कौतुकाचे बीज पेरायला सुरुवात करू यात आत्ता पासूनच.
हे वाचून मला खात्री आहे काही जण निश्चित एक प्रश्न विचारतीलच, "जर आम्हाला एखादा पदार्थ आवडलाच नाही, तिखट लागला, मीठ कमी झालं असलं तर? तरी कसं म्हणायचं की मस्त झालंय म्हणून?" त्याची उत्तरं ही अशी: मीठ कमी झालंय, वरून चुपचाप लावून घ्या, प्रत्येकाची चव वेगळी असते. तिखट जास्त झालंय, त्या पदार्थाचा छोटा घास घ्या, इतर पदार्थांवर ताव मारा किंवा वेगळं काही खा, गोड खा मध्ये मध्ये, पाणी प्या, ताक मागवून घ्या. काहीच शक्य नसेल तर स्वतः करा आणि दुसऱ्यांना खाऊ घाला, उपास करा, उपवास तब्येतीला उत्तम असतो, हे लक्षात ठेवा. पदार्थ करण्याची प्रक्रिया, लागणारी सामग्री, शक्ती, वेळ इत्यादीवर लक्ष असू द्या, फक्त चव नाही. चव चांगली नाही ह्यावरून सुनावणे हा पर्याय नाहीच. त्यामुळे काहीच साध्य होत नाही, उलट सगळेच दुरावतात आणि नुकसान होते जे कधीच भरून निघत नाही. त्यामुळे विचारांती वागा मंडळी.
सोमवार, १० नोव्हेंबर, २०२५
२३०२: उत्साहाला स्थैर्याची जोड
आज मला समजलं, उमगलं की, एखादी मुलगी आई होणार असल्याची बातमी आली तज्ज्ञांकडून की कमीतकमी तीन महिने ती सर्वश्रुत होत नाही, होऊ देत नाही. त्याला तांत्रिक कारणे आहेत; तो नवीन गर्भ होणाऱ्या आईच्या पोटात स्थिर होणं आधी जास्त महत्त्वाचं. त्याला शारीरिक नियमांप्रमाणे किंवा बाळाच्या वाढीच्या आखून-राखून दिलेल्या पद्धतींप्रमाणे ९० दिवस लागतातच, कारण एक नवीन शरीर निर्माण होत असते आत, गंमत किंवा खाऊ नाही ना तो. इतकी गुंतागुंतीची प्रक्रिया असते ती की ज्याचं नाव ते. सगळं सुरळीत पार पडावं म्हणून हा नियम घालून दिलेला आहे औषधी शास्त्राने, समाजाने, आणि इतर सगळ्या स्तरांवरसुद्धा. किंबहुना, अनेकदा तर ते तीन महिने नकळतसुद्धा निघून जातात असा घाट पण अनेकदा घातलेला दिसतो निसर्गानेच, म्हणजे सांगायलाच नको, 'सुंठी वाचून खोकला...' असं काहीसं.
सांगण्याची सर्वांनाच प्रचंड घाई झालेली असते, कारण कारणंच इतकं गोड असतं, एक नवीन सदस्य येणार असतो घरी. मग अत्यानंदाच्या भरात सर्वांना सांगणे होतेच, पण ते टाळा. मग ती पहिलटकरिण असो नाहीतर दुसरी वेळ; काहीही झालं तरी प्रत्येक वेळी आई होणं, किंवा प्रत्येक वेळी बाळाला जन्माला घालणं हा वेगळाच अनुभव असतो.
अगदी तसेच माझ्या दृष्टीने नोकरीचे देखील आहे. नोकरी लागली रे लागली की सर्वश्रुत करण्यात काय गंमत आहे? हो, सर्वांनाच अत्यानंद झाला असतो, कारण एक नवीन टप्पा सुरू झाला असतो, एक वेगळेपण अनुभवायला सुरुवात झाली असते, आर्थिक स्वातंत्र्य मिळालेले असते; पण ह्याला अतोनात कष्ट करावे लागले असतात. मग थोडे थांबा, तेथे आधी रुळण्याचा, रुजण्याचा प्रयत्न करा, आजूबाजूचे वातावरण, लोक समजावून घ्या, तुमचे अस्तित्व निर्माण करा, कामाचा आवाका समजावून घ्या आणि मग सांगा जगाला. थोडं थांबून सांगितले तर काय हरकत आहे?
नवीन नोकरी म्हणजे नवीन बाळासारखेच नाही का? आंतरराष्ट्रीय स्तरावर हा शब्दोच्चार नेहमी वापरला जातो, उदाहरणार्थ: "PhD is your baby", "संशोधन किंवा त्या संदर्भातील संशोधन पत्रिका लिखाण is your baby". मग त्यात नोकरी ही पण तुमचेच बाळ आहे आणि त्याला तुम्हाला हळूहळू नर्चर करायचे आहे, पाणी, खत घालून सिंचायचे आहे. त्याला वेळ लागणारच. त्यामुळे जसा नवीन गर्भवतीचा तीन महिन्यांचा नियम आहे, तसा तुमचा स्वतःचा एक नियम ठरावा. तुम्हाला वाटेल तेव्हाच सांगा. लिंक्डइनसारख्या वेबसाइट्सवर पद्धत आहेच सांगण्याची की 'थोडा उशीरच झाला सांगायला, पण माझ्या बाबतीत हे हे घडलं आहे, हे मी साध्य केले आहे' असे. काय हरकत आहे? करून तर बघा प्रयोग म्हणून.
अजून एक म्हणजे, जसा तुम्हाला अत्यानंद होतो नवीन नोकरी मिळाल्यावर, तसाच त्या कंपनीला पण व्हायला हवा ना? कारण त्यांना एक साजेसं, शिकलेलं, तयार, झोकून काम करणारं, हुशार, कंपनीला पुढे नेण्यात मदत करणारं व्यक्तिमत्त्व मिळालेलं आहे. मग ते का नाही हो उड्या मारत सोशल नेटवर्किंग साईट्सवर की 'आम्हाला इतका मस्त हुशार मुलगा/मुलगी मिळाली आहे आणि आम्ही खुश आहोत'. त्याची कारणे वेगळी असतील देखील, त्यांच्या पॉलिसित बसत नसेल, त्यांना गरज वाटत नसेल इत्यादी. काहीही कारणे असू शकतात, मग आपणच का सांगण्याची घाई करायची? काय मिळणार आहे सांगून? काही जणांकडून शाबासकी, बास! इतकंच. पण ते मेसेजेस फक्त नोकरी टिकवून ठेवायला कामी येत नाही; तुमची मेहनत, जिद्द, आत्मविश्वास, भरपूर झोकून वेळेत केलेली कामे, वेगळ्या पद्धतीने केलेली कामे इत्यादी कामास येतात. त्यामुळे तुम्हीच ठरवा, सोशल मीडिया आहे म्हणून सांगणे आवश्यक आहे हे गरजेचे नाहीच.
२३०१: गगनचुंबी कारण
आज मला समजलं, उमगलं की, काही गेल्या वर्षांपासूनच गगनचुंबी इमारती इतक्या का वाढल्या आहेत? बाकी जी ढोबळ मानाने कारणे आहेत, त्याशिवाय एक असं माझ्या दृष्टीने महत्त्वाचं कारण आहे. लिफ्टचा वापर करून किंवा जिना चढून आपण उंच मजल्यांवर गेलो आणि चारही बाजूंचे दृश्य बघितले की डोळ्यांचे पारणे फिटतेच. तो निसर्ग, तो टॉप व्युव्ह (bird eye view) बघून काहीतरी वेगळेपण निश्चित नजरेस पडते. जमिनीवरून दिसणारा तो रस्ता किंवा महामार्ग वरच्या मजल्यावरून नागमोडी वळण असलेला असा भासतो, एखाद्या चित्रकाराने जणू उत्कृष्ट चित्रच रेखाटले आहे असे काहीसे. वरून टीपलेला अँगल हा इतका वेगळा असतो की, त्यात एकाच वेळी रस्ता, डोंगर, आजूबाजूच्या इमारती, झाडं, आकाश, पक्षी आणि असं संपूर्ण चित्र दिसतं. इतक्या वर देखील झुळझुळणारा वेगळा वारा, त्याचा बदललेला वेग समजतो. असं म्हटलं जातं की, जितका वरचा मजला तेवढी हवा शुद्ध. वरून झाड बघणं आणि त्याच्या बुंध्यापासून बघणं ह्यात निश्चित फरक आहेच.
अनेक अशा पद्धती मी ऐकल्या, वाचल्या आहेत की, सत्संगतीचे महत्त्व, भरपूर पुस्तके वाचून आत्मसात करण्याचा फायदा, नेहमी सकारात्मक राहण्याचे सुख, नाण्याची दुसरी बाजू टिपण्याची सवय इत्यादी. आणि हे सगळं का करायचं, तर 'स्व' मध्ये बदल घडण्यासाठी, स्वनिर्मितीसाठी, आणि एक जण असा बदलला की, त्याच्या संपर्कात येणारे, त्याला बघणारे, त्याच्यासोबत काम करणारे मग बदलायला लागतातच.
आताशा फक्त वास्तू ही उंच मजल्यांवर नसते, तर दिवसभर देखील कचेरीत आपण वेगळ्या मजल्यावर काम करतो. हॉटेलमध्ये जेवायला जातो तेव्हाचा मजला कदाचित वेगळा असतो. मित्रांकडे जातो, कामाला वेगळ्या कचेरीत जातो, आणि इतर काही कारणांनी विविध मजल्यांवर, विविध ठिकाणी जाणं होतं. आणि आवर्जून जर काही क्षण बाहेरचा नजारा बघण्यासाठी राखून ठेवले, तर मजा, आनंद, अनुभव इत्यादी द्विगुणित नक्कीच होणार. आता ह्यापुढे जेव्हा वेगळ्या मजल्यावर जाल, तेव्हा नक्की बाहेर डोकावून बघाच आणि सांगा कसं वाटलं ते.
आपण जितक्या उंच पदावर जातो, तेवढे पाय घट्ट रोवून उभे राहतो, प्रगल्भ होतो. जितके वय जास्त, तितकी समज जास्त. जितका अनुभव जास्त, तितके समाधान जास्त. जितके आध्यात्मिक ज्ञान जास्त, तितकी स्वच्छ नजर, विचार आणि आचार सुद्धा. मग जर यदाकदाचित सत्संगाला वेळ नाही, नाण्याची दुसरी बाजू बघायला शक्य नाही, पुस्तके वाचून आत्मसात करणे सध्या अवघड, तर मग 'तो' तुम्हाला उंचीवर मुद्दाम नेऊन बसवतो आहे. त्यामुळे अगदी सहज रित्या तुम्ही एकतर त्या उंचीवर आहात हे टिपता, उंचीवर दिसणारे नजारे कसे असतात हे समजतं, आणि कदाचित तसे होण्याचा प्रयत्न आपोआप होतो. उंचीवरच्या गार आणि शुद्ध हवेचं महत्त्व समजतं, आणि मग अशी वैचारिक, आध्यात्मिक, भावनिक, सामाजिक, आणि सर्वच पातळीवर उंची गाठण्याचं महत्त्व समजेल आणि तशी वागणूक होईल, ह्यात शंका नाहीच.
हे खरं कारण असावं माझ्या दृष्टीने. कारण राहतं घर जर उंच मजल्यावर आहे, आणि तेथे आपण रोज किमान ४-५ वर्ष राहिलो, तर किती सुंदर फरक पडेल. असं सातत्य कदाचित वाचनात, सत्संगात, आणि इतर ह्याच्यात येणं अवघड, म्हणून हा सोप्पा मार्ग "त्याने" फक्त दाखवला नाही, तर तो सर्वश्रुत केला.
२३००: मशीन लर्निंग ची दुसरी बाजू
मला अजूनही तो दिवस, छे छे ते दिवस जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे ठाकले आहेत, जणूकाही आत्ता ह्या क्षणी ते माझ्यासोबत घडत आहे आणि ते मी अनुभवत आहे, ताजेतवाने असे. माझ्या छोट्याश्या मेंदूला आठवते त्याप्रमाणे मी तेव्हा पाचवीत असेन आणि आम्हा सर्वांना एका भन्नाट गुहेत नेण्यात आले. "काय वर्णू तुझे गूण, अल्पमती नारायण" अशी माझी थोडक्यात अवस्था झाली होती तेव्हा. काय ती खोली, काय तो गारवा, काय ती सजावट, म्हणजे सगळंच ह्या विश्वाबाहेरचं होतं जणू. हे मी खरंच अनुभवत होते ह्यावर माझा अजिबात विश्वास बसला नाहीच.
त्यानंतर काय, बहुतांशी रोजच, किंवा आठवड्यातून काही दिवस आम्ही त्या मंदिरात प्रवेश करू लागलो. अगदी बूट, मोजे, किंवा तत्सम सगळं पायताण प्रकार त्या गुहेबाहेर काढूनच आत प्रवेश मिळायचा. त्या ज्या काही जादू आता होत्या त्या बघायला, हाताळायला मिळणार हेच डोक्यात होते, त्यामुळे 'बूटं बाहेर काढा' म्हटलं की काढायचं, बास! एवढंच ठाऊक आम्हाला तेव्हा. 'का? काय होतं नाही काढलं तर?' यासाठी वेळ कोणाला होता हो! काय आमच्या शाळेने आम्हाला खजाना उघडून दिला होता! संगणक लॅब आमच्या शाळेत सर्वप्रथम, राज्यात/शहरात प्रथम असं काहीसं. त्या संगणकाला म्हणे धूळ सहन होत नव्हती तेव्हा, म्हणून हा सगळा द्राविडी प्राणायाम. किंवा तेव्हा संगणक वातानुकूलित यंत्रणेशिवाय चालत नसे म्हणून ती गुहा आणि स्वच्छता इत्यादी.
आता देखील तीच मी, आणि झालेले प्रचंड बदल "ह्याची देही ह्याची डोळा" अनुभवले आहेत. आता संगणक शहाणा किंवा प्रगल्भ झालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीच. कारण गेली कित्येक वर्ष मी बघते आहे की संगणक लॅब "जगी, स्थळी, पाषाणी" सर्वत्र आहे. कुठेही संगणक मांडले आहेत विविध कामांसाठी, व्यवसायासाठी. आणि बिनधास्त झालेत ते सगळे. धूळ, चप्पल, बूट, पंखा, नो-पंखा, आता सगळं म्हणजे सगळं चालतं हो त्याला. धुळीच्या ॲलर्जीवर औषधं घेऊन बरा झालाय पठ्ठा म्हणे! त्याला आता काहीच फरक पडत नाही. हो, काही मोठे बंधू आहेत, ते मात्र वातानुकूलित जागेतच पहुडले आहेत अजून देखील, किंबहुना त्यांना तेच भावतं (सर्व्हर्स हो आपले). पण जर हेच बंधू विविध देशात पहुडले असतील तर (क्लाऊड) मग काय विचारूच नका! आणि आता काय "जेथे जातो तेथे तू माझा सांगाती"; कुठेही सापडतात तुकड्यातले संगणक.
बघा तर मग मंडळी, अंतर्बाह्य बदल कराच स्वतःत. काही ॲलर्जी, अटकाव वगैरे असेल तर पट्टाकिनी इलाज करा, "मस्त खा, स्वस्थ राहा" आणि पुढे चला, अगदी आपले अवयव, संगणकासारखे. त्याने पण क्रांती घडवली, मग आपण त्याच्याकडून शिकायला नको? प्रवाहपतित व्हायला नको? त्याच्या पावलावर पाऊल ठेऊन मार्गक्रमण करायला नको? फक्त त्यानेच शिकायचे का आपल्याकडून सतत (मशीन लर्निंग)? का? व्हाईस वर्सा इज ट्रू टू. मग पदर खोचा, बाह्या सरसवा आणि लागा कामाला. कात टाकणे आवश्यक हो. तेच जुने धरून चालू शकत नाही ह्या अत्याधुनिक जगात. आणि हे प्रत्येकाला, प्रत्येक ठिकाणी लागू आहेच.
२२९९: पद्धत बदला, प्रवाह नाही
मी अगदी लहानपणीपासून एकमेकांना प्रत्यक्ष भेटून सुसंवाद, सुखसंवाद साधतांना बघितलं आहे. तो काळ तसाच होता. पत्रलेखन हे भेटीचं एक महत्त्वाचं माध्यम होतं, त्याकरता वाट बघणं अनिवार्य होतं. पत्रलेखन ही एक कला आहे असं उगाच म्हटलं जात नाही, तर त्यातून माणूस माणसांपर्यंत पोचत असे. वाचतांना असे वाटे की, प्रत्यक्ष तो व्यक्ती समोर बसून सगळं व्यक्त करतो आहे. पुन्हा पुन्हा ते पत्र उघडून वाचत बसावंसं वाटावं असं लेखन असावं, म्हणून त्याला कलेची उपमा दिली गेली आहे. ती बोलकी हस्ताक्षरं, लिहिणाऱ्याचा स्पर्श आणि सुगंध देखील जाणवतो अनेकदा त्या पत्राद्वारे.
