काही दिवसापूर्वी मला एका अवलियाची नवीन ओळख झाली. माझी आणि त्याची तोंड ओळख होतीच आधीची पण ती फारच साध्या लेव्हल ची होती. परवाच सहज विषय निघाला म्हणून त्याच्या बद्दल एक अनोखी गोष्ट समजली ती अशी.
त्याला म्हणे पाणी पुरी खायला फारच आवडते, साग्रसंगीत, व्यवस्थित सगळं माल-मसाला पाहिजेच ई. म्हटलं त्यात काय नवल आहे. बहुतांशी सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ आहे पाणी पुरी.
त्याने आत्ता पर्यंत म्हणे अनेकविध प्रकारच्या पाणीपुरी खाल्ल्या आहेत. म्हटलं ते हि काही विशेष नाहीच कारण मला खालील प्रकारचे पाणी माहित आहे, अनेकदा चव पण घेतली आहे, चिंचेचं / आंबट पाणी फक्त, आंबट+गोड गूळ घालून, खजूर घालून, हिंग घालून, पुदिना घालून, जीरा घालून केलेलं, कैरी, राजस्थान मधे आलं घालतात म्हणे, काळे द्राक्ष घालून केलेलं पाणी, सोल कढी सारखं म्हणजे आमसूलचा वापर, तिखट मिरची+पुदिना+लसूण+कोथिंबीर ई.
तो म्हणे सगळ्यांना / ज्यांना सहज शक्य आहे त्यांना पाणीपुरीचं पाणी गावाहून देखील आणायला सांगतो, जर त्याने तेथे एखादी खास जागेत पाणीपुरी एन्जॉय कधीतरी केली असेल तरी. हं मंडळी, ह्यामुळे तो अवलिया होत नाही बरं का.
ऐका.
हा अक्षरशः दररोज पोटभर यथेश्च पाणीपुरी खातोच..
त्याची बायको दोन-तीन दिवस पुरेल इतकं पाणी करून ठेवते शीतगृहात / आपल्या फ्रीज मधे हो, आणि दररोज स्वयंपाकाच्या मावशींना न चुकता चणे / पांढरे वाटाणे आणि बटाटा लावावाच लागतो कुकर मधे.
बाप रे बाप. अरे का हे, इतकं प्रेम कधीही पाहिलं नव्हतं बावा मी पाणीपुरी बद्दल.
देवा.
पण एक चांगलं झालं, आता जर अवेळी पाणी पुरी खायची इच्छा झालीच तर घरगुती ठेला माहित होऊन गेला मला हक्कानी जाण्यासाठी.
अहाहा च. भन्नाट.
आता नव्याने भेटायला पाहिजे ह्या अनोख्या अवलियाला. त्याची बायको पण फार खुश आहे. कारण ती म्हणते दररोज संध्याकाळी ऑफिस मधून गेल्यावर "अहो" साठी काय करायचं? हा मला प्रश्न पडत नाही.
त्यावर मग मी प्रतिप्रश्न केला, "पाणी किंवा अजून काही साहित्य संपल असेल त्या दिवशी तर?" उत्तर "मग आम्ही बाहेर जाऊन तो पाणीपुरी खातो मी काहीतरी वेगळं ट्राय करते, बास".
मज्जा च आहे....
कधी म्हणजे कधीच मी असला अवलिया बघितला आणि ऐकला नव्हता.
दररोज नाही पण वारंवार / नियमितपणे / पुन्हा पुन्हा पाणीपुरी खायला आणि त्याहून घरची मलाही आवडेल. पण रोज खायचीच न चुकता ह्या दोन्ही गोष्टीमधे फार अंतर आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा