अगदी लहानपणी पासून शाळेत म्हणावं किंवा इतर शिक्षक / शिक्षकेतर तज्ज्ञांकडून वैविध्य पाण्याचे स्रोत, किंवा वाहत्या पाण्याच्या जागा / सांडपाणी ई. आणि अनेक संलग्न विषयावर शिकलो / ऐकलं / बघितलं आणि वाचलं देखील. थोडक्यात काय तर नाले हे बहुतांशी उघडेच असायला हवेत किंबहुना असतातच, पण काही वेळा काही कारणास्तव ते शिस्तीत झाकले देखील जातात. म्हणजे आधी उघडा असलेला नाला गरजेनुसार पाईप वगैरे व्यवस्थित मांडून बुजवला जातो. आता हे करण्यामागची कारणं अनेक आहेत, त्यातलं एक रस्ता रुंदीकरण. आता रस्ता मोठा का करावा लागतो कारण रहदारी वाढलेली दिसते म्हणून. रहदारी म्हणजे जास्त गाड्या, विविध कचेरीत / ठिकाणी जाणाऱ्या, कधी कधी ठरलेल्या वेळी नाही तर एका वेळी खूप जास्त, ई. असे अनेक प्रकार आढळून येतील. बरोबर?
माझ्या दृष्टीने नाला हा नैसर्गिक तय्यार झालेला असतो, जेव्हा तो दूर खेडोपाडी, शहराबाहेर च्या ठिकाणी असतो. प्रत्येक वेळी ठरवून बांधालाच जाईल नाला हे निश्चित नसतं, किंवा हे नाल्याचे दोन प्रकार म्हणता येतील.
आकाशाखाली उघडा नाल्याच्या पाण्यावर सूर्यकिरण पडत असल्यामुळे त्रासदायक जीवाणू / किटाणू / दुर्गंध काही अंशी नैसर्गिक रित्याच नाहीशे होत असतील. मी ह्या विषयातली तज्ञ् तर अजिबातच नाही, आणि मला ह्या विषयाची ऐकिव माहिती आहे वरवरची. पण सामान्य ज्ञानावर आधारित हे विचार आहेत. मला असं वाटतं जर नैसर्गिक रित्या नाला तय्यार झाला असेल तर तो तसाच टिकवून ठेवावा. कशाला महत्व द्यायचं हे ठरवायला पाहिजे, वाढलेल्या गाडयांना का सांडपाणी इतकी वर्ष वाहून नेलेल्या नाल्याला. माझ्या मते तर जर पावसाळ्यात जास्त पाऊस पडला तरी हे उघडे नाले फार फार कामाला येतात, जास्तीचा प्रवाह सामावून घेतात, वाहत्या पाण्याला जास्त जोर असेल किंवा बरेच वर्षाचा तो नाला असेल तर त्याची खोली पण आपोआप वाढते, ज्याने अजून जास्त पाणी सामावून घेतले जाते. माझ्या सारखीला जर हे कळत तर आधुनिकीकरण करणाऱ्यांना नाही. पाईप हे पर्याय नाहीतच. आणि मग दुर्घटना झाल्याच्या बातम्या वाचनात येतात. टाळा हे लोक हो, खरंच टाळा.
त्या ऐवजी म्हणजे नाला बुजवण्याच्या ऐवजी ज्या संस्था त्या मार्गावर स्थापन झाल्या आहेत आणि ज्यामुळे गाड्या वाढल्या आहेत त्यांना जमल्यास त्यांच्या कचेरीच्या वेळा मागे-पुढे करायला सांगा, लोकांना एकमेकांसोबत यायला सांगा, बस वापरायला सांगा, गाड्यांचा सुळसुळाट होणार नाही ह्याची काळजी आधी घ्या, नाला बुजवण्यापेक्षा. माझ्या डोळ्यादेखत बदल होत आहेत पण मी एक सामान्य नागरिक असल्यामुळे काहीही करू शकत नाहीच. एका ठिकाणी फक्त नाला नाही बुजवला तर त्याची दिशा / वळण पण थोड्याफार प्रमाणात हलवलंय, देवा, सद्बुद्धी दे बावा.
बुधवार, ९ फेब्रुवारी, २०२२
नाल्याचे महत्व
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा