मंगळवार, ७ मार्च, २०२३

लई स्मार्ट पिढी (वेगळ्या अर्थाने)

हि जी सध्याची महाविद्यालयांची विद्यार्थी आहेत ते लई स्मार्ट आहेत. प्रचंड प्रमाणात त्यांना मल्टीटास्किंग मोठ्या शिताफीने करता येतं अगदी सातत्याने, न थकता, न दमता, कुठेही, कधीही ई. ते इतके मोठे आहेत, इतक्या मोठ्या लेवल चे स्मार्ट आहेत कि ज्याचं नाव ते. कधी, कुठे, किती वेळ, कुठले खेळणे वापरायचे हे त्यांना पुरते माहित आहेत. मग पुढे कोणीही उभं असू दे, कितीही मोठा व्यक्ती, कितीही यश संपादन केलेला तरी काही क्षणात ते डोकं खाली घालून काही तरी सुरु कारतातच. बास आणि त्यातचं स्वतःला धन्य मानतात. ते खेळणं कशासाठी आहे, कधी वापरण्यासाठी, त्याचा खरा उपयोग काय ई. काहीही घेणं देणं नाहीच. मनगटी घड्याळ, मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉप, आयपॅड, दोन स्क्रीनचा लॅपटॉप असे असंख्य खेळणे ते एकाच वेळी वापरतं असतात आणि शिवाय वर्गात, काही भाषण चालू असेल तर त्याकडे लक्ष आहे हे दर्शवतात. सर्वांना चार डोळे आहेत सद्य परिस्थितीत, त्यामुळे त्यांच्याकडे बघणाऱ्यांना ते नक्की काय बघत आहेत हे सहज दिसतं, त्यांच्या हालचालींकडे बघून सहज लक्षात येतं आणि आता सगळ्यात महत्वाचं. मी असं ऐकलं होतं, वाचलं होतं आणि अनुभवलं होतं बऱ्याचदा कि काही विनोद झाला, ऐकला तर हसू येतं, कोणी पडलं सायकल, गाडी वरून, किंवा खुर्ची वरून तर जोरात हसू आवरत नाही, एखादा जोक वाचून, कार्टून बघून आणि इतर कारणांनी च फक्त हसू येतं. उगाचच वर्गात, मिटींग मधे किंवा मोठया माणसांचे भाषण ऐकतांना किंवा कुठलेही काम करतांना खुद्कन हसू येणं क्षणभरापुरतं, कधी तरी क्वचित