आज पहाटे सव्वा सहा- साडे सहा च्या दरम्यान माझा मोबाईल गुरगुरला. म्हटलं पहाटे पहाटे कोणाला माझी इतकी आठवण आली. माझं माझं आवरुन झालं होत सगळं आणि बहुतेक मी माझी ऑफिस ची बॅग भरत होते तेव्हा. तर खणखणीत आवाजात डायरेक्ट बोलणं सुरु झालं फोन उचलता क्षणीच.
"ताई मला ताप आली, मी काल लस घेतली. त्यामुळे मी आज येणार नाही कामाला"- इति आमच्या मावशी, ज्या नाहीतर सकाळी सात ला हजर असतात कामाला.
"काळजी घ्या, जास्त ताप नाही ना?" - मी.
आता?
भला मोठा प्रश्न माझ्यापुढे. नाश्ता, डब्बा काय करू? काय करू पेक्षा कसं करू? माझ्या पायाने जमेल का? खिचडीच करते? मॅग्गी खाऊन जाते... अनेक विचार डोक्यात. मग आधी हातातले काम संपवले. मस्त चहा बिस्कीट फस्त केलं आणि मग इन्स्टंट डोसा पीठ भिजवलं, चटणी केली आणि लेकीला आवाज दिला. तिने डब्याचा बंदोबस्त केला दुसऱ्या मावशींच्या मदतीने. बास. झालं काम, ते पण शांततेत. का कुणास ठाऊक पण मुलं लहान होती तेव्हा मला सुचायचंच नाही मावशी येत नाही म्हटलं कि फार मोठ्या प्रमाणात गडबड व्हायची.
चला त्या निमित्याने चव बदल झाला सगळ्यांनाच आज. मावशींना आराम मिळाला तो वेगळाच आणि मुख्य म्हणजे दोन लसी घेऊन झाल्या एकदाच्या, आता थोडी काळजी घेत राहिली मावशींनी दररोज कि निश्चिन्त (मास्क, सॅनिटायझर ई).
तर अशी हि आज ची पळापळ-धावपळ असणारी नेहेमीपेक्षा जरा हटके सकाळ सुरु झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा