मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०२१

गवत

माझ्या ऑफिस मधे आणि बऱ्याच ठिकाणी मी नेहेमी बघते कि पावसाळ्यानंतर उगवलेलं भलं मोठं गवत काढण्याचं काम सुरु होत. ते गवत फार शिताफीने आणि बारकाईने च काढावं लागत. ते पण कौशल्याचं च काम आहे, कोणाही ऐऱ्या गैऱ्याचं नाहीच. ते गवत बाकी इतर झाडाझुडपांनी (लँडस्केप) सुशोभित केलेल्या परिसरात उगवतांना दिसत. त्यामुळे गवत फक्त उपटून काढावं लागतं ते हि हाताने. तेथे अजून इतक्या हुशारीने चालणाऱ्या मशिन्स निघाल्या नाहीत आणि कदाचित निघणार पण नाहीत. वायुवेगाने हात चालवत फक्त गवत काढून वेगळं टाकल्यावर त्या शोभेच्या झाडांना किती मोकळं, स्वच्छ, आनंदी आणि हायसं वाटत असणार नाही? कारणं अनेक आहेत. त्या रानटी किंबहुना उपद्रवी गवतांमुळे प्रचंड किडे येत असणार, चावत असणार, त्यामुळे वाढ खुंटणार ई.

तसेच काहीसे नात्यांचे पण आहेच कि, ऋतू प्रमाणे, काही कारणास्तव रानटी उगवलेलं गवत काढून फेकून देणे अत्यावश्यक आहेच नाही तर वाढ खुंटणार हे नक्की, नको ते कदाचित आजार होणार हे पण नक्की. त्यामुळे उपयुक्त / उपयोगी, प्राणवायू देणारी झाड शोधा, जपा आणि त्यांच्या सोबत स्वतः पण मोठे व्हा. आनंद द्विगुणित होणार हे नक्की. पण हे गवत सातत्याने काढणं आवश्यक आहेच. ते काढतांना त्याच्या आजूबाजूला असलेल्या किड्यांचा त्रास होणारच पण सरते शेवटी मिळणार सुख, भरभरून आनंद महत्वाचा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...