त्यानंतरचे साधन म्हणजे साधा फोन. आवाज ऐकता यायला लागला, वाट बघण्याची मर्यादा किंचित कमी झाली. छोटीशी क्रांती झाली आणि घरात फिरत फिरत बोलता येऊ लागलं, हँडसेट वेगळे झाले त्यामुळे अजून वेगळ्या पद्धतीने संवाद साधता आले. अर्थात, मग किंचित भेटी कमी झाल्या. मग काय विचारता, मोबाईल, सोशल मीडिया, रील्स असा भलामोठा प्रवास सुरू झाला.
संभाषणाची शैली संपूर्ण बदलली. ती आता प्रत्यक्षच्या ऐवजी अप्रत्यक्षच झाली आहे. लिखितच पण वेगळ्या पद्धतीने भेटीगाठी होऊ लागल्या आहेत जगाशी आताशा. त्यामुळे तंत्रज्ञानाचा आलेख जसा जसा शिगेला पोचला, तसतसा संवादाच्या रेखलेखाला प्रचंड उतरती कळा आली. एक तर आता भेटींना वेळच नाही, कारण मान मोडून काम सुरू आहे, दोन्ही स्तरांवर: एक म्हणजे कचेरीतले बदलत्या स्वरूपाचे काम आणि हे मोबाईलवरचे जगाशी संवाद साधायचे काम.
परंतु ह्यामुळेंना एक खूप मोठा फायदा झाला आहे. सांगते कसा ते.
मी मध्येच माझी नोकरी सोडून संपूर्णवेळ संशोधन करण्याचा निर्णय घेतला होता, म्हणजे विद्यावाचस्पती होण्याचे काम लवकर संपवता येईल. तेव्हा जरी हातात संशोधन संबंधी कामे होती, तरी एक मोठी पोकळी निर्माण झाली. नोकरीच्या शेवटच्या दिवसापर्यंत माझा मोबाईल आणि लँडलाईन कचेरीतील नेहमीच खणखणत असायचा, खूप लोकांशी संवाद होत होता. पण तो अचानक बंद झाला आणि त्याने मला खूप वेगळा अनुभव दिला, जसे की मी उपयोगाची नाहीच की काय, असा.
संशोधन संपवून मी पुन्हा नोकरी सुरू केली, ती अनेक वर्ष केली आणि आता स्वेच्छा निवृत्तीनंतर वाटलं की तशी पोकळी पुन्हा निर्माण होते की काय; त्याआधीच एका सुंदर विचारांनी मला तारून धरलं हो.
तो म्हणजे सध्या कार्यरत असलेल्या जेन झी (Gen Z) ला अशी उणीव कधीच भासणार नाही, कारण ते सतत ऑनलाईनच आहेत, असतात आणि राहणार, बदल नाहीच. खूप फोन, भेटी, संवाद, सुसंवाद, सुखसंवाद इत्यादी. ते एक दिवस अचानक फोन शांत असे माझ्या बाबतीत झालं, ते ह्या नवीन पिढीत होणे नाही. माझ्यासाठी तरी खूप काही शिकण्यासारखे आहे ह्यातून. संवाद सुरू ठेवा, पण पद्धत बदला, जसे जमेल तेव्हा, जितके जमेल तेव्हा.
माझ्या संवादांमुळे अनेकांना अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली, समाधान लाभले ते आठवा आणि वेगळ्या विश्वात रममाण व्हा. तेव्हा संवाद कसा होता, हे जरी आठवले तरी अनेक दिवस निघून जातील. पहिल्या माझ्या कामातून ब्रेकच्या वेळचे माझे वय, प्रगल्भता आणि आता ह्यात देखील जमीन आसमानाचे अंतर आहे. शिवाय सगळं ठरवूनच निवृत्ती घेतली असल्यामुळे तेवढा त्रास झाला नाही. छोटी-मोठी कामे देखील सुरू आहेतच; त्यामुळे संवादाची गती कमी झाली असली, तरी वेग कायम आहे, वेगळ्या पद्धतीने आता.
शनिवार, ८ नोव्हेंबर, २०२५
२२९८: लग्नाची 'ट्रकभर' कहाणी
माझ्या मते, १९९० सालची गोष्ट आहे ही. मी पहिल्यांदाच देशाच्या भल्यामोठ्या राजधानीतल्या एका पिटुकल्या गावात लग्नाला गेले होते. थोडक्यात सांगायचं झालं तर, अक्षरशः एक ट्रक भरून सगळं संसाराला लागणारं सामान दिलं गेलं मुलीसोबत लग्न झाल्यावर. कुठलीही छोटीशी गोष्ट, जिन्नस सुटला नव्हता. अगदी पुढील सहा महिने लागतील एवढे घरचे कपड्यांपासून सगळं म्हणजे सगळंच! माझी दाही बोटं तोंडात, अबब, असं काहीसं झालं मला. अर्थात ही प्रथा मला ठाऊक होती, बघितली होती; आपल्याकडे रुखवत असतं, त्याच भला मोठा भाऊ होता हा.
तेव्हापर्यंत किंबहुना आजपर्यंत मला हेच ठाऊक होतं किंवा मी गृहीत धरलं होतं की हा एक लग्नाचा भाग आहे, अविभाज्य घटक आहे. त्या मागची कारणमीमांसा मी करण्याच्या भानगडीत पडलेच नव्हते. आज अचानक त्यामागचं कारण आपोआप उलगडलं.
माझ्या किंवा त्या आधीच्या काळच्या लग्नाबद्दल मी ही सांगते आहे, आता सर्वच बदललं आहे. एक तर वय लहान, लग्नानंतरचे बदल प्रचंड, चालीरीतींपासून, खाणं-पिणं सगळंच वेगळं. आव्हानं खूप. त्यात जरी आईच्या घरी स्वयंपाक करणं माहित असलं, तरी मोजमापं सगळी बदललेली, माणसं, त्यांच्या आवडीनिवडी, चवी, शहर... सगळं म्हणजे सगळंच वेगळं. आई सारखी सासू किंवा त्यांच्या घरचं वातावरण असेल तर तगून जायचं, पण नसेल तर? म्हणून हा सगळा घाट.
त्या नववधूला काहीतरी ओळखीचं, आठवणींचं वाटावं, म्हणून सगळ्या जवळच्या नातेवाईकांनी, आईने, आणि इतर सर्वांनी मिळून तो संसार दिला असतो. सगळंच नवखं असण्यापेक्षा थोडं आपलंस असल्यावर, नवीन आयुष्याची सुरुवात करण्यास प्रोत्साहन मिळतं. किती सुंदर विचार आहेत हे! किती विचारपूर्वक ह्या रुखवताची सुरुवात केली आहे!
मी कलाकुसरीशिवाय असलेल्या रुखवताचा भाग म्हणते आहे हो इथे. कलाकुसरीचा भाग पण तितकाच महत्त्वाचा. त्या केलेल्या वस्तू, त्यात सर्वांनी केलेली मदत, ती लाडीगोडी, चिडवाचिडवी इत्यादी. सगळं आठवून दिवस पुढे जाण्यास मदत नक्कीच होते, जर गरज भासली तर, त्या नवीन वातावरणात.
शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०२५
२२९७: सोप्पे केले तर?
आपल्या पूर्वजांनी त्यांच्या वेळी जे जे उपलब्ध होतं, अगदी घरी किंवा आसपास, त्याचाच उपयोग करून काय काय करता येतं हे सांगितले आहे, प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक वेळेला साजेसं असं. आता त्यातलंच एक साधं उदाहरण आज मला इथे घ्यावसं वाटलं.
तिन्हीसांजेला देवापाशी दिवा लावायचा, शुभंकरोती म्हणायची आणि काही घरांमध्ये त्यानंतर आरती पण नित्यनियमाने होते. हे सगळं करत असताना एक तर मांडी घालून खाली जमिनीवर बसायचे किंवा अनवाणी उभे राहायचे, जे सोयीचं असेल ते किंवा जसे देवघर मांडले असेल तसे.
आता हे सगळं का करायचं? हा प्रश्न माझ्या पिढीला पडला, पण तो कधीच ओठांपर्यंत पोचला नाही. आम्ही केलं, सगळंच, आणि बहुतांशी पाठांतरच होतं. पण माझी हीच पिढी पुढील पिढीसोबत प्रश्नांचा भडीमार पण सहन करत मोठी झाली आहे. पुढची पिढी म्हणजे 'का?' ह्याचं उत्तर... जोवर ह्याची उत्तरे मिळत नाहीत, तोवर चिकित्सक वृत्ती जागृतच राहणार. अर्थात हे पण खूप म्हणजे खूप उपयोगी आहेच. तर मी त्या पिढीतली ह्या पिढीतल्या, लहानातील मोठ्यांना उत्तरे समजतील अश्या पद्धतीने देत गेले. तिन्हीसांज म्हणजे? का दिवा लावायचा? खाली बसण्याचे महत्त्व? इत्यादी. आणि असे अनेक प्रश्न सातत्याने उभे ठाकले.
माझी उत्तरे: सर्वश्रुत असलेले उत्तर मी दिले, की भूतकाळ हा निघून गेलेला असतो, तो परत येत नाही. सध्या आपण वर्तमानात आहोत आणि भविष्याकडे वाटचाल आहे. ती वाट अंधारी आहे, म्हणजे कोणालाच ठाऊक नाही पुढे काय उभं ठाकलं आहे; त्यामुळे आपण त्या सुप्रीम पॉवर, किंवा त्या युनिव्हर्सला प्रार्थना करतो की आम्हा सर्वांना वाट दाखव. आणि त्याकरता हा दिवा, अश्या वेळी जेव्हा दिवस संपतंच असतो आणि रात्र सुरू व्हायला किंचित अवकाश असतो.
दुसरी गोष्ट, ग्रॉउंडिंग किंवा अर्थिंगचे महत्त्व माहीत नसेल असा व्यक्ती सापडणे कठीण. ते होण्याकरता मांडी घालून किंवा अनवाणी उभे राहणे अत्यावश्यक त्या काही वेळेपुरते.
मागच्या पिढीकडे तेव्हा मातीचे दिवे, तेल आणि कापूस सहज उपलब्ध असल्यामुळे मग तश्या पद्धतीनेच दिवा लावला जातो ही प्रथा पडली. अर्थात दिवाळी किंवा कार्तिक पौर्णिमेला असंख्य असे मातीचे दिवे का लावले जातात, तर थंडीच्या दिवसांत उष्णता निर्माण व्हावी म्हणून.
आता ऋतूचक्र बदलली आहेत. वारा प्रचंड, गगनचुंबी इमारतीत तर विचारू नकाच. किंबहुना गगनचुंबी इमारतीत वरच्या मजला घेण्याचे प्रमुख कारण म्हणजे शुद्ध हवा आणि भरपूर हवा. घरांची रचना वेगळी झाली आहे, माणसं पण तशी राहिली नाहीतच जशी आधी होती, इत्यादी. मग माझी लेक तर विचारतेच, पण बाजारात पण खूप बदल झालेत. तंत्रज्ञान बदलतंय, मग सर्वांनीच कात टाकली असं झालंय.
सध्या सर्वत्र फारच उपयोगी असे पिटुकल्या सेलवर चालणाऱ्या पणत्या उपलब्ध आहेत, वापरल्या देखील जातात. तसेच देवापाशी दिवा देखील विविध प्रकारांमध्ये दुकानांमध्ये दिसतो, घरोघरी वापरला जातोच.
सरते शेवटी दोन हस्तक आणि एक मस्तक महत्त्वाचे. ते वापरून "अंधारातून दिशा दाखव" ही प्रार्थना आज देखील तश्याच श्रद्धेने आणि विश्वासाने केली जाते. मग तो दिवा लावण्यासाठी तेल, काडेपेटी उपयोगात येवो किंवा बटन, फरक काहीच नाही. दोन्ही दिवे त्याच वेळी लावले जातात, भूत-वर्तमान-भविष्य हे काळ पण तेच आहेत, प्रार्थना आज देखील होते. सोप्पे केले तर काय हरकत आहे, मी म्हणते? हवं ते साध्य झालं की झालं, नाही का?
तेल सांडायला नको, डाग पडायला नको, वाऱ्याने ज्योत विझायला नको, सतत तेल घालणं नको, मग त्या तेलकट पणत्या सांभाळायला नको; पण उजेड मात्र सातत्याने मिळणारच. अजून काय हवंय! चला तर मग, बाकी सगळे बदल सहज स्वीकारले, तसा हा बदल देखील स्मितहास्य ठेऊन स्वीकारुयात?
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...