अगदी शालेय वर्षांपासून प्रत्येक विद्यार्थी प्रकल्प अक्का प्रोजेक्ट वर काम करत असतो. बहुतांशी प्रत्येक विषयाला संलग्न असे प्रोजेक्ट्स असतात. प्रोजेक्ट म्हणजे प्रत्यक्ष एखाद्या विषयावर किंवा संकल्पनेवर स्वतः काम करणे. स्वतःच्या हातून जेव्हा काम होतं तेव्हा त्या विषयाचे कांगोरे जास्त सविस्तरपणे आणि ठळकपणे समजतात, लक्षात राहतात. ह्या साठी फक्त ऐकीव माहिती पेक्षा किंवा माहिती ऐकून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे देण्यापेक्षा प्रात्यक्षिक आणि प्रयोग करणे जास्त योग्य. हे प्रयोग कधी एकट्याने किंवा एका संघाचा भाग म्हणून करायचे असतात.
एकट्याने जर प्रोजेक्ट वर काम करायचं ठरवलं तर अतः पासून इती पर्यंत संपूर्ण जबाबदारी त्या एकट्याची असते, कोणावरही विसंबुन राहावे लागत नाही, अगदी स्वतःचं बाळ असल्यासारखं सगळं स्वतः च करावं लागतं. पण ह्या मुळे प्रोजेक्ट वर काम करणाऱ्याला हे ठाऊक असतं कि आपण राजे आहोत, सगळं कार्य पार पाडायला स्वतःच्या विचारणे संपूर्ण मोकळे. त्यामुळे गती मिळते, कोणासाठी थांबून राहायचं नसतंच, त्यामुळे एका डोक्याने काम होते आणि पट्टदिशी संपते देखील, किंबहुना इतकं स्वात्यंत्र मिळालंय म्हटल्यावर वेळेआधी काम व्हायलाच हवं. हे सगळं खरं असलं तरी "एका पेक्षा दो भले", ह्या पद्धतीने प्रोजेक्ट वर काम करतेवेळी चर्चा करायला कोण नसतं. चर्चे दरम्यान काही वेगळी बाजू समजू शकते त्या व्यक्तीला आणि त्यामुळे प्रोजेक्ट अजून उत्तम होऊ शकतो. एकमेकांसोबत काम करतांना कळत, न कळत प्रत्येकजण खूप काही शिकतं. ऐकायला शिकतं, एकमेकांना समजावून घ्यायला शिकतात, संवाद साधला जातो, काम वाटून घेतलं जातं, कधी कोणी एखाद्या अंगाने निष्णात असतं त्यामुळे प्रोजेक्ट ला एक अमूल्य असं रूप येतं. प्रत्येक सजीव हा सामाजिक प्राणी आहे, समाजाचा भाग आहे, अविभाज्य घटक आहे, त्यामुळे एकत्र, लोकांसोबत राहणं हे अत्यावश्यक आहेच. प्रत्येकवेळी किंवा वेळोवेळी एकट्याने जग जिंकणं थोडंस जास्त आव्हानात्मक आहे. त्यामुळे संघात काम करतांना मस्त आनंद लुटा, "हो" म्हणा, आपली मतं मांडा, लवचिक राहा, इतरांनी सुचवलेलं करून तर बघा कदाचित रापचिक बसेल, तुम्हाला आवडेल देखील. चला तर मग, प्रत्येकजण उठा आणि विस्मृतीत गेलं असेल तर पुन्हा आठवा कि आपण एक संघ आहोत. तुम्ही एकटेच पण संघासाठी काम करता. प्रत्येकाला जो प्रोजेक्ट चा भाग दिला असतो काम करायला तो खरं तर एक छोटेखानी प्रोजेक्ट च असतो ना. सगळे तुकडे सरतेशेवटी जोडूनच प्रोजेक्ट पूर्ण होणार ना?
महाविद्यालयां पर्यंत संकल्पनेच्या रसातळाशी जाऊन शिकण्या करता एकट्याने करा कि बिनधास्त प्रोजेक्ट, पण कॉम्बो ठेवा नेहेमीच. सगळ्याची तय्यारी असावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा