आमच्याकडे बरीच वर्ष झाले एक मावशी काम करतात, आजी आहेत. आता त्यांच्या कुटुंबाला आम्ही आणि आम्हाला त्यांच्याकडचे सगळेच ठाऊक झाले आहे. माझ्या आजारपणा विषयी मावशी घरी बोलत असतील. एक दिवस मला आजोबांचा (मावशींच्या अहोंचा) फोन आला तब्बेतीबद्दल विचारायला. थोडेसेच बोललेले असतील आणि त्यांनी फोन मावशींना दिला. त्यांना पुढे बोलताच आले नाही. "असं कसं झाला तुम्हाला" एवढं म्हणून डोळ्यात पाणी आलं.
दररोज मावशी मला
असंख्य त्यांचे अनुभव सांगत, त्यांना जमेल तसे
पाय
चेपून देत, नारळ पाणी आणून देत, जेव्हा मला
पायाचे दुखणे असैह्या व्हायचं. कित्ती दिवस सतत
माझं केलं मावशींनी.
तसं
पहायला गेलं तर आम्ही कोण कोणाचे बरं. मावशी तरी माझ्या कडे काम करतात, आजोबांना वाईट वाटण्याचे काय कारण. त्यांना फोन करण्याचे तरी काय कारण? खरं तर काहीच नाही. पण तरी ऋणानुबंध असतात हे खरंच. ह्या दोघांची परतफेड कशी करावी, काही कल्पना आहेत डोक्यात, संपूर्ण बरं वाटलं कि प्रत्यक्षात आणीन.
रविवार, १३ जून, २०२१
परतफेड... (भाग २)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा