चि. नील, वेद, केदार आणि मानस,
हॅलो. सालबादाप्रमाणे, ह्या वर्षी पण माझं मराठीतलं पत्र तय्यार आहे ह्या राखीच्या निमित्याने. थोडासा बदल केला आहे, कारण "Change is the only constant". तो बदल असा, कि खालील पत्र हे सगळ्या भावांसाठी आहे, एकच पत्र, आणि त्यात प्रत्येकासाठी मुद्दे लिहिले आहेत. दरवर्षी प्रमाणे राखीच्या दिवशी पत्र वाचन होईलच आणि मी पोटधरुन हसणार पण, सॉरी पण मी ह्या दिवसाची वर्षभर वाट बघत असते.
राखण करणारा आणि त्याचं इंद्रधनुषी प्रतीक म्हणजे राखी आणि हा राखीचा सण. तो सण आता उंबरठ्यावर उभा आहे. आज आणि भविष्यात मोठ्या भावाने रक्षण करायचं म्हणजे काय? बहिण थोडीशी गोंधळली, कन्फ्युज वाटली तर तिला थोडीशी मदत करणे, तंत्रज्ञान ची मदत घेऊन किंवा फक्त स्वतःचा वेळ देऊन. त्याला कळणार कसं कि बहिण confused आहे? तिला फोन केला कि तिच्या आवाजावरून, तिच्या स्टेट्स बघून किंवा तिने स्वतःहून सांगितले कि. बास. सोप्प आहे नाही का. मोठ्या भावाने च अश्या प्रकारे मदत का करायची कारण त्याने हे सगळं किंवा तत्सम अनुभवलं असेल कदाचित, किंवा त्याला त्याच्या बद्दल माहित असेल, सभोवतालून कळलं असेल. सध्या सगळं जग व्हर्चुअल पद्धतीने चालू आहे, मग ऑनलाईन मदत च पुरेशी आहे.
भाऊ थोडासा लहान असेल किंवा एकाच वयाचा असेल तर तो रक्षा करू शकतो का? नक्कीच करू शकतो. कसे? बहिणीला थोडं कूल रहा हे सांगून, "चलता है, कॉमन है..." इत्यादी सांगून, किंवा असं नाही होऊ शकत, तू काही तरी गैरसमज केलेला दिसतोय, सोडून दे पट्टाकिनी, असं काहीस. राखण करणं म्हणजे शारीरिक नाही हो, आजकाल सगळं बदललं आहे. तो आधीच सांगू शकतो, सतर्क करू शकतो , त्याला जर काही आढळलं / समजलं, जे त्याच्या बहिणींना सांगितलं पाहिजे असं, तर तो सांगणार. नवीन पद्धतीने कश्या गोष्टी करायच्या हे सांगणार, बडबड करणार, त्यामुळे बहिणी सजग होतील आणि शांत पण, जेव्हा गरज असेल तर.
काही का असेना, दोघे पण महत्वाचे, लहान किंवा मोठे भाऊ, ते आहेत सदोदित बहिणीसाठी हे दर्शवणे, संपर्कात राहणे, लक्ष ठेवणे, बहिणीच्या मित्र मैत्रीण / follower कोण ह्या बद्दल पण माहिती ठेवणे, सोशल मिडिया कडे दुर्लक्ष न करणे ई.
अर्थात ज्या आपल्या परंपरा आहेत त्या आपण सांभाळणाराच पण शिवाय नवीन स्वरूप पण महत्वाचे. "एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ" असं हवं आजकाल च्या दिवसात. बहिणीचा पण सिंहिणीचा वाटा आहे हो. त्यामळे मला ह्या क्षणी मी माझ्या आई, बाबा, आणि भावाला अनेक वर्ष छोटी असतांना विचारलेला प्रश्न आठवतो आहे, "मी च का राखी बांधायची दादाला? त्याने आधी मला बांधावी, ती पण मोठी, मग मी त्याला बांधीन", देवा. इतक्या वर्षांनी माझ्या विचारलेल्या प्रश्नाचं महत्व पटलं मला.
येणाऱ्या राखी पौर्णिमेच्या सर्व भाऊ बहिणींना आंनददायी शुभेच्छा. नील, वर्णिका, वेद, केदार, निधी आणि मानस सगळे एकमेकांच्या संपर्कात तुम्ही राहणारच ह्याची खात्री आहे मला, पक्की. खूप मोठे व्हा आणि आकाशाला गवसणी घाला आपल्या कर्तृत्वाने, यशाने, किर्तीने आणि व्यक्तिमत्वाने.
तुमच्या सर्वांची,
प्रीती.
तळटिप : चि. नील, केदार आणि मानस हे माझे पुतणे, नवीन पिढी मुळ्यांची आणि निधी पुतणी.
माझी लेक लहान होती तेव्हा पासून मी एक प्रयत्न जपला आहे अनेकवर्ष, तो म्हणजे दरवर्षी राखी बरोबर एक मराठी पत्र पाठवण्याचा आणि मग नील, केदार ते मला फोन वर वाचून दाखवणार. अहाहा. हा संदर्भ ह्या पत्राचा. मनापासून एक इच्छा आहे, एका वर्षी तरी राखी प्रत्यक्ष व्हावी ह्या सगळ्या मुलांची, पत्राने पाठवून नाही आणि मी पत्र वाचन प्रत्यक्ष अनुभवावं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा