रविवार, ४ सप्टेंबर, २०२२

प्रवास

मला अजूनही तो दिवस लख्ख / स्वच्छ आठवतो आहे जेव्हा मी आणि ह्यांनी मिळून घरी अप्रतिम अशी राखी तय्यार केली होती आणि ती माझ्या लेकीने फक्त मम म्हणत गोऱ्यापान, लठ्ठ मनगटावर बांधली होती. काय दिसत होतं ते मनगट तेव्हा. आई शपथ. त्या नंतर म्हणजे २००४ पासून सुरु झाली मग एक खूप गोड जबाबदारी जी मी तब्बल १८-१९ वर्ष निभावली, ती म्हणजे माझ्या वार्णिकाच्या भावंडांना राखी पाठवणे पत्रासहित. आधी आई वडिलांच्या पत्यावर आणि नावावर ती राखी पाठवली जायची. मग त्यात एक सुक्ष्म बदल घडला तो म्हणजे ते पत्र वाचन. अहाहा . माझे कान अगदी तृप्त होतात आणि हसून हसून पुरेवाट जेव्हा हि नवीन पिढी माझं लिहिलेलं मराठीतलं पत्र वाचते आवर्जून प्रत्येक वर्षी न चुकता. आणि आता ह्या वर्षी अजून काही महत्वाचे, हवे हवेसे आणि आशिर्वादात्मक असे बदल आहेत ते म्हणजे माझी लेक आता प्रत्येक भावाला ऑनलाईन स्वतः राखी पाठवणार आहे, कारण सर्वात मोठा इंटर्नशीप करतो आहे, ऑफिस ला जातो आहे, दुसरा वसतिगृहात आहे आणि तिसरा कधीही वसतिगृहात पोचेल. त्यामुळे सगळेच १९-२० च्या उंबरठ्यावर आहेत, फक्त उंचीने नाही तर वैचारिक, बौद्धिक आणि इतर अनेक पातळीवर मोठे झाले आहेत, सर्वार्थाने उंची गाठण्याचा प्रयत्नात आहेत. त्यामुळे आता फक्त माझं एकच काम उरलंय ते म्हणजे हे असं गोंडस छोटसं पत्र लिहिण्याचं. ते माझ्या हातून सतत घडो, हि आमची नवीन पिढी सर्व पातळीवर सुधृढ, समाधानी आणि संपन्न राहो हि ईश चरणी प्रार्थना. आणि दरवर्षी अशीच राखी पाठवा सर्वांना, एकत्र या  आणि हा सण जमेल तेव्हा साजरा करा हि विनंती.  सामूहिक पत्र वाचनाची वाट पाहते आहे मी, ११ ऑगस्ट ला, खूप छान सोहोळाच असतो तो माझ्या दृष्टीने. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...