मागे एकदा लिहिल्याप्रमाणे महाशिवरात्रीला आमच्या सोमेश्वरवाडी येथे भव्य दिव्य जत्रा भरते. त्या जत्रेत अनेक खेळ, विविध दुकानं आणि खाण्याची रेलचेल असते. काही दुकानदार तर फार दुरून प्रवास करून येतात ह्या जत्रेचा भाग होण्यासाठी. ज्यांना आकाशपाळणे किंवा अजून काही खेळ जोडायचे असतात ते एखाद दोन दिवस आधी येऊन त्याचे ठाण मांडतात, कारण ते आवश्यक आहे म्हणून. पण जे त्या दिवशी वस्तू, अथवा पदार्थ विकण्यासाठी येतात ते त्याच दिवशी पहाटे किंवा आदल्या दिवशी अपरात्री येत असतील. महाशिवरात्री दिवशी भक्तगण अगदी रात्री १२ पर्यंत येतात असं ऐकलं आहे. पण दुसऱ्या दिवशी लवकर ऑफिस ला निघालं कि अवाक व्हायला होतं, संपूर्ण रस्ता साफ. सगळी दुकानं गायब. महानगर पालिकेचे कर्मचारी साफसफाई करून मोकळे झाले असतात, किंवा त्यांचं काम संपतच आलं असतं. काय गती आहे, काय ऊर्जा आहे बघा, बाप रे बाप. दिवसभर विक्री करून देखील १२ नंतर सगळं गुंडाळून जिकडच्या तिकडे रवाना व्हायचं म्हणजे कमाल च आहे. कुठून येते एवढी ताकद आणि इच्छा. मरगळ हा शब्द नाहीच वाटतं त्यांच्या डिक्शनरी मधे. मला तर खूप भारी वाटलं, खूप काही शिकण्यासारखं आहे ह्या सर्वांनकडून खरंच. त्यांच्या इच्छा शक्तीला, सहन शक्तीला सलाम. त्यांना असाच धंदा नेहमी मिळो, पोटापाण्याची सोय नीट होवो हि प्रार्थना. "असे दुकानदार येति आणि स्मृती ठेवुनी जाती, शिस्त शिकवून जाती".
रविवार, २७ मार्च, २०२२
शिस्त
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा