बुधवार, २९ एप्रिल, २०२६

२४३९: गढूळपणातून स्पष्टतेकडे एक साधा मार्ग


आज "मेरे साई" सोनी वरची एक सिरीयल मधील एक छोटासा प्रसंग मनात खोलवर उतरला.

एका भक्ताने साईंना विनंती केली, माझा व्यवसाय यशस्वी व्हावा म्हणून काही चमत्कार करा
तो पुढे सांगतो, मी आतापर्यंत तीन व्यवसायांत अपयशी ठरलो आहे. 
साईंनी त्याला एक मातीचं भांडं दिलं आणि जवळच्या तळ्यातून पाणी आणायला सांगितलं. पहिल्यांदा पाणी गढूळ होतं, दुसऱ्यांदा पुन्हा तेच, तिसऱ्यांदा तेच पाणी शांत आणि स्वच्छ दिसलं. तो पाणी घेऊन आला, साईंनी पुन्हा त्यात माती टाकली, भक्त चिडला "हे काय पुन्हा पाणी खराब केलं आता तहान कशी भागवणार?". साई शांतपणे म्हणाले, "थांब माती खाली बसू दे पाणी पुन्हा स्वच्छ होईल", आणि मग त्यांनी सांगितलं

जीवनात आणि व्यवसायातही असंच होतं, मन गढूळ झालं की निर्णय चुकतात, म्हणून निर्णय घेण्याआधी थांब, रामाचं नाव घे, रामाशी बोल, आणि माती खाली बसू दे.

फक्त गरज पडली तेव्हाच नाही, तर रोज नियमितपणे रामनाम घ्या, ते मनातली गढूळपणाची थर हळूहळू कमी करतं, आणि जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते, तेव्हा मन आधीच अधिक स्वच्छ स्थिर आणि सजग असतं. घाईत घेतलेले निर्णय चुकतात, शांत मनातून घेतलेले निर्णय टिकतात, रामनाम ही फक्त गरजेची गोष्ट नाही ती मन स्वच्छ ठेवण्याची सवय आहे.

https://www.youtube.com/watch?v=y38_pItDfxM (watch till first 10.05minutes, Sai and Raghunath conversation)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...