शनिवार, ११ जून, २०२२

ऐकावे ते नवलंच

चारधाम यात्रेचे महत्व सर्वश्रुत आहेच. आयुष्यात एकदा किंवा एकापेक्षा जास्त वेळा हि यात्रा करावी असे आपले पूर्वज सांगून गेले. ह्या यात्रेला फक्त सामाजिक आणि धार्मिक महत्व नसून वैज्ञानिक दृष्टिकोन पण आहे. हि यात्रा केल्याने यात्रीकरुला मानसिक समाधान मिळतं पण एकंदरीत ह्या यात्रेचा अनुभव गाठीशी असण्यासारखं भाग्य दुसरं नाहीच. बहुतांशी भारतीय हि यात्रा करतात, सफल होतात, मग बाकी मंडळींना उत्साहाने वर्णन कथन करतात, लिखाण करतात, आताशा विडिओ फॉर्म मधे देखील सार्थ वर्णन उपलब्ध आहेच, ह्या त्यांच्या सर्व प्रयत्नांमुळे पुढील पिढीला किंवा त्या घरच्याच नाही पण बाकी सर्व मंडळींना उत्साह येतो हि यात्रा करण्याचा आणि हि श्रृंखला अशीच सुरु राहते. एकदा सफल यात्रा करून आल्यावर ती पुन्हा करण्याची इच्छा होणं ह्यातच सर्व आलं, पण ती पणाने तडीस नेणं ह्या करता आशीर्वाद तर लागतातच पण मानसिक भरारी देखील आणि हे सगळं जर फक्त वय वर्ष ८६ त करायचं ठरवलं तर, डोक्यात आलं तर? "श्री. दत्तगुरूंचे" ज्यांच्यावर भरभरून आशीर्वाद आहेत, असे आमचे बाबा इतक्यातच चार धाम यात्रेला जाण्यास तय्यार आहेत, पुन्हा एकदा. माझ्या मते कुठलेही देवस्थान, यात्रा, ठिकाण, स्थळ काही म्हणजे काही राहील नाही बघायचं त्यांचं. सगळं झालं आहे. प्रचंड उत्साह अगदी प्रत्येक गोष्टीत मग ते खाणंपिणं असो, क्रिकेट असो, देशपरदेशी हिंडणं असो, नाही तर साधना असो, सगळ्यात अग्रक्रम त्यांचाच, नेहेमीच. अर्थात त्यांची साथ देण्याकरता सज्ज झाले आहेत त्यांचे थोरले सुपुत्र, लहान भाऊ आणि वाहिनी देखील. आमच्या बाबांकडून खूप काही शिकण्यासारखं आहेच, शिवाय कृतीतून त्यांनी अनेकदा खूप काही दर्शवलं पण आहे. नवतरुणांना लाजवेल असा सळसळता उत्साह, ताकद, मनाची तय्यारी आणि जिद्द, ह्याच्या जोरावर लवकरच हि यात्रा सफल होणार ह्यात काही शंकाच नाही.  ह्या आमच्या सर्व मंडळींना ह्या यात्रेकरता शुभेच्छा आणि अशीच त्यांची मार्गक्रमणा ह्या पुढे अनेक वर्ष सातत्याने सुरु राहो हि श्री. दत्तचरणी प्रार्थना.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...