उन्हाळ्यात उसाच्या रसाची मज्जा काही औरच. भन्नाट चव, पौस्टिक, नैसर्गिक गोड आणि माझ्या दृष्टीने निसर्गाची भलतीच कमाल. हो, अर्थात मैन्यूअली जे उसाचा रस काढतात त्यांचे कष्ट बघवत नाहीत एस्पेसिअली जेव्हा शेवटच्या उरलेल्या चोथ्याला यंत्रात घातलं जात.
आई ग.
तर आजकाल अनेक ठिकाणाहून घुंगरांचा आवाज येतो आणि त्या बंडी / दुकांनाभोवती प्रचंड गर्दी देखील असते. आणि सगळे शिक्षित मुलं / मुली बिनधास्त कान असलेल्या जाडजूड काचेच्या मोठ्या पेल्यातून रस्त्यावर उभे असतात रस पीत. अश्या ह्या भयानक परिस्थितीत, ते हि पुण्यात,कसचं का$$$$ही वाटत नाही.
बरं प्यायचाच आहे ना उसाचा रस, मग एक तर तो रस वाला पॅक करूनही देतो, किंवा आपलं टपर-वियर, हा-वियर, तो-वियर ई. अनेक विविध रंगांचे उत्कृष्ट झाकण असलेले पेले मिळतात, घ्यावे विकत आणि वापरावे आपआपले, नाही तर पेपर-पेले पण मिळतातच कि, बहुतेक सगळ्याच रस वाल्यांकडे असतातच. जेव्हा आणि जशी जमेल तशी काळजी नको का घ्यायला स्वतःची?
आमच्याच ओळखीची एक जण आहे तिने प्री-पॅक उसाचा रस उपलब्ध केला आहे.
नाही तर ताक आहे, लस्सी आहे (विविध चवींची) आणि बरीच पेये.
होप, तो रस वाला छान गरम पाण्यात स्वच्छ धुत असेल बावा ते ग्लासेस.
मी काही डॉक्टर नाही, त्यामुळे अनेक लोकांनी वापरलेला उष्टा पेला वापरल्याने काय होत का नाही हे मला माहित नाही, पण हे माझ्या दृष्टीने योग्य नाहीच. शेवटी एवढंच म्हणेन "आरोग्य हीच खरी संपत्ती आहे",तिला सांभाळा, हात जोडून विनंती आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा