गेल्या काही वर्षांपासून दोन मोठे बदल झाले आहेत १. गाडीचे दिवे पांढरे झाले आहेत / गाडीला पांढरे दिवे बसवले आहेत आणि २. दिवे दिवसा काय सतत चालूच असतात.
मला माझ्या बाबांनी एकदा एका गोष्टीत सांगितलं होत कि अगदी पूर्वीच्या काळी म्हणे फक्त राजेरजवाड्यांना एक मान होता. त्यांच्या गाडीला तेव्हा उपलब्ध होते तसे कंदील / दिवे कधीही लावता येत होते, अंधारच पडला पाहिजे असं काही नव्हतं. राजाची खास गाडी, किंवा राजाची सवारी आहे हे दर्शविण्याचा एक प्रकार होता तो.
आता राजवट संपून अनेक दशकं झाली आहेत, मग आत्ताच हे दिव्यांच प्रकरण का?
एक दागिना आहे म्हणे तो अनेक गाड्या तय्यार करणाऱ्या कंपनीच्या दृष्टीने, आणि चालवणाऱ्याला एक कमी बटन दाबावे लागेल जर दिवे सतत चालू ठेवले तर, ते / चालवणारे विसरणार नाही हेडलाईट चालू करायला जेव्हा लागेल तेव्हा, ई. असे अनेक वेबसाइट्स वर लिहिलं आहे.
आधुनिक राजेच ना सगळे चालवणारे, काही जण तर फक्त आपलाच रस्ता असल्यासारखे च चालवतात गाड्या, भयानक. इतका सुरेख उपयोगी सूर्यप्रकाश असतांना नसतं डोकं का चालवतात कंपनी वाले कोणास ठाऊक का अजून काही अतिमहत्वाचं कारण आहे पांढरे दिवे सतत चालू ठेवण्यामागे ते शोधून काढलं पाहिजे मला, लवकरच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा