मी खूप दिवसांनी १४ दा ऑगस्ट ला कचेरीत निघाले होते, सोमवार होता. गेले १५ दिवस घरी अनेक घटना घडल्या त्यामुळे लांबलचक सुट्टी झाली होती आणि एकंदरीत गाडीत बसल्याबसल्या भन्नाट, टवटवीत वाटायला लागेलच. त्यात भरीसभर म्हणजे संपूर्ण रस्ताभर खास करून दिड दोन फुटाच्या, अतिशय गोंडस भारतमाता इतस्ततः नजरेस पडल्याच. इतक्या गोजिरवाण्या त्या, नजर हटत नव्हती, कि पालवी, फार गोड नजारा होता. इतक्या सकाळी उठून, मस्त तय्यार होऊन शाळेच्या बस साठी वाट बघत होत्या. सगळ्या लहान गटातल्या वाटत होत्या, त्यामुळे कदाचित शाळेने त्यांना आदल्या दिवशीच बोलावून कार्यक्रम साजरा केला असेल आणि प्रत्यक्ष १५ तारखेला मोठ्या गटाचा. पण काहीका असेना माझा दोन दिवस भरभरून १५ ऑगस्ट साजरा झाला. इतके सुंदर नजरे दृष्टीस पडतात रस्त्यावरून जातांना, मग प्रवासात त्या मोबाईल मधे डोकं घालण्याची आवश्यकता भासातच नाही. सगळ्या पिल्लाना, शाळेला, आई बाबांना शतशः धन्यवाद. असेच सुंदर कार्यक्रम आखत राहा आणि माझ्या डोळ्यांचे पारणे फिटत ठेवा.
बुधवार, १६ ऑगस्ट, २०२३
बुधवार, २ ऑगस्ट, २०२३
सुख म्हणजे नक्की काय असतं
सध्याच्या पावसाळ्यात नकळत सगळेच मंदावतात आणि त्यामुळे गती संथ होते. असंच काहीसं गेले काही दिवस घडतंय. सात वाजून तीस मिनिटाला माझी गाडी सुरु होते दररोज, साडेआठ च्या कचेरीची वेळ गाठण्या करता. पावसाळ्याव्यतिरिक्त मी आठच्या आधी पोचायचे कचेरीत पण सध्या उशीर होत असल्यामुळे मी पक्के ठरवून आज सात एकोणवीसला च निघाले आणि काय सांगू क्षणभरही नाही थांबावं लागलं रस्त्यावर. शिवाय कधी नव्हे ते वैविध्य शाळेचे गणवेश बघायला मिळाले, ते रंग, त्या छटा मनमोहक होत्या. विविध वयाची शाळकरी मुलं बघून माझं आणि माझ्या मुलांचं लहानपण डोळ्यासमोर तरळून गेलं झर्रर्रकिनी, माझ्या पुण्यात आणि त्यात माझ्या भागात किती शाळा आहेत हे देखील आज नजरेच्या टप्प्यात आलं अगदी सहज खूप साऱ्या शाळेच्या बसेस बघून. हिरव्या रंगांच्या विविध छटांनी बहरून आलेली झाडं, त्या वरची अप्रतिम फुलं, बऱ्याच ठिकाणी नुकतीच उगवलेली सुगंधित फुलं ह्या सर्वांनी आजच्या दिवसाची बहरलेली मोहक सुरवात झाली. सुख म्हणजे नक्की काय असतं? अहाहा च.
https://drpreetimulay.blogspot.com/2021/05/blog-post_9.html
https://drpreetimulay.blogspot.com/2021/09/blog-post_59.html
https://drpreetimulay.blogspot.com/2021/04/blog-post.html
माझ्या तरी अवतीभोवती आणि माझ्या सानिध्यात ते सतत असतं.
गुरुवार, २७ जुलै, २०२३
उजळणी
माझ्या लहानपणी गवळी दूध देऊन जायचा, रतीब लावलेला असायचा. बहुतांशी तरी पिढ्यानं पिढ्या चालत आलेला असा. त्या नंतर आल्या काचेच्या बाटल्या. पण त्यामुळे दररोज बहुतांशी दोनदा दूध तापवावं लागायचं. फ्रिज पण नव्हते. त्यामुळे इतकं दूध घेतलं जायचं कि थोडंसं दुसऱ्या दिवशी उरेल. मग त्याचं दही लाव, तर पट्टाकिनी बासुंदी कर तर कलाकंद ई. मज्जा यायची. पण जर दूध कमी पडलं किंवा फाटलं आणि कालच्या दुधाचा चहा करावा लागला तर त्यावर तुपाचे तवंग नाही पण तसे बारीक सारीक अवशेष उमटायचे आणि चवीत फरक पडायचा तो वेगळाच. म्हणजे नक्की कळायचं कि हा कालच्या दुधाचा चहा आहे. अर्थात खूप कमी आम्हा लहान मुलांना चहा प्यायला मिळायचा पण त्यात असं काही झालं कि समजायचं नक्की. आज खूप म्हणजे खूप वर्षांनी पुन्हा एकदा तशी लज्जत चाखायला मिळाली. गेली अनेक दशकं फुटलेलं दूध कानावर पडलं नाही, आता दोनदा काय एकदा सुद्धा दूध तापवावं लागत नाही, त्यामुळे असा चहा दुर्मिळ झाला होता. आज काय चमत्कार झाला आणि माझ्या तो पुढ्यात ठाकला, चाखायला मिळाला कोणास ठाऊक, पण प्रचंड मज्जा आली हे नक्की. माझ्या आईच्या घरची एक चक्कर मारता आली मला, तिचं ते ठराविक चहाचं भांड उभं ठाकलं नजरेसमोर, ते गाळण, सांडशी आणि गरमागरम ताज्या गप्पा, अहाहा च. ज्यांनी आज आमच्या कचेरीत चहा तय्यार केला होता पेशल त्याला मनापासून धन्यवाद. आभार आणि अधे मधे अशी उजळणी व्हावी अशी इच्छा. अचानक असं काही घडलं कि भन्नाट वाटतं नाही.
मसाला चहा, विलायची युक्त असा, गवती चहा, आले घातलेला फक्कड असा, ई. पुढे ह्या तूप मिश्रित चहा ची खासियत निराळीच. जगावेगळी.
मंगळवार, १३ जून, २०२३
Peace and Piece
You will be surprised to know what the relationship is between these two tiny, simple English words. Even I was totally unaware but realised it recently.
The other day, as is
my usual practise as a mother, I called up my beloved daughter, who was at home
due to preparation leave in between final exam papers. After connecting with
her immediately, I asked, "Have you collected enough pieces?" She was
shocked to hear this from me. I mean to ask her, are all pieces intact to
handle the upcoming peace exam (Peace is one of the subjects having final
exams)? She had a blast after understanding my point of view. To appear for the
peace exam, it's essential to know where all the pieces are. I mean, notes are,
reading material is, question banks and case studies are, videos are, etc.
Peace can be achieved only when you know where the first piece is and
thereafter where the other required pieces are, and then the collection and
assembly process begins thereafter to gain final peace.
In this example of an
exam for my daughter, I referred to various pieces as reading materials, but in
real life too, to gain peace, which everyone aspires to and expects, we need to
know where that first piece is and where other pieces are spread across the
mind, around, or in the world. Once you know the source to begin with, you will
obtain and assemble all the pieces together to gain peace.
One of the easiest
ways this new generation finds the first valuable piece is with OpenAI tools or
social media platforms. To live peacefully, they hunt for pieces from
non-living things. Why? You are surrounded by your own people, loved once,
friends, family, collegues, neighbours, teachers, mentors, four-legged friends,
nature, birds, tress etc to name a few then why to rely on these non-living
things which are actually a brain-child of living being. Come on.
One wonderful piece
of advice is that instead of merely going to ChatGPT or similar platforms, why
not try GitaGPT instead? As all are aware, there are many verses in the Gita
that are extremely useful for living peacefully, and it mentors everyone, as
has been proven for ages. And now that the technical form of Gita, which also
speaks the language of Gen Z, is available at the click of a button, why not
check it out once? Of course, whether you approach friends, family, or Gita,
you need to ask the apt question. "Prompt engineering" plays a vital
and important role. Keywords are finally a ball game; focus on pieces like what
you ask and how you ask to always gain peace.
रविवार, ११ जून, २०२३
आधारवड
माझ्या मराठीच्या आकलना प्रमाणे वडिल ह्याचं मूळ वडाच्या झाडाशी असावं. जसा वड वृक्ष आणि त्याचे अगणित गुणधर्म अगदी तसेच किंबहुना कणभर जास्त म्हणजे वडिल, संपूर्ण कुटुंबाचे छत्र.
माझे
वडिल म्हणजे माझ्यासाठी अक्षरशः एक मूर्त विद्यापीठाचं
जणू. त्याची कारणे असंख्य आहेत, जागोजागी, वेळोवेळी त्यांनी केलेली मदत, सुचवलेले पर्याय,
दाखवलेली दिशा आणि सातत्याने
दर्शविलेले प्रतिबंधात्मक तरणोपाय. मराठी, इंग्लिश, हिंदी भाषेवर प्रचंड प्रभुत्व, म्हणींचा चपराख प्रयोग आणि शाब्दिक फोड
/ जोड करून उद्बोधक विचार,
अहाहाच. जगापल्याड असे.
तीन
"म" माझ्या पुढ्यात उभे ठाकले इंग्लिश
मधले मनी, म्यारेज का
M.Tech. माझी नोकरी अर्थार्जन सुरु होते, त्यावेळी
लग्नाचे वय झाले होते
आणि पुढील शिक्षण पण महत्वाचे होते.
M.Tech च्या प्रवेश परीक्षेत मी भारतात पहिली
आले होते. प्रवेश घेतला तर नोकरी सोडावी
लागणार होती आणि लग्न
पण कदाचित ठरलं तर लांबणीवर
टाकावं लागणार होतं. बाबांना विचारल्यावर म्हणतात कसे, "सोप्पं आहे, जे सध्या
हातात आहे, भविष्यात उपयोगी
आहे ते कर, बाकीच्यांचा
विचार देखील नको". मी मग पुढील
शिक्षणाला प्राध्यान दिले.
माझी
जुळी बाळं लहान होती
तेव्हा, नोकरीच्या ठिकाणी काही अडचणी आल्या
तर, काही तब्बेतीच्या तक्रारी
असल्या तर, पैशावरून काही,
असं जर बाबांच्या पुढे
मांडल तर उत्तर मिळायचं
"काळजी करू नये, त्यापेक्षा
ईच्छाशक्ती, सामर्थ्य, वैविध्य स्थरावरील कामे करून स्वतःला
इतकं शक्तिशाली घडव कि काळाने
जी-जी करत तुमच्या
समोर उभं ठाकलं आणि
विचारलं पाहिजे कि बोल मी
कुठल्या दिशेने नेऊ तुला".
अंग
गरम वाटलं, ताप आल्यासारखा वाटलं
आणि त्यांना सांगितलं तर म्हणत असत
"तापच आला आहे ना,
गोळी घे जाईल निघून,
पण लक्षात ठेव सं-ताप
कधीही येऊ देऊ नको
त्या करता साधी गोळी
घे आणि निघून जाईल
असा उपाय नाही".
त्यांच्या
सातत्याने काम, कष्ट, विविध्य
धाटणीतले उत्कृष्ट विचार, आणि अश्या असंख्य
गुणांनी मीच नाही खूप
जणांना शिकता आलं ते नेहेमी
म्हणायचे "तुमचं काम बोललं पाहिजे
तुम्ही नाही". पुढ्यात
मांडलेलं प्रत्येक आव्हान स्वीकारायचंच. हे जमेल कि
नाही ह्यात वेळ आणि शक्ती
वाया घालवण्या पेक्षा करून बघायचं, जमतं.
"केल्याने होत आहे रे...".
माझे बाबा मला मुलापेक्षा
वरताण म्हणायचे नाही तर तसं
घडवलं. बँकेत
आवर्जून घेऊन जायचे, व्यवहार,
फॉर्म भरणे समजावून सांगायचे
आणि त्यांची कामे होईस्तोवर मला
बँकेत आलेल्या ज्यांना लिहिता-वाचता येत नाही अश्यांची
मदत करायला लावायचे.
शुक्रवार, ९ जून, २०२३
ना घर का ना ....
अगदी समजायला लागल्या पासून माझ्या वेळी तरी एक वाक्य सारखं कानावर पडायचं मग ते आईने सांगितलं असो, किंवा शेजार पाजारी, मित्र मैत्रीण, नातेवाईक, सणसमारंभात सर्वत्र एकवाक्यातच जणू. "उद्या सासरी जायचं आहे...", खाणं, पिणं, बसणं-उठणं, वागणं-बोलणं अगदी प्रत्येक वेळी. अशी जय्यत तय्यारी करून सासरी पोचले आणि तेथे वेगळंच मांडून ठेवलेलं होतं, अगदी सगळं उपर, अनिश्चित, अनभिन्न असं. दोन दशकं उलटून गेली पण पकड मधे काहीच नाही. म्हटलं असं का?
काही दिवसांपूर्वी एक लेख वाचनात आला, "ना सासरची ना माहेरची". म्हणजे "घरो घरी मातीच्याच चुली" आहेत तर, हे लक्षात आलं.
मागे एकदा लिहिल्याप्रमाणे ह्या न्यू-नॉर्मल दिवस सरल्यानंतर आमच्या जुन्या घराचा नक्षा नखशिखान्त बदलला गेला. मुलीची,मुलाची आणि ह्याची स्वतंत्र खोली अभ्यास आणि कामाच्या मस्त टेबल सहीत तय्यार झाली. मी मात्र कधी इथे ठाण मांड, कधी तेथे, आज ह्याच्या खोलीत, तर उद्या त्याच्या, नाहीतर मांडी घालून खाली सगळे विविध प्रकार अनुभवले. मग सहज लक्षात आलं कि मी शिकलेली सवरलेली, नोकरी करणारी असून देखील माझा मेज, माझी खोली कुठे आहे? तर कुठेच नाही. माहेरी पण नाही. अरेच्चा. म्हटलं हे काय.
मग कोणाचा तरी स्वर सातत्याने कानावर आला, मंत्रमुग्ध व्हायला झालं अक्षरशः. तो आवाज सांगतो मला कि "श्वास तरी आहे का तुझा गं?" हवा, वारा, प्राणवायू हा आपोआप वावरतो आहे म्हणून आणि श्वासोश्वास यंत्रणा सुरळीत सुरु आहे म्हणून खेळ आहे ना, नाही तर. सगळ्या अत्यावश्यक क्रिया जसे के पचन, रक्ताभिसरण, मनन, चिंतन, चलन-वलन ई. सुरु आहे बिनबोभाट मग? आणि "ह्यात तुझं काय आहे?, तू कशाला जबाबदार आहेस? तुझ्या मुळे काही होतंय का?" अर्थात उत्तर "नाही" असेच आहे, मग चिंता कशाला? आपलं जर काहीच नाही ज्यात प्राण आहे, आपला धरून, तर मग प्राणहीन वस्तू किती आहेत, कोणी वापराव्या ह्या करता तय्यार केल्या आहेत हे सगळं डोक्यात आणण्याची गरज नाहीच सपशेल. जागी हो, वेगवेगळी ठिकाणे अनुभवं आणि मार्ग क्रमण सुरु राहू दे.
हे सगळं घडत होतंच तेवढ्याच माझी एक सख्खी मैत्रीण आहे कचेरीत, तिने सहज विषय काढला. म्हणते कशी, "कचेरीत तरी आपल्याला मान आहे, कामं भरपूर करवून घेतात पण त्याचा मोबदला देखील देतातच ना, पैश्याच्या स्वरूपातच नव्हे तर पाठिवर थाप, प्रशंसा पत्र देतात आणि एक त्यामुळे ओळख निर्माण होते हे वेगळंच, भरपूर शिकायला पण मिळते, वैविध्य लोकांची ओळख होते...". हे सगळं घडण्यासाठी ज्या दिवशी तुम्ही कचेरीत येता तेव्हा तुच्यासाठी खास जागा असते नेमलेली, संगणक दिला जातो, खुर्ची आणि इतर लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा देखील वेळोवेळी दिल्या जातातच.
मग त्या लेखात "सासरची ना माहेरची" ह्यात एक टप्पा अजून जोडावासा वाटतो "सासरची ना माहेरची पण ऑफिसची / लोकांची". इथे नाही तर तेथे सगळं व्यवस्थित पार पडतंय, घरचे-दारचे ह्या-ना-त्या निमित्याने फुल-ना-फुलाची पाकळी स्वरूपात सगळं करत आहेत, डोक्यावर छत आहे, तिन्ही त्रिकाळ पोटभर वाढलं जातंय, मुलं आहेत, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी आहेत, मेंदू जागेवर आहे, समाधान आहे, हेच पुरेसं आहे. कोणी तरी म्हटलं कि "आपल्याला हे शरीर भाड्याने दिलं आहे काही काळा करता, बास, त्याचा सदुपयोग करा, ज्या कार्यासाठी आपली "त्याने" निवड केली आहे ते घडेल निश्चित, हसत खेळत, ह्या नाहीतर त्या जागी बसून, उठून, रांगून का होईना गाडी पुढे जाते त्या बरोबर जा.
बुधवार, ७ जून, २०२३
कृतज्ञता
वडिल ह्या शब्दाची उत्पत्ती / उगम कुठून झाला हे मला ठाऊक नाही, शोधलं पण खास काही सापडलं नाही. माझ्या मनाला जे पटतंय ते येथे मांडण्याचा हा पिटुकला प्रयत्न.
वड हा वटवृक्ष. किंवा असं देखील म्हटलं जातं कि वडाच्या एकतर प्रत्येक भागाचा उपयोग होतोच. तो वृक्ष निरपेक्ष रित्या सर्वांना सगळं काही देत राहतो सातत्याने. शिवाय अशी पण आख्यायिका आहे कि त्या वृक्षाखाली बसून, जप-तप करून, साधना करून अथवा न करता देखील मागितलेली ईच्छा पूर्ण होते बहुतांशी प्रत्येकवेळा. अर्थात अजून असे बहू गुणी वृक्ष आहेत. पण एकंदरीत वडाच्या वृक्षाचा महिमा सर्वश्रुत असल्यामुळे मग जाणकारांनी पित्या ला ती उपमा दिली असणार आणि म्हणून वडिल ह्या शब्दाचे मूळ वड असणार.
एक क्षणोक्षणी अनुभवलेले, अनेक वर्ष झाली किंबहुना तपें लोटली तरी देखील संपूर्ण न उमगलेले, दर दिवशी नवीन भासणारे असे एक वडिल. सुरवंटाचे फुलपाखरू झाले अचानक असे ते, पण येथे ह्या फुलपाखराच्या पंखात प्रचंड बळ आहे, कुठून आली हि शक्ती हे ठाऊक नाही. पण ज्या दिवशी ह्या मुलाचं शिक्षण पूर्ण झालं, नोकरीत रुजू झाल्यापासून प्रचंड जबाबदारी पेलली जी सहसा कोणी निभावत नाही. वरवर जबाबदारी घेतली असं दर्शवणं आणि ती निभावणं अनेक वर्ष सातत्याने हे महाकठिण किंबहुना अशक्य आहे. बरं फक्त अवलंबून असलेल्यांची जबाबदारीच नाही तर स्वतःला नोकरी पेशात पुढे न्यायचं आहे, समाजात स्थान निर्माण करायचं आहे, तब्बेत सांभाळायची आहे, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक ह्याच्या कडे प्रकर्षाने लक्ष आणि त्यांच्यासाठी वेळ द्यायचा आहे आणि अशी अनेक कार्य करता करता स्वतःच्या कुटुंबासाठी सर्व जबाबदाऱ्या हसत-खेळत पार पडायच्या आहेत, स्वतःच्या लेकरांसमोर आदर्श निर्माण करायचा आहे अनेक स्तरावर. नोकरी करता करता तरुण वय असतांना अगदी तो बाबा होणार ह्याची चाहूल लागली तेव्हापासून ते पुढे वीस वर्ष सगळ्या अमिनिटीज / पंचतारांकीत सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, मागायच्या आत सगळं हजर करणे, कधी मऊ तर कधी कडक शिस्तीत राहून मार्गदर्शन करणे हे प्रत्येकाच्या बसची बातच नाही आहे. विभक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे आजी होऊन जन्माच्या आधीच असंख्य गोष्टी ऐकवणे, खूप पौष्टिक खाऊ घालणे, त्याच्या बाळाचं मालिश शास्त्रोक्त पद्धतीने कसं करायचं हे शिकून सातत्याने करणे, जन्मलेल्या बाळाची जिवापाड काळजी घेणे, त्यांची सगळी कामे करणे, शिवाय शेकडो फोटो काढून सगळ्या आठवणी जपणे, शाळेचा अभ्यास, महाविद्यालयाची किचकट प्रवेश प्रक्रिया आणि अशी इतर सगळी कार्य सांभाळत कचेरीत गगनभरारी मारणे, सुधृढ राहणे आणि अशी इतर अनेक आव्हाने सहजी पार पाडणे म्हणजे दिव्यच. तर असे हे माझ्या दोन जुळ्या मुलांचे आदर्श वडिल. वडिल म्हणून मला देखील अभिमान वाटावा असे ते व्यक्तिमत्व. आम्हा तिघांना डोक्यावर आलिशान छत, ऐशोआरामात प्रवासासाठी चार चाकी, उत्कृष्ट खानपानाची ऐश आणि म्हणेल ते सातत्याने पुरवठा करणारे, वडिलांची भुमिका चोख पार पडणारे अश्यांना आंतरराष्ट्रीय फादर्स दे च्या हार्दिक शुभेच्छा आणि मनःपूर्वक शेकडो धन्यवाद. खूप प्रचंड शिकण्यासारखं आहे ह्या व्यक्तिमत्वाकडून, प्रयत्न जारी आहेत पण ह्या उभ्या आयुष्यात त्यांच्या नखाची पण सर मला येणार नाही हे नक्की.
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...