रविवार, १२ मार्च, २०२३

ते आणखीन एक रहस्य

नाटकं, नृत्य समारंभ, गाण्याचे कार्यक्रम, किंवा इतर रंगभूमीवरचे सगळेच कार्यक्रम इतके आवश्यक का असतात ह्या मागचं आणखीन एक महत्वाचं रहस्य आज मला समजलं, प्रकर्षाने जाणवलं. एक बाजू म्हणजे ते कलाकार, त्यांना काम मिळावं, त्यांची कला सादर करण्याची संधी मिळावी, अनेक विषयांना हात घालता यावा ई. साठी तर आहेच आहे पण दुसरी बाजू प्रेक्षकांची आहे, ती पण कणभर जास्त महत्वाची. ऑनलाईन रंगमंच यायच्या आधी सर्व सादरीकरण रंगभूमीवर होत असे प्रत्यक्ष रूपात, म्हणजे कलाकार आणि प्रेक्षक ह्यांच्या उपस्थितीत, नाट्यगृहात किंवा तत्सम जागी. तोडीचे कलाकार हृदयाला हात घालणारे विषय, सामाजिक संदेश देणारे / पोटभर हसवणारे, प्रचंड मनोरंजन करणारे असे आणि तितक्याच भल्यामोठ्या प्रमाणात दाद देणारे प्रेक्षक, अनुभवी, दर्दी प्रेक्षक. आवर्जून वेगवेगळ्या ठिकाणांहून उपस्थित राहिलेले प्रेक्षक, त्यामुळे सत्संग (म्हणजे फक्त भजन / कीर्तन आणि देव-देव नाही हो) म्हणजे नाटकाची आवड असणारे एकत्र २-३ तास सलग बसून परमानंद घेत असतं, मनसोक्त टाळ्या वाजवत असतं आणि खुश / समाधानी होऊन जातं असतं. तो एकत्रपणा + मोकळेपणाने वाजवलेल्या टाळ्या + सत्संग (व्हायब्रेशन्स) + जागा बदल + नाटक / कार्यक्रमाचे लागलेले वेध + कार्यक्रमानंतर केलेली चर्चा ई. गोळाबेरीज म्हणजे सुधृढ प्रकृती. तेव्हा अश्या कार्यक्रमांना जायचं म्हणजे एक सोहोळा असायचा जणू. तिकीट दर जास्त नसायचे, जातीचे कलाकार, उत्कृष्ट अभिनय, वातावरण निर्मिती, खळखळून हास्य आणि प्रत्येक वेळी वाजवलेल्या टाळया तब्बेत जपण्यास मदत करणारच, सवालच नाही. 

कुठलेही तुलना नाहीच, पण तंत्रज्ञानामुळे आणि इतर अनेक कारणांमुळे हे सगळं बंद पडत चाललंय, अगदी थोड्या प्रमाणात सुरु आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.  तंत्रज्ञानामुळे जरी अनेक कलाकारांना संधी मिळत आहे, घर बसल्या सगळं बघायला मिळतं आहे तरी त्याची किंमत चुकवावी लागते आहेच. 

त्यामुळे एक नम्र विनंती, "टॉप उप" करायला, म्हणजे ऊर्जा, चैतन्य, उत्साह, स्नेह, आनंद, आणि असे इतर पेहेलू, मस्त घरी आरती करा, अधेमधे देवळात जा, नाटकं किंवा रंगमंचावर सादर होणारे साधे कार्यक्रमांना उपस्थिती लावा, "चला हवा येऊ द्या" अश्या सारखे अनेक हिरेजडित एपिसोड बघा, "व. पु. काळे" / "पु ल देशपांडे" लावा टीव्ही वर, यु ट्यूब वर, डोळे बंद करा आणि मनसोक्त आनंद घ्या, वातावरण निर्मिती होऊन जाऊ दे आज सुद्धा आणि टाळ्या देखील व्हायलाच हव्यात. अत्यंत गरजेचा रामबाण इलाज आहे तो, तेव्हा देखील होता, आज देखील आहे, उद्या पण राहणारच. सोप्पा आहे, फुकट आहे आणि जगावेगळे फायदे देऊन जाणारा आहे, फायदे फक्त देऊन थांबणारा नाही तर टिकविणारा देखील आहे.  सर्वप्रथम गरजेपुरती स्क्रीन वापरा, इतर वेळी वाचन, लिखाण, मनन, चिंतन, मोकळ्या हवेत फिरणं असं काहीसं करा, पण तंत्रज्ञान बाजूला ठेवूनच. आणि मग बघाच कसे मस्त रहस्यमय बदल घडतात ते.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...