गेल्या काही वर्षांपासुन एक अलिखित नियम प्रस्थापित झाला आहे ज्या मधे किंवा ज्या नुसार लहानमुलांची जी बडबड गीते असतात किंवा कविता असतात त्यात म्हणे कुठलेही नकारात्मक शब्द वापरले जाऊ नयेत. त्या नकारात्मक शब्दांचा म्हणे लहानमुलांवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे माझ्या लहानपणी किंवा त्याआधी देखील प्रसिद्ध असलेलं गाणं / गीत / कथा "चल रे भोपळ्या टुणुक टुणुक" जैसेथे वापरू शकत नाही आता. पण मला तर अश्याच आशयाचं गाणं / गोष्ट किंवा अनुभव आला म्हटलं मांडावं इथे.
जिवलगांना आता भेटायचं म्हणजे पहिले मी तूप रोटी खाते, धष्ठ पुष्ट होते आणि मग, अर्थात हे सगळं आधुनिक पद्धतीने बरं का, नाहीतर मी आणि माझं रडगाणं ते नक्कोच. प्रत्येकाला काही ना काही असतं त्यात माझी भर नकोच.
वैविध्य नरभक्षक जंगलाच्या रस्त्यात जेव्हा त्या आजींना विचारतात तेव्हा मूळ कथेत आजी म्हणतात अगदी तस्स नाही, पण मला जेव्हा जेव्हा कोणी म्हणतं कि "मला भेटायला ये किंवा आपण भेटूया किंवा तुझ्या घरी भेटूया ई." तेव्हा मला ऑफिसचं / घरचं / दुसऱ्या दिवशी उभं असलेलं काम नजरेस पडतं, माझ्या वैविध्य अवयवांचं दुखणं उफाळून येतं / आठवतं आणि हिम्मत होतं नाही सहज भेटण्यासाठी "हो" म्हणण्याची. पण मला पूर्ण खात्री आहे कि "हे हि दिवस पट्टदिशी निघून जातील (just a passing cloud" आणि मला उत्साहाने पुन्हा भेटी गाठी नाहीत तर सर्वांना मस्त मस्त खाऊ घालता येईल, सिनेमा नाटक बघता येईल, सहलीला जाता येईल, पोटभर गप्पा मारता येईल, रात्ररात्रभर पत्ते खेळात येतील, खूप मस्त गाडी चालवता येईल. त्यामुळे आता मी अदृश्य भोपळ्यात अजून थोडे दिवस बसणार, मस्त व्यायाम करणार, औषधं घेणार, पौष्टिक खाणार पिणार आणि मग मनसोक्त जगणार.
सायोनारा सायोनारा
वादा निभाउंगी सायोनारा
इठलाती और बलखाती
जल्दी मिलूंगी सायोनारा ||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा