अनेक वर्षांपूर्वी / खुप पिढ्यांआधी बाळ गंगाधर टिळक ह्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात केली. त्या काळी फारच थोड्या घरात श्री. गणपती बाप्पाची स्थापना होत असे. कारण त्या वेळी गणपती हे दैवत पिढ्यांपिढ्या चालत आलेले होते. त्यामुळे काही जणांकडे काही दिवसांचा, पण काही कुटुंबाकडे एक वर्षाचा गणपती बाप्पा स्थानापन्न होत असे. कधी ते काही कारणांमुळे / नवसामुळे / मुलगा झाला त्यामुळे असे. काही कुटुंबाकडे उजव्या सोंडेचा आणि बाकीच्यांकडे डाव्या असे अनेक पद्धतीने ह्या पाहुण्यांचे अगदी साधे पणाने पण फारच शिस्तीत आणि सोवळ्या ओवळ्या त केले जायचे. घरचेच पौरोहित्य करत असत.
त्यानंतर हळू हळू एकत्र कुटुंब पद्धती ला फाटा पडला. शिक्षणासाठी, नोकरीसाठी घरचे वैविध्य शहरात राहायला गेले, स्थायिक झाले. गावापेक्षा शहरं खुणावू लागली तरुणांना आणि त्यामुळे सध्या घरांऐवजी बहुमजली इमारती उभ्या राहिल्या त्याच छोट्याश्या जागेत. गेले काही वर्ष खूप ठिकाणी गणपतीच्या मुर्ती विकण्याची दुकानं दिसू लागली आहेत. ह्या वर्षी तर कहरच झाला, फक्त गणपती मुर्तींचे स्टॉल नाही तर अगदी प्रत्येक म्हणजे प्रत्येक प्रकारच्या दुकानांमधे मुर्ती विकायला ठेवलेल्या दिसत आहेत. टिळकांना सर्व लोकांना एकत्र आणण्याचा मानस होता. पण ह्या वर्षी तर सगळेच आपापल्या घरीच हा सण आणि बाप्पा साजरा करणार असे दिसतंय. असो ह्या वर्षीची परिस्थिती जरा वेगळी आहे, पण हे अगदी प्रत्येक घरात बाप्पा मांडणं मला फारच वेगळं वाटायला लागलं आहे. एकत्र येण्या ऐवजी विस्कळीत होत आहेत. नो वंडर इतक्या मोठ्या प्रमाणात मूर्ती विकण्यासाठी ठेवलेल्या दिसत आहेत. सगळ्यांनी एकत्र आरती करावी, मोदक / प्रसाद एकत्र ग्रहण करावा, त्याचं आगमन आणि विसर्जन करावं हे महत्वाचं, माझ्या दृष्टीने. हॉटेल च्या अर्ध्या भागात, कपडे विकण्याच्या, भाजी वाल्याकडे आणि सर्वत्र मुर्त्या विकायला ठेवल्या आहेत. जरी प्रत्येकाची भक्ती भाव महत्वाचा तरी हे फारच अती होतंय माझ्या मते. असो. मी माझं मत माझ्याचकडे ठेवते. शेवटी "तो" बुद्धी दाता आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा