मी नागपुरचे काम आटोपून पुण्याला येते वेळी बऱ्याच जणांनी असंख्य भेट वस्तू दिल्या, अर्थात मी पण माझ्या ओळखीच्या प्रत्येकाला माझी आठवण म्हणून फुल-ना-फुलाची पाकळी दिली. त्या सर्वांनमधे माझी अतिथी-गृहातली खोली ज्या रोज करत होत्या त्या मावशींनी मला दोन कॅडबरी छोटे चॉकलेट दिले, म्हणाल्या कि प्रवासात खा आठवणीने, तोंड गोड करा. महद आश्चर्य ह्याच वाटलं कि त्यांनी मला भेट वस्तू आणि शिवाय चॉकलेट पण दिले, माझ्या पद्धती प्रमाणे दोन हातात दोन-दोन. प्रवास झाला, घरी सात दिवसांचा वनवास भोगला आणि मग नियमित ऑफिस सुरु झाले. सहज मला आठवण झाली त्या दिलेल्या किंवा मी प्रेमाने मिळवलेल्या चॉकलेट्स ची. बॅगेतून काढले, अर्थातच मी थोडी हळवी असल्यामुळे असेल कदाचित आधी तर डोळ्यात पाणी आलं, पण मग छोटंस हसू पण देऊन गेलं, कारण ते डेरी मिल्क उघडल्यावर काय बघते त्या वेष्टनात फक्त चॉकलेट होत. नाहीतर हे कॅडबरी वाले चॉकलेट, मग त्यावर सोनेरी कागद, मग त्यावर पांढरा छापलेला कागद आणि त्यावर मग नेहेमीचे निळ्या / जांभळ्या रंगाचे आवरण ई. एकसूत्रता का नाही आढळली मला हे चॉकलेट उघडल्यावर? काय असा फरक पडतो ते सोनेरी आणि पांढरे कागद चॉकलेट वर गुंडाळून? ते पण आत, बाहेर दिसत नाहीतच ना, मग का उगाच वेळ, पैसा / किंमत, ऊर्जा आणि कचरा वाढवायचा? बरं फक्त एक पद्धत म्हटली तर मग छोट्या मोठ्या सगळ्याच चॉकलेट मधे ते हवं. आणि हे चॉकलेट जर बिना दोन कागदी थरांशिवाय लोक घेतात, खातात मग बाकी चॉकलेट मधे थर का कागदांचे? असो, मला सोप्प गेलं उघडलं कि डायरेक्ट चघळायला आणि काही तरी छोटेखानी पण नवीन आढळलं म्हणून हे लिहिता देखील आलं. जमल्यास सोनेरी आणि पांढऱ्या कागदाची चॉकलेट गुंडाळायला गरज तरी नाही आहे हे स्पष्ट झालं आहे, मग ते वापरणं थांबवावं कंपनीने आणि त्याची किंमत कमी करावी म्हणजे कदाचित खप अजून वाढेल आणि खायला सोप्प होईल ते वेगळंच, फ्रिज मधे गर्दी कमी होईल माझ्या कारण चॉकलेट जातं पोटात आणि हे दोन कागद एकटे गार वारा खात आ वाचून पसरून बसतात आपले, माझी जशी वाट बघत, मी काढून टाकले तर जागा रिकामी होते फ्रिज मधे. प्रत्येक चॉकलेट मागे ३ कागदं ह्या पेक्षा १ बरा, नाही का?.
"एकमेका साह्य करू आणि सहज मार्गाने तोंड गोड करू". आणि हो मंडळी, सगळे असेच राहून बघू ना, एकमेकांशी बोलायला सोप्पे, वागायला सोप्पे, सहज उपलब्ध कुठल्याही जुन्या थरां शिवाय म्हणजे वेळ, ऊर्जा, पैसा ई. वाया जाणार तर नाहीच पण रेशमांचे बंध कायमचे दृढ होतील ते वेगळेच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा