जवळपास सगळ्याच अत्याधुनिक कचेरीत सध्या काचेच्या केबिन्स असतात, त्याची कारणे अनेक आहेत, जी सर्वश्रुत आहेत. ऑफिस मधे शेजारी शेजारी किंवा आजुबाजुला मांडण्यात आलेल्या अश्या देखील केबिन्स असतात. जागेची बचत, पद्धत, एकमेकांच्या साथीने येणारा कामाचा हुरूप, सुरक्षितता ई. अनेक कारणांमुळे बांधल्या गेलेल्या.
पण, किंतु, परंतु अनेकदा त्या काचेवर प्लास्टिक वजा घटक वापरून साधा, अनलंकृत, असा कागद चिटकवला जातो.
का?
हा भला मोठा अनुत्तरीत प्रश्न आहे माझ्या समोर.
दोन आजुबाजुच्या केबिन मधे एक काच असते. त्या काचेला ह्या बाजूने किंवा त्या बाजूने जर तो अपारदर्शी प्लास्टिक तत्सम कागद चिटकवला तर चालतं कि, दोन्ही बाजूने का लावायचा? उगाचचं तो कागद वाया, वेळ, मेहेनत वाया आणि दोन्ही बाजूचे चिटकवलेले कागद सांभाळायची जबाबदारी ती वेगळीच. माझ्या हे सर्व आकलना बाहेरच आहे, त्यामुळे मी ह्यात न पडलेलंच बरं. पण त्यामुळे सहज लक्षात आलं कि कचेरीत आल्यावर हे विसरून चालणार नाही कि आपण घरात नाही आहोत, त्यामुळे काचाच बऱ्या, पारदर्शकताच आवश्यक. ह्या संगणक युगात तसेही आपण स्वतःला कधीच अर्पण केलं आहे जगाला. सगळ्या सोशल मीडिया या आपल्या सर्वांबद्दल इतकं जास्त माहिती आहे कि स्वतःला माहित नसेल एवढं. मग हा आटापिटा का?
झाकायचंच अशी जर ऑफीसा ची योजना / धोरण असेल तर तेथे बसणाऱ्या व्यक्तीला प्रेरित करा आणि सुचवा कि तुम्ही पुढील एका वर्षात हि काच भरेल इतकं सुंदर कार्य करा आणि त्याची माहिती येथे लावा. एक शिस्तीत आकार ठरवा, एकसारखेपणा पण येईल त्यामुळे, केबिन सुंदर दिसेल, वैयक्तिक, विशेष आणि हटके दिसेल. अश्या रंगबिरंगी केबिन मधे काम करायला जास्त उत्साह येईल, प्लास्टिक वाचेल, डिंक वाचेल, कष्ट, वेळ आणि पैसा वाचेल तो वेगळाच. त्यामुळे ह्यापुढे केबिन सजवताना त्या क्षेत्रातल्या तज्ञांसोबत तिथे वापरणाऱ्या व्यक्ती साठी काही ठळक योजना आखल्या जाव्यात हि विनंती आणि साधी अपेक्षा देखील..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा