अँप ची सध्या इतकी भाऊगर्दी झाली आहे कि ज्याचं नाव ते. जो उठतो तो एक नवीन अँप घेउनच येतो. अगदी म्हणे तिसरी चौथी च्या विद्यार्थांनी देखील वैविध्य अँप तय्यार केलेत. अहाहा. काय बोलायचं आता. आधीच प्रत्येक कंपनीचा फोन वापरण्याची पद्धत वेगळी, त्यात "करलो दुनिया मुठीमे" अशी स्थिती झाली आहे, मोबाईल म्हणजे सर्वोसर्वच झालाय. प्रत्येकाला तसं पाहिलं गेलं तर प्रत्येकाबद्दल सर्वच ठाऊक आहे, किंबहुना माहिती मिळणं अतिशय सोप्प झालायं. प्रत्येक अँप ला तुमची जन्म कुंडली इतंभूत माहिती आहे, तुमच्या स्वतः पेक्षा कितीतरी पटीने जास्त. प्रत्येक अँप ची आपली एक वेगळीच खास मांडणी. त्यामुळे प्रत्येक अँप गणिक नवीन शिकणं आलंच, ते लक्षात ठेवणं आलं आणि अनेकदा बरेच बदल पण घडतात त्या अँप मधे, ते पुन्हा शिका ई. कधी कधी नको नको होतं, सोय आहे पण किंमत पण मोजावी लागते मोठ्या प्रमाणात. तुमचे खाजगी नंबर अनेकांना दिले जातात / उपलब्ध होतात त्यामुळे नको तेव्हा नको ते भलत्या वेळी फोन येतात, थोडीशी नाही म्हटलं तरी अनाहूत भीती राहते अँप डाउनलोड करते वेळी आणि वापरतांना सुद्धा. सर्वप्रथम तर नक्की अँप कुठला आहे, त्याच चिन्ह दिसत कसं, बरोबर अँप डाउनलोड केला ना इथं पासून सुरवात होते. सोय आणि गैरसोय तराजूत ठेवून मोजले तर गैरसोयीचा परडा भारी दिसतो बहुतांशी वेळा. असो
"तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून पण जमेना" अशी अडकत्यात अडकल्यासारखी स्थिती झाली आहे. "बदल हाच सतत स्थिर असतो / Change is the only constant" अश्या पद्धतीने तंत्रज्ञानाला आपलंस करत मार्गक्रमणा करूया पुढे हेच बरं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा