जुन्या रुढी, परंपरा, चालिरिती आणि त्या अनुषंघाने तय्यार झालेले सगळे संस्कार, धार्मिक विधी ई. चा पूर्ण मान ठेऊन मी माझी मतं इथे मांडते आहे. श्रद्धेने केलेली पुजा आणि त्यानंतरची उदकशांत ह्या त आई, आईच्या सासुबाई, त्यांच्या सासुबाई आणि अजुन एक आधीची पिढी इतकंच सतत समाविष्ट केलेलं आढळलं. त्या दरम्यान असं हि सांगण्यात आलं कि सासरी आल्यावर जसं सासुबाईंनी, आजेसासुबाईंनी सांभाळलं, रुढी शिकवल्या तश्याच आता ह्या नवीन घरात, नवीन वातावरणात पण तिला दिशा दाखवा, समजावुन घ्या ई. हे सगळं मान्य आहेच. पण मग आजी, तिची आई ई. पण तर अगदी जन्मल्यापासुन सगळं शिकवतातच नं, घर आणि आई हि पहिली शाळा असते. आणि मग शहाणी / मोठी / कळती झाली कि सासरी जाणं होत. मग ह्या महत्वाच्या संस्कारात माहेर का विसरलं गेलं आहे पुर्णपणे? माझी एक शंका आणि प्रश्न पण.
मंगळवार, १७ ऑगस्ट, २०२१
श्रद्धेने केलेली पुजा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा