शनिवार, ५ फेब्रुवारी, २०२२

आवडती / नावडती

प्रत्येकाचीच एक आपली अशी आवड निवड असते, मुख्यत्वे काम करण्याच्या क्षेत्राची आणि त्यामुळेच कदाचित शिक्षण क्षेत्राची सुद्धा. प्रत्येकालाच त्याला आवडेल त्या क्षेत्रात शिकायला आणि काम करायला मिळतंच असं नाही. किंबहुना बहुतांशी मिळत नाहीच, आपण नावडत्या किंवा अनोळखी क्षेत्रात सुरवात करतो आणि हळू हळू न कळत कधी ते क्षेत्र आवडायला लागत ते समजत देखील नाही, बरेचदा, किंबहुना खूप जणांना ते आवडून घ्यावं लागतं कारण कदाचित त्या वेळी दुसरा पर्यायच नसतो. किंवा ज्या पद्धतीने शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतात, काही वाचण्यात येत, ऐकण्यात येत,  त्यामुळे त्या क्षेत्रात काम सुरु होत आणि अनेक वर्ष केलं जातं सातत्याने.

आता माझंच बघा नं, का कुणास ठाऊक अगदी लहानपणी पासून मैत्रिणी, आजूबाजूचं वातावरण, ते दिवस ई. मुळे असेल कदाचित पण स्वयंपाकाची फार आवड निर्माण झाली. खूप आनंदाने आणि मोठ्या प्रमाणात वैविध्य पदार्थ मी कधी करायला सुरवात केली माझं मलाच समजलं नाही. मी नेहेमी आईला म्हणायचे कि मला फक्त दहावी करायचं आहे, पुढे काही नक्को. मला खूप आवडेल रोज घरी सर्वांसाठी स्वयंपाक / पदार्थ करायला. पण कुठे काय, मी फार थोडा वेळ घालवते स्वयंपाक घरात आणि विद्यावाचस्पती पर्यंत मजल-दरमजल करत गेले, कुठे दहावीला थांबण्याची इच्छा आणि कुठे पीचडी. माझं मलाच कधी कधी फार आश्चर्य वाटत ह्याच कि मला अजिबातच लिहायला आवडत नव्हतं, म्हणजे मी खूप रागवून घेतलं आहे ह्या करता. हां, शाळेत / परीक्षेत निबंध, किंवा अगदी अत्यावश्यक एवढंच मी लिहीत असे, कामापुरता मामा. आणि आता बघा, क्षणभर विश्रांती घ्यायची इच्छा होत नाही, कसं का असेना पण टिपावंसं वाटतंच.

दुसरं पण उदाहरण माझ्याच घरातलं, माझी सावली, माझी लेक, साधारणतः दहावी / अकरावीत कोणी विचारलंच कि पुढे काय करणार आहे, तर म्हणायची कशी "काय करणार नाही हे मला पक्के माहित आहे, मला काहीही झालं तरी इंजिनीरिंग आणि त्यातनं संगणक च इंजिनिअर नाही व्हायचं". आणि आता? मॅडम तेच करत आहेत. काय म्हणायचं ह्याला कोणास ठाऊक. असो.

सांगण्याचं तात्पर्य असं कि मला मनापासून गृहिणी व्हायचं होत, फक्त घर उत्साहाने सांभाळायचं होतं आणि मी तितकीच सतत घराबाहेर राहिले कित्येक वर्ष. आवडीचंच क्षेत्र / माणसं / नोकरी / मित्रपरिवार / घर / शेजारी ई. मिळालं तर सोन्याहून पिवळं, पण काही कारणास्तव नाही मिळालं तर काही हरकत नाहीच. माझ्या अनुभवा वरून सांगते थोडे दिवस त्या क्षेत्रात सरले कि आपोआप मनापासून आवडायला लागतं, आपलंस होतंच. मिळालंय ते तुमच्याच साठी आहे, तुमच्या भल्यासाठी आहे, तुमच्या योग्यतेच आहे ह्यावर विश्वास ठेवाच. "श्रद्धा आणि सबुरी" ठेवा म्हणजे मार्गक्रमणा चालू राहिल च.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...