सोमवार, १३ मार्च, २०२३

आंधळी कोशिंबीर

लहानपणी अत्यंत आवडीने खेळलेला खेळ. काय नाव? कोशिंबीर काय? आंधळी समजू शकते मी, असो. 

ध्यान धारणा, म्हणजे काही तरी नावीन्यपणा निश्चित धारण करायचाच असतो आणि तो म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करणं. उघड्या नेत्रांनी असे होणे नव्हेच. त्यामुळे अंतर्चक्षूंना आणि बाह्य पण तात्पुरते, प्रयत्नपूर्वक बंद करणे अत्यावश्यकच. किंबहुना सहजतेने ते घडतं सवयीने, सरावाने. डोळे बंद म्हणजे अंधारमय भासणारं जग. थोडं वयाने प्रगल्भ झाल्यावर पुन्हा एकदा ह्या तात्पुरत्या अंधाराचं महत्व किंचित लक्षात आलं. खेळात बाह्य पट्टीचा आधार घ्यावा लागत होता, येथे स्वतः बंद करून ठेवायचे होते, हा महत्वाचा फरक. 

सर्वत्र, जगभर, वेळोवेळी, संत, कृषी, मुनी, आधुनिक संत, श्रेष्ठ आणि इतर अनेक काही काळ डोळे बंद करण्याचे महत्व, फायदे, सर्वोत्कृत्ष्ट प्रभाव ई. सांगून हाताच्या बोटावर मोजण्याइतके जण त्याचा भक्तिभावाने वापर करतात, करतांना दिसतात. खूप पद्धतीने सांगून झाले तरी देखील प्रकाश पडत नाही म्हटल्यावर मग "त्याने" वेगळीच क्लुप्ती शोधून काढली, किंबहुना त्याला गवसली माणसांच्या असंख्य विचित्र सवयींमुळे. आधी फक्त ऋतूत बदल म्हटला कि साधारण सर्दी होत असे. बास. आणि ते देखील फक्त पावसाळा आणि हिवाळा बरं का मंडळी, जरा डोळे बंद करून भूतकाळात फेरफटका मारा, ध्यानात येईल.  आणि ती सर्दी काही कालावधी पूर्ती मर्यादित असायची. संपला विषय. मग आली उन्हाळ्याची पेशल खास अशी सर्दी, त्यानंतर उठसुठ सर्दी + त्याचे असंख्य / अगणित अस्थिर, अवघड, चंचल प्रकार. मी इतके व्यक्तिमत्व बघितले आहेत कि जे सर्दीविना नसतातच मुळी अर्थात त्याला एक खास प्रकारची प्रकृती असं संबोधलं जातं शारीरिक शास्त्रात. मला असा गोड गैरसमज होता कि असा अनुभव फक्त आणि फक्त मलाच येतोय, पण नाही हो, कितीतरी शेकडो लोकांना येतो, तो म्हणजे साधारण वाटणाऱ्या पण असाधारण असलेल्या नवीन सर्दी प्रकारात डोळे आपोआप बंद होतात. किंबहुना डोळे बंद झालेले जास्त सुखदायक, दिलासादायक, शांतीवर्धक वाटतात. "स्क्रीन हेच जीवन" झालेल्या माणसांनो डोळे बंद करा दररोज, काही काळ, ध्यान करा, श्वासाकडे लक्ष द्या, चिंतन-मनन-लेखन-गप्पा करा आणि जगा / जगू द्या. मुद्दाम / जबरदस्ती डोळे बंद होणे नको कृपया. पळा पण विसावा पण घ्या नक्की. नाही तर "आंधळी कोशिंबीर" ह्या खेळासारखं व्हायचं, कुठे जायचं / कसं जायचं हळू का जोरात? ठाऊक नाही, मुद्दाम दिशाभूल करणारे आढळतील, चाचपडायला लागेल सतत आणि ध्येय गाठलं जाईल ह्याची शाश्वती दिसणार नाही.   दोन नैसर्गिक टिकले नाहीत काही कारणास्तव, त्यामुळे दोन अनैसर्गिक लाभले, ह्या पुढे ६/८/१० अशक्य, ह्या नंतर शून्य. त्यामुळे जागे व्हा, आणि डोळ्यांना वेळोवेळी ठरवून विश्रांती द्याचं, स्मार्ट घड्याळ, तिथून सुटले रे सुटले कि मोबाईल, मग लॅपटॉप तदनंतर हे नाही तर ते, मागे पुढे चालूच अखंड. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...