जर आपल्याच घराची सगळ्या प्रकारची दारं, खिडक्या, ड्रॉवर्स ई. जर आपण प्रत्येक वेळी आवाज न करता हाताळले तर चालतं ना, का नाही? अहो मंडळी, जर त्या दाराची आदळ आपट केली, जोरात उघडलं / बंद केलं (मुद्दाम आपटलं असं नव्हतं म्हणायचं मला बरं का) तर काय मिळत हो? लाडू, का पेढे का शाबासकी? आणि कोणाकडून? मग जर काहीच मिळत नाही असूरी आनंद सोडून, तर का त्या मुक्या जिवाला त्रास का द्यायचा विनाकारण? आणि आपल्या हाताला, कानाला आणि आजूबाजूच्या जाग्या किंवा झोपलेल्यांना देखील उपद्रव करायचा फुकटचा? मला तर कधीच हे समजलं आणि उमगलं नाही आज तागायत. असो.
माझी आई नेहेमी म्हणायची असं जर चुकून झालंच आमच्या कोणाच्या हातून, किंवा एखादी वस्तू जसे कि माठातलं पाणी काढण्याचं भांड / हात / पळी / वाढी वगैरे... "मनगटात जोर नाही वाटतं, असं का पडतंय सारखं, किंवा एवढ्या जोरात का हाताळला जातोय दरवाजा? "
उसाच्या रसाच्या टपरीवरचे घुंगरू, लहान बाळाच्या पायातले छोटे आवाज करणारे पैंजण, आणि आता हि दार आदळ आपट ची सवय मला एकाच पठडीत बसवावेसे वाटतात, संकेत द्यायला हो कि "येथे उसाचा रस मिळतो", "बाळ येथेच सुरक्षित खेळत आहे", "आता आम्ही उठले आहोत, चहा टाकावा". बरोबर कि नाही मंडळी. अहाहा काय भाषा आहे नाही, अनोखी...
असो, कदाचित ज्यांच्या मनगटात जोर नसतो तेच अश्या मुक्या आणि निर्जीव वस्तूंवर जोर लावायला जातात.
To listen to this story, kindly click on this link: https://youtu.be/PmsGR5qSC-0
Find me on Facebook and Twitter too: https://youtu.be/PmsGR5qSC-0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा