अन्न-वस्त्र-निवारा ह्या आपल्या / संपूर्ण मानव जातीच्या मुलभूत गरजा आहेत. आपण अन्ना बद्दल अनेक वेळा वाचलं आहेच, शिवाय माझ्या अनेक लेखात देखील मी ह्याच महत्व वर्णन केलं आहेच. तसेच आता थोडसं वस्त्राबद्दल, माझ्या अजून काही आठवणी, महत्वाच्या अश्या.
माझी एक नकळत जडलेली सवय होती अगदी लहांपणीपासूनची. सकाळी आई उठवत असे दररोज न चुकता (hats off to her patience). आणि मी पठ्ठी आळशी-ढोम संपूर्ण झोप झाली असली तरी देखील पुन्हा आईच्या स्वच्छ आवरलेल्या अंथरुणावर पुन्हा फक्त लोळावं ह्या हिशोबाने जात असे, पण मला गाढ झोप कधी तिच्या कवेत घेत असे ते कधीच कळले आणि उमगले नाहीच. आईची माया, तिचा आशीर्वाद, तिचा त्या पलंगाला / चादरीला झालेला स्पर्श असेल ह्या मागे, निश्चितच. आता देखील माझी मुलं आजीचे ब्लॅंकेट करता भांडतात अक्षरशः, उगाचच नाही ना ते. कारण माझी आई राहिली होती माझ्या कडे मुलं लहान असतांना आणि ती जे ब्लॅंकेट वापरात होती ते पांघरून झोपी जाण्याची मज्जा काही औरच.
मी अनेकदा वर्तमानपत्रात वाचलं आहे कि भल्यामोठ्या नायिका त्यांच्या लग्नाच्या वेळी आईची / आजीने (त्यांच्या लग्नात) नेसलेली पारंपरिक साडी / लेहेंगा ई. परिधान करतात, का हो? फक्त आणि फक्त पिढ्यांचा आशीर्वाद. त्यांच्या नव्या जीवनाची सुरवात, सर्वात महत्वाच्या सोहळ्या दिवशी आशीर्वाद च महत्वाचे माझ्या दृष्टीने. त्यांना काय कमी असते, पैसे तर अगणित असतात कदाचित, मग "जुनं ते सोनं" का?
तर अश्या वस्त्रांच्या आठवणी जे शेतकरी आपल्याया देतात त्यांच्या बद्दल जरा जास्त जाणून घेऊ यात. अनघा बालाजी ने हे कार्य केलं आहे, फारच माहितीपूर्व माहिती दिली आहे. कृपया वाचा, www.ecotattva.com.
#Ecotattva #Blessings #Mom's-blessings #Grandmom's-blessings #Importance-of-cloths #Cloths-a-necessity #Anagha-Balaji #Cotton #Cotton-farmers
उत्कृष्ट
उत्तर द्याहटवाThank you so much Mandar Sir. Really appreciate it.
उत्तर द्याहटवा