तर एक होती मुलगी. तिच्या आजोळी (आईच्या आईकडे) प्रचंड गर्भ श्रीमंती, सात पिढ्या सहज बसून खातील अशी. वाखाणण्या सारखे वागणूक ठेवलेले आजी आजोबा आणि त्याचमुळे हि देवी लक्ष्मी नेहेमीच त्यांच्यावर प्रसन्न. त्यामुळे घरी कशाचीच कमतरता नाहीच, रादर हा शब्दचं माहित नव्हता त्या कुटूंबाला. अगणित फळांनी, ध्यान्यानी घर सदोदित भरलेलं. अश्या आजोळी राहिलेली, वाढलेली हि लाडकी कन्यका.
तसेच तिच्या घरी, म्हणजे आई बाबांकडे सुद्धा कशाची म्हणजे कशाची कमतरता नाहीच. भरपूर सढळ हात त्या जोडप्याचा. घर अगदी फळांच्या पेट्यानी, डबे सुकामेव्याने, स्वयंपाकघर धन धन्याने भरलेले ई. हवे तेवढे हवे तेव्हा मनसोक्त खा, हिशोब ठेवायचा नाहीच, माहितीच नाही, ती पूर्णपणे अनभीन्य होती पूर्णपणे मोजून मापून खाणं करायला, वाढायला आणि खायला सुद्धा. त्यावेळी ५-८ डझन हापूस आंबे अश्या पेट्या घरी असायच्याच, त्याशिवाय रसाचे येत जात खाता येतील असे छोटे खानी आंबे देखील. तीच गती द्राक्षांची, चिक्कूची, संत्रांची, जसा सिझन असेल तसा.
मग चालीरीती प्रमाणे तिचं योग्य वेळी लग्न झालं, सासरची परंपरा / चालीरीती फक्त ऐकून होती ती. जसे जसे दिवस जात होते, तसे तसे लोक जास्त समजायला लागले. एकदा त्यांच्या कडे सासरी ती कचेरीतुन आली तर ६ हापूस आंबे ठेवलेले दिसले. तिने रितसर सासू सासऱ्यांना विचारून परवानगी मिळाल्यावर एक आंबा चिरला, मोठ्या भागाच्या दोन दोन फोडी आधी त्या दोघांना दिल्या आणि बाजूच्या छोट्याश्या दोन फोडी स्वतः तोंडात टाकणार तेवढ्यातच शिकल्या सावरलेल्या आर्थिक स्थिती उत्कृत्ष्ट असलेल्या सासू सासऱ्यांनी लाखोली वाहिली. माझा मुलगा घरी येण्याआधी आणि त्याला देण्याआधी तू हिम्मतच कशी केलीस हापूस सारखा आंबा खाण्याची? बापरे. मी ऐकूनच निशब्द झाले. लेव्हल नसलेली माणसं कशी असतात ह्याच ढळढळीत उदाहरण आहेत हे.
आज तिचं स्वतःच घर आहे, पुन्हा एकदा "त्याची" भरभरून कृपाच, आजी-आजोबा, आई-बाबांसारखे, सर्व फळं, भाज्या, खाण्याच्या पदार्थानी भरलेले. आता तेच सासरे सासूबाई हक्काने येऊन राहतात आणि हि त्यांना आणि बाकी सगळ्यांना पोटभर खाऊ घालते बिनधास्त. त्या मुलीने मनात अढी ठेवली नाही त्यामुळेच प्रगती करता आली आणि भरभराट झाली. गॉड ब्लेस हर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा