खूप दिवसांपूर्वीची हि छोटेखानी गोष्ट आहे. तर त्याच असं झालं कि मधे एकदा माझ्या सासूबाई आजारी पडल्या, जे फार रेअर आहे, त्यामुळे सगळेच हादरले आणि हजर झाले त्यांची सेवा करायला / त्यांच्या सोबत राहण्याकरता ई. त्यात जाऊबाई, पुतण्या असे सगळे पण तब्येतीची कुरबुर करत होतेच. हा जरी संदर्भ असला तरी देखील रोजच्या सवयीप्रमाणे, आणि अनेक वर्षाच्या सवयी हो, भूक त्या त्या वेळी लागणारच, नाही का?
हॉस्पिटल च्या चकरा, सगळ्या वेळा बदलल्या कारण माझ्या जाऊबाईंकडे उदारहणार्थ संध्याकाळचा चहा फॉर example आमच्या घरच्या वेळेपेक्षा फार उशिरा होतो. आमच्या ह्यांनी सगळं निमुटपणे नवीन वेळेपणे, आणि जेवणाच्या पद्धतीपणे अडजेस्ट केलंच, आम्हाला सांगितलं सुद्धा. मला थोडसं वाईट नक्की वाटलं पण त्याही पेक्षा ह्या जगातल्या तमाम मुली आठवल्या आणि त्यांच्या बद्दल प्रचंड अभिमान वाटला पुन्हा एकदा.
जवळपास २५ वर्ष आईकडे राहून, तिथल्या खायच्या प्यायच्या सवयी घेऊन जेव्हा सासरी येतात तेव्हा काय होत असेल? बहुतेक गडबडच. अर्थात बरेच चांगले सासरचे असतात, वादच नाही, पण सगळेच नाही हो. वेळ लागतो पण शेवटी नवीन सवयी / वेळा / खाण्यापिण्याच्या पद्धती आत्मसात केल्या जातातच, कारण काही पर्याय नसतोच. हसतखेळत कधी त्यांच्या होऊन जातो हे कळत देखील नाही. होप आता तरी थोडीशी झलक मिळाली असेल माझ्या "ह्यांना" आणि थोडीशी उपरती पण आली असेल. असो. अशीच उपरती सर्वांना होवो हीच ईश चरणी प्रार्थना. म्हणजे सगळ्या माझ्या सख्यांना थोडे अजून सुखाचे दिवस अनुभवता येतील. सगळ्यांना घरच्या जेवणाचं, तपशीलवार वेळ पाळण्याच, वैविध्यता प्लॅन करण्याचं, आवडीनिवडी जपण्याचं महत्व पटेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा