ज्यामुळे एका कळीचं फूल झालं आणि ते इतक्या वर्ष जगलं, बहरलं, मोहरलं आणि विविध रंगानी फुललं देखील, अनेक वर्षाची त्याची साथ सांगत होती, सवय इतकी झाली होती कि त्या सोबती बरोबर इतके वर्ष सरले, रोजनिशी व्यवस्थित पार पडली, गाडी चालवली, कचेरीची आणि घरची काम झाली, अधे-मधे थकवा आला पण तो हि अंगवळणी पडला होता. महत्वाचं म्हणजे मला जेवढी ह्या सोबतीची सवय झाली होती कणभर जास्तच त्याला देखील झाली होती हे नक्की. कारण आता मला सोडून जातांना त्याला अतीव दुःख होतंय. त्याला कदाचित माहित नव्हतं कि हि साथसंगत काही वर्षांचीच होती ते. त्यामुळे तो आता इतक्या प्रकारचे नखरे करतो आहे कि ज्याचं नाव ते, म्हणजे न भूतो न भविष्यती असे, कल्पनातीत नाही असे. कधी त्याची त्रास देण्याची दिशा म्हणजे माझे पाय कधी पाठ तर कधी मनःस्थिती आणि शारिरीक दोन्ही दुखणी द्यायला बघतो. मला स्पष्ट कळतंय कि माझ्या सोबतीला खरंच किती त्रास होतोय मला सोडून जाताना पण मी थांबवू शकत नाहीच.
ही जगाची रीत आहे किंबहुना काही ठराविक क्षेत्रात "त्याच्या" येण्याचा मोठा उत्साह मनवतात, खूप लोकांना बोलावतात अगदी छोट लग्नच जणू. मग जातांना किंवा गेल्यावर का नाही बोलवत? का नाही आनंद साजरा करत? अशी प्रथा का नाही? असायला हवी ना? मला मान्य आहे सगळ्या प्रथा ह्या फार विचारपूर्वक मांडल्या आहेत आणि साजऱ्या केल्या जातात कारण त्यातुन काही संदेश दिला जातो. पण संदेश देता यावं अश्याच साठी फक्त समारंभ का? सोबती सोडून गेल्यावर तर जास्त गरज भासते कदाचित काही जणांना, मग नवीन प्रथे बद्दल विचार करावा असं मनात आलं म्हणून हे…… दर महिन्याला आनंद सेलीब्रेट करायलाच हवा.
https://youtu.be/l6x4PIYsETw
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा