अनेक वर्ष सातत्याने ऐकलेला हा अनुभव आहे, माझ्या असंख्य मैत्रिणी कडून, नेहेमीच. ह्या मैत्रिणींमधे घरी काम करणाऱ्या मावशी पण आल्या च बरं का, तेथे तेच, का$$$$ही बदल नाहीच. अर्थात ह्याला देखील अपवाद आहेत बरं का, पण माझ्या ऐकिवात आले नाही, किंवा फारच तोडके आले असतील जे विस्मृतीत गेले आहेत कदाचित. हे चित्र देखील झपाट्याने बदलते आहेच आणि तो एक चांगला संकेत आहे.
मी स्वयंपाक आणि संपूर्ण घर सांभाळण्याच्या कलेबद्दल बोलते आहे. जर काही उन्नीसबीस झालच चुकून कधीतरी तर बापरे, ऐकवणं ताबडतोब सुरु अगदी ऑटोमॅटिक बरं का, आणि प्रत्येक वेळी न चुकता, जन्मसिद्ध अधिकार असल्यासारखा, कधी कधी अनेक दिवस.
पण जर सगळं उत्कृष्ट झालं, एकदम झक्कास, साग्रसंगीत ई. जे बहुतेक होतंच तेव्हा ह्याच मंडळींची तोंड बंद. बरोबरच आहे, कारण तेच तोंड यथेच्छ ताव मारण्यात बिसी असतं ना, काय करणार बिच्चारे. आणि तुडुंब खाल्यावर मग ग्लानी येतेच, अन्न आपली कमाल करतोच, मग काय, थोडक्यात म्हणजे "मॉरल ऑफ द स्टोरी" अशी कि मूकसंमती म्हणजे सगळं आवडलंय आणि ते इतकं आवडलंय कि बोलायला देखील जागा उरली नाहीच. आणि हो हे विसरून कसं चालेल मला आणि अख्ख्या स्त्री वर्गाला, जर ह्या ग्रेट मंडळींनी ऐकवलं नाही तर आपण पुढील काही दिवस सगळ्यांना उत्कृष्ट कसं खाऊ घालणार? नाही का? व्हिटॅमिन्स चा डोस हवाच अधून मधून किंबहुना हि त्या सगळ्यांची नवी भाषा आहे असंच मला वाटत, "आय ल$$$$$व्ह यू" म्हणण्याची, hmm कस्स शोधून काढलं मी, हुषारच म्हणतात मला मग. असो. "जीवन चलने का नाम... चलते रहो सुबह-ओ-शाम"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा