सर्वांच्या भावनांचा आदर करून मी हा पंक्ती प्रपंच येथे मांडत आहे. पण हा माझा एक पिटुकला दृष्टिकोन आहे ह्या बाबतीत.
अशी कल्पना करा कि एक माणूस किंवा व्यक्ती किंवा माणसाचे पिल्लू हत्तीच्या कळपात नेऊन ठेवलंय. आणि ते तेथेच मोठं होतंय. हत्ती नक्कीच त्याची जीवापाड काळजी घेतील. कंदमूळ, केळ-फळ ई. खायला आणून देतील, भरभरून प्रेम देतील वगैरे. हे सगळं घडत असतांना त्या माणसाच्या जीवाला मात्र हत्ती हेच सर्वस्व वाटेल कदाचित कारण त्याला माणसांमध्ये राहणं ठाऊकच नाही. तो अनुभव त्याने घेतला नाही, चाखला तर नाहीच. दोघेही जीवित प्राणी आहेत, माणसं आणि हत्ती तरी फरक आहेच ना? असं देखील संभव आहे कि हा बाळ तेथेच मोठा होतोय, सर्व आयुष्य तेथेच व्यतीत करतोय आणि एक दिवस निघून जातोय. कदाचित आपण टीव्ही वर मोगली बघतो तसं काहीस होईल कदाचित. अर्थात त्या व्यक्तीला स्वच्छ वातावरणात राहायला मिळेल, सदा मौन कारण भाषा न शिकल्यामुळे आणि ती न वापरल्यामुळे, शिक्षणाची जबरदस्ती नाहीच, नोकरी, कुटुंब पण नाही. आणि हे मोठ्या प्रमाणात घडायला लागलं तर? म्हणजे काही माणसांची पिल्ले वाघाच्या, हरणाच्या, उंटांच्या आणि इतर प्राण्यांच्या समूहात गेली राहायला तर?
मी एवढ्यात बघते आहे कि श्वान घरी पाळण्याचा माणसाने जसा ध्यास घेतला आहे. त्या मागची कारणं मला ठाऊक नाहीत. कुत्रांना माणसांच्या बुद्धी प्रमाणे उत्कृष्ट जीवन लाभते, सुरक्षा, खाणं ई. पण त्या पल्याड काही आहे ना? हा अगदीच एखादा रुग्ण एकटा असेल, त्याला उच्च कोटींचा मधुमेह झाला असेल आणि औषध पाणी देण्याकरता अत्यंत हुशार आणि निपुण श्वान हवा आहे तर मान्य आहे. पण उठसुठ काय हे. त्यात माणसंच आधी कुठेतरी लटकलेली आहेत, उंच फ्लॅट मध्ये राहतात आहे. अंगण नाही. मग त्या कुत्र्याने करायचे काय? मला प्रचंड कीव येते अश्यांची खरंच. माणसाचे काम वाढते ते वेगळेच. आपल्या माणसांसाठी करा ना असं काही खास दररोज, न चुकता. त्यांच्या साठी आणा ना उत्कृष्ट दर्जाचं विविध्य खाणं, जा ना त्यांच्या सोबत फिरायला दररोज दिवसातून ४ दा. तुम्ही माणसं आहात तर "माणसाने माणसाशी माणसा सम वागणे" जास्त योग्य नाही का? भलं मोठं आंगण आहे, शेती आहे, कुत्रांना पाळायला धावायला त्यांच्या सख्यांसोबत वेळ घालवायला मिळतोय तर पाळा त्यांना. अवश्य. नाही तर नाही हो.
तुम्हाला जर फारच लळा असेल तर जा ना एखाद्या श्वान निवाऱ्यात जा, खेळा, वेळ घालावा / सदुपयोगी लावा, त्यांना औषध गोळ्यांचा पुरवठा करा, दानधर्म करा, पण त्यांना त्यांच्याच कळपात राहू द्या. तो पण राजहंस आहे. त्याच्यात अत्यंत वेगळे गूण आहेत. त्यांना जगू द्या. आणि हे सगळ्याच पाळीव पक्षी, प्राणी ह्यांना लागू पडतं.
अगदी बरोबर आहे. मोठा बंगला असेल तर कुत्रा /मांजर पाळणे ठिक आहे. पण फ्लॅटमध्ये त्यांच्यावर अन्याय होतो असे माझे हि प्रामाणिक मत आहे.
उत्तर द्याहटवाThank you so much kaku for agreeing to me
उत्तर द्याहटवा