प्रत्येक टप्प्यावर परीक्षा असते हे फारच लहानपणापासून मी ऐकत आले आहे, शिक्षकांकडून, थोरा मोठ्यानं कडून, आई वडील आणि इतर. त्यावेळी वाटायचं फक्त शाळेत परीक्षा असतात ज्या कठीण असतात. एकदा मोठ्ठं झालं, महाविद्यालयांत गेलं कि सगळं रंगी बेरंगी आणि सोप्पं. अर्थात माझ्या वेळेला खरंच ते थोडसं सोप्पं होताच म्हणावं.
मध्ये एकदा मला एका संस्थेच्या कुलसचिवांचा दूरध्वनी आला, मला आमंत्रण देण्याकरता होता तो. एक वोर्कशॉप घ्यायचं होतं. तारखा ठरवल्या गेल्या, मग बदलल्या गेल्या आणि मग दिवस, असे अनेक चर्चा सत्र झाले आणि मग थोडीशी शांतता होती. मी म्हटलं नक्की काय होतंय? आणि इतक्या मोठ्या मंडळींना जमेल का मला काही माहिती द्यायला? काय झालं असेल नक्की? होणार ना माझे वोर्कशॉप? ई.
परवा मी त्या संस्थेत पोचले. ठरल्याप्रमाणे कुलसचिवांना, बाकी मोठ्या मंडळींची भेट घेतली, आणि नंतर व्हाईस चॅन्सेलर सर ह्यांच्या दफ्तारात गेले. अगदी मोजक्या शब्दात त्यांनी ऐकून घेतलं, ते बोलले आणि म्हटले कसे, कुलसचिवांनी तुमचे नाव सुचवले पण मी माझ्या ओळखीच्यांना पण विचारपूस करून, माझा वेळ घेऊन मग परवानगी दिली. तेव्हा समजलं कि जो थोडासा वेळ / अवधी लागत होता सगळं ठरायला तो का ते. व्हाईस चॅन्सेलर सरांची खात्री पटली कि योग्य व्यक्ती येतोय हि माझ्यासाठी खूप मोठी शाबासकी होती. ह्यावर मी पुढचे सगळे क्षण जगेन अत्यानंदाने. ह्या वयात जाणवतंय "दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्यावाचून झुलायचे".
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा