शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२

अनवाणी

ह्या अर्धशतकी आयुष्यात मी असंख्य वेळा हे अनुभवलं आहे, बघितलं आहे कि एखादी मोठी व्यक्ती किंवा राजकारणी एखाद्या शहरात किंवा कार्यक्रमाला भेट देणार म्हटलं कि विमानतळापासून ते त्या कार्यक्रमाच्या स्थळापर्यंत चकचकीत स्वच्छता होते. इतकी स्वछता होते कि अगदी डोळ्याला न दिसणारे छोटेसे खडे देखील वेचले जातात नकळत किंवा काही त्यांच्या असलेल्या मशीन ने. खूप दिवस आधीपासून जय्यत तय्यारी केली जाते मोठ्या प्रमाणात. अगदी कार्यक्रमादिवशी सुद्धा अनेकदा झाडू / खराटा मारला जातो, हात फिरवला जातो बऱ्याचदा. असो. अर्थात अशी स्वच्छता व्हायलाच हवी पण मग प्रत्येक वेळी. सध्या नवरात्रीचे दिवस सुरु आहेत आणि भारतात किंवा महाराष्ट्रात खूप भक्त अनवाणी ये-जा करतात, घरून - कामावर आणि परत. त्यांची ती नितांत श्रद्धा असते किंवा त्यांना ज्यांनी सांगितलं असतं त्यांच्यावर दृढ विश्वास. आणि हे दरवर्षी होतं. ठिकठिकाणी बघायला मिळतं. ९-१० दिवस अनवाणी ये-जा आव्हानात्मक आहे आणि ती देवी / शक्ती करून घेते सर्व निमूटपणे. मग ह्या नवरात्रीच्या दिवसांआधी सर्वत्र रस्त्यांची स्वछता का नाही केली जात आवर्जून? स्थानिक राजकारणी दिग्गज किंवा त्यांच्या गटातले फलक लावून, विविध सोसायटी जाऊन जनजागृती का नाही करत कि पुढील ९-१० दिवस रस्त्यावर कुठलीही वस्तू टाकू नका, पायाला टोचेल, इजा करेल अशी किंवा स्वछता राखा ई. जे अनवाणी चालत नाहीत, किंवा सत्तेवर आहेत, महानगरपालिका किंवा अजून काही मोठी माणसं, किंबहुना अगदी प्रत्येक व्यक्ती रस्ता साफ ठेवून त्या देवीची सेवा / आराधना एका अर्थाने साधू शकतात सहज. असो. बघा प्रयन्त करा, निघेल मार्ग ह्यातून, देईल ती सर्वांना सद्बुद्धी नक्कीच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...