Since a symbol of victory is always held high, so is the gudhi (flag). It is believed that this festival is celebrated to commemorate the coronation of Rama post his return to Ayodhya after completing 14 years of exile. Gudhi is believed to ward off evil, invite prosperity and good luck into the house. - published on Wikipedia page https://en.wikipedia.org/wiki/Gudi_Padwa
https://www.mymahanagar.com/festival/why-gudhi-padwa-is-celebrate/417354/
माझ्या दृष्टीने गुढी हि एक मानव आकाराला दर्शवणारी आहे, डोकं आहे आणि वस्त्रालंकार देखील. डोक्यावर टिळक आहे, गोड गाठी ह्या साठी कि येणार संपूर्ण वर्ष असेच गोड जावे, गोड आठवणी निर्माण व्हाव्यात आणि त्या गाढी सेवन केल्या कि उन्हाचा त्रास होत नाही. कडुलिंब तर औषधीयुक्त आहेच आणि त्याच्यामार्फत येणार / घरात शिरणारा वारा संपूर्ण घराची शुद्धता करतो. नवीन वस्त्र म्हणजे त्या घरच्या माउलीला धन्यवाद देणे, आणि असेच वर्षभर घर नवीन कपड्यालत्त्यांनी भरलेलं राहो ह्या साठी. उंच ह्यासाठी कि ह्या सगळ्यांची सावली, आशीर्वाद घरावर सदोदित राहोत. काठी धुवून, वाळवून, गंध, अत्तर लावून पूजा, धुपारती ई. अशी ती सहकुटुंब सहपरिवार मांगल्यमय वर्षाची सुरवात, म्हणून गुढी उभारायची. मला एका अमराठी व्यक्तीने परवा विचारलेला हा प्रश्न आणि मी दिलेलं उत्तर, म्हणून येथे मंडळी. तुमचे आणखीन काही विचार असतील तर जरून सांगा मंडळी. धन्यवाद.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा