हि साधारणतः २५ एक वर्षा पूर्वीची गोष्ट आहे. मी तो पर्यंत शाळेत, कॉलेज मधे आणि एक-दोन संस्थेमधे बॅडमिंटन आणि टेबल टेनिस एवढे दोनच खेळ खेळले होते. त्या पल्याड मला सगळं अनभीन्य होतं. महागडे खेळ तर माहित नाहीच, खिजगणतीत नव्हतेच अजिबातच. मैदानी खेळ खेळण्याकडेच लक्ष आणि कल होता माझा, माझ्या मैत्रिणीचा आणि त्या वेळा.
मुळात खेळाची आवड असल्यामुळे मला जेव्हा अतिमहागड्या आणि वेगळ्या धाटणीतल्या खेळांची ओळख झाली तेव्हा माझा आनंद गगनात मावला नाही. उत्साहाने येत नसतांना मी खेळायची तय्यारी केली, शिकायची तय्यारी ठेवली कारण फक्त एक बदल म्हणून, मस्त नवीन माहिती म्हणून आणि उपलब्द आहे म्हणून ते मी करणार होते. मी फक्त हे असे खेळांचे प्रकार चित्रपट बघितले होते. खेळ सुरु करण्याआधी त्या वेळी गूगल बाबा नव्हता त्यामुळे जे स्वतःला अती पारंगत समजत होते त्यांनी मी न विचारता भली मोठी नियमावली सांगायला सुरवात केली. ती नियमावली ऐकूनच मी दमले आणि जराशी घाबरले सुद्धा. नियमावली सांगून थकले नाहीत तर मी प्रत्येकवेळी खेळण्याचा प्रयत्न केला तरी त्याची काय करायचं नाही ह्याची यादी तय्यार असायची. मला तर बऱ्याचदा तो ओरडण्याचा सूर वाटायचा. असो. बिलियर्ड्स अक्का पूल हा खेळ एका मोठ्या टेबलावर मांडला आणि खेळला जातो. तो टेबल पराकोटीचा महाग असतो. त्या टेबलावर अगदी अलगद फक्त बोट टेकवायचं अधांतरी फक्त आणि काही क्षणा पुरतं, हाताचा भार द्यायचा नाही, नाजूक पद्धतीने एकंदरीत सगळं हाताळायचं. त्या टेबलावर पिटुकली जरी रेष ओढली गेली अनवधानाने तरी बॉल्स ची हालचाल व्हायला अडथळा येतो. छोटासा ओरखडा आला तर दुरुस्त करायला खूप पैसे खर्च होतात ई. यादी भली मोठी आहे सूचनांची. त्यामुळे मी खूपच शिस्तीत खेळले पण थोडसं लांब राहूनच.
त्याच बिलियर्ड्स किंवा पूल च्या कंपनीने इतक्या २५ वर्षांच्या कालावधीत जमीन-आस्माना एवढी प्रगती केलेली आढळली मला. कारण एवढ्यात काही महिने सलग मी असाच एक पूल टेबल बघते आहे दररोज. आणि माझा मला धक्का बसतो आहे प्रत्येक वेळी, कारण मला हे सगळे नियम सर्र्कन डोळ्यासमोर उभे राहतात. आताशा पूल टेबलवर लोक बसतांना दिसतं आहेत. तो टेबल उघडा वाघडा धूळखात पडला आहे. त्यावर ड्राइंग, पेंटिंग,कलरिंग सुरु असतं, हात काय पण सगळ्या वस्तू ठेवल्या जातात. थोडक्यात काय तर बाकी दुसऱ्या साधारण टेबल असल्यासारखं जणू. त्या उपर त्याची काही म्हणजे काही किंमत दिसत तरी नाही. मग नक्की काय खरं आहे, आधी सांगितली गेलेली कथा का मला जे डोळ्यासमोर दिसतंय ते?
भारतीय वातावरणानुसार, प्रदूषण, सवयी प्रमाणे त्या कंपनीने स्वस्त, मस्त, टिकावू असे टेबल तय्यार केले असणार हे निश्चित. असो. मला ऐकावे लागले तसे नियम कोणालाही ऐकण्याची गरज नाही, हे महत्वाचं.
प्रत्येकाने आपाआपल्यात असे बदल घडवून आणले तर? कित्ती मजबूत टिकावू गोष्टी घडतील नाही? सर्वच स्तरावर, वैयक्तिक, भौतिक, सामाजिक ई.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा