ठिकठिकाणी आपल्या नजरेस पडणारे, अगदी घरी, कचेरीत, देवळात, दुकानात, अगदी कुठेही, आणि त्यात वैविध्य रंगांचे, आकाराचे, प्रकारचे म्हणजे दार, दरवाजे. हे दारं दृश्य आणि अदृश्य स्वरूपाची असतात बरं का. माझ्या पिटुकल्या अनुभवांवरून बोलते आहे मी हे. खैर अदृश्यांबद्दल थोड्या वेळाने बोलू. आधी दृश्य बघुयात. हे खरं तर मी माझ्या एका भूतकाळातल्या विद्यार्थिनी कडून शिकले, किंबहुना तिने मला तिच्या कृतीतून शिकवले. कृतीतून म्हणण्यापेक्षा आचरणातून. हि २०१७ ची गोष्ट आहे, आमची भेट झाली दोघींची आणि त्यानंतर २०२० पर्यंत आम्ही एकत्र होतो. ह्या ३ वर्षांच्या काळात फक्त एकदा तिने मला भिजलेल्या शब्दात थोडक्यात काही सांगितले पण त्यानंतर नाही. तिचा एक मंत्र होता कि कचेरीच्या दारात आलं कि घरं संपूर्णपणे जाणीवपूर्वक विसरायचं, तरच उत्कृष्ट कामे होतील आणि आखून दिलेल्या वेळेत. असं केलं नाही तर मग भज होतं, सगळी गडबड होते आणि काहीच साध्य होतं नाहीच. अर्थात हे घरच्या दारात उभं ठाकल्यावर पण अंगिकाराव, किंबहुना कुठल्याही ठिकाणी हेच सत्य आहे. करमणुकीला गेला असाल आणि जाणीवपूर्वक उत्साहाने जर आनंद उपभोगला नाही तर सगळं व्यर्थ / केरात, नाही का? आणि हो, हे असं करण्यामागे अजून एक भक्कम कारण आहे. आधुनिक संतांकडून ऐकलं आहे कि दारात सातत्याने आनंद+सुख दोन्ही हात पसरवून उभे असतात, आत येण्याकरता. आणि शिकलेली माणसं कुठल्यातरी अगदी नगण्य गोष्टीला कवटाळून दुःख करत बसलेले दिसतात त्यांना. मग कंटाळून ते निघून जातात. त्यांचं घरात नेहेमी स्वागत करा मंडळी, आपल्या मनाची, हृदयाची कवाडं मोकळी करून, उघडी ठेवून. कवाडं बंद झाली कि मग काय डोळ्यावर पण झापड येते.
माझं अहो भाग्य कि मला त्या वेळी अशी अनमोल संशोधक लाभली. तिच्या ह्या शिकवणी मुळे आज मला सहज सोप्पं जातंय आत - बाहेर करतांना. ती आज खूप मोठ्या पदावर कार्यरत आहे, विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे तिची. संपूर्ण डिपार्टमेंट ला शिताफीने पुढे नेण्याचं कार्य ती करते आहे, तिच्या हातून घडतंय. "असे संशोधक येति आणि स्मृती ठेवुनी जाती".
उंबरा असतो प्रत्येक दाराला, भारतात बहुतांशी बाप्पा असतो विराजमान दारावर प्रतीकात्मक असा, देवळात कासव जसा, मग हे सगळं का? सोप्पं आहे, तेथेच सगळं प्रयत्नपूर्वक सोडून आत येण्यासाठी. बास.
अगदी प्रत्येक जण कळत-न कळत आई, बहीण, बायको, मैत्रीण, शेजारीण, सखी, ई. भूमिका निभावतो ना. मग अगदी तसेच हे पण आहे. एका पात्रातून दुसऱ्या, इतकं सोप्पं आहे. "केल्याने होतं आहे रे, आधी केलेची पाहिजे". ओझं बाळगून आज पर्यंत कोणालाच काहीच मिळालेलं नाहीच मुळी. चला तर मग प्रवेशद्वाराचे महत्व नव्याने समजावून घेऊ या. जेथे प्रवेश कराल तेथले व्हा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा