अनेक वर्ष सरकारी नोकरी केल्यामुळे, असंख्य ठिकाणी बदली झाल्यामुळे, वैविध्य मोठ्या प्रोजेक्ट्स वर काम केल्यामुळे, स्वभावामुळे, अनेक लोकांना मदत केल्यामुळे, खूप विषयांवर उत्कृष्ट पकड असल्यामुळे, भरपूर वाचन असल्यामुळे किंवा अजून अनेक अश्या कारणांमुळे माझ्या वडिलांचे ओळखीचे खूपच होते. मला कुठेही जायचं असल्यास किंवा कुठल्याही क्षेत्रात गरज असल्यास ते हव्या त्या व्यक्तीला निरोप देत, पण मला न जाणवू देता, माझं स्वतंत्र सांभाळून शिवाय त्यांची शांतात हे त्यांनी उत्कृष्ट पणे सांभाळलं आणि ते मला आत्ता जाणवत आहे. मी वयाने थोडी मोठी झाले, इकडे तिकडे जाऊ लागले आणि माझ्या पण ओळखीचा सागर सातत्याने पसरत राहिला. पण त्यात देखील कधी कधी असं व्हायचं कि मला प्रश्न पडायचा "आता पुढे कसं जायचं?ओळखीचं किंवा मार्गदर्शन करणारं माणूस नाही?" अश्या वेळी मी माझ्या वडिलांना विचारायची तेव्हा ते दोन उत्तर देत असतं, १. अगं जरा थांब, आता नाही लक्षात येत असेल जर एखादी आवश्यक डायरेक्ट ओळखीची व्यक्ती, तर थोड्या वेळानी येईल, आठवेल, आणि २. नाहीच निघालं ना कोणी ओळखीचं तर तेथे जा, नवीन ओळख कर आणि हे नेहेमी लक्षात ठेव, "तो" आहे ना, त्याची ओळख आहे ना तुला, विश्वास आहे ना त्याच्या अस्तित्वावर, तो मदत करणारच ह्यावर मग अजून कोणाची ओळख का हवी तुला? पुढे हो, होईल सगळं नीट. त्याची ओळख सर्वांशी आणि त्याच्या पेक्षा मोठी ओळख हवी का?
आता माझ्या मुलांची बारी आली, माझी भूमिका बदलली, आता मला उभं करायचं होत सगळं, मग झाले सुरु, शाळेत मुलांना टाकण्याचं ठरवलं, माझी सपोर्ट सिस्टिम उभी राहिली,मला शांततेत ऑफिस करता आलं, अनेक वर्ष न चुकता मदत मिळाली जेव्हा हवी / लागली तेव्हा. आता दुसऱ्या गावाला जाऊन शिकायचं म्हणतात मुलं. नवीन आव्हान उभं ठाकलं, काही क्षण डोक्याचा भुगा झालाच माझ्या कारण ते ठिकाण एवढं परिचयाचं नव्हतं. मुलगा पण चिडवायला लागला, म्हणाला आता काय निघतेय का ओळख? मी फक्त स्मित हास्य केलं, कारण खरंच कोणी म्हणजे कोणी उभं ठाकलं नाही डोळ्यासमोर. केलेत मी प्रयन्त, येईल यश, पण मग आधी बाबांचं वाक्य आठवलं. शांततेत दोन तीन दिवस घालवले, अनेक निरोप दिले आणि हा हा म्हणता यादी तय्यार झाली ओळखीच्या माणसांची. आता मला कदाचित शांत झोप लागेल, माझ्या काळजाचा तुकडा एकटा नाही त्या नवीन शहरात हे माहिती होतंच, विश्वास होता पण आता खात्री पटली. त्याला त्यातले काहीच कॉनटॅक्ट सांगणार / देणार बाकी माझ्या साठी राखीव, लक्ष पण ठेवणार न कळत आणि त्यांचं अस्तित्व माझ्याच साठी जसं काही अशी भूमिका असणार. आज पर्यंत हे मला देखील जमतंय हे खूप समाधान कारक आहे माझ्यासाठी, बाकीच्यांचं नाही माहित मला. अर्थात कोणीच सापडलं नसतं तर डायरेक्ट मेल करणार होते मी तिथल्या दिग्गज मंडळींना, आणि जाऊन प्रत्यक्ष भेटणार पण होते, पण आता घाईने ती कृती करण्याची गरज नाही. "त्याची" आणि त्याच्यासारखी मनुष्य रूपात लाभलेली साथ / ओळख फार महत्वाची. त्या ओळखीचा सुदुपयोगच फक्त करा आणि स्वःता देखील स्वतःची ओळख निर्माण करा, दुसऱ्यांना जमेल तशी मदत करा, परतफेड करत राहा, ह्या ना त्या स्वरूपात.
शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२
ओळख
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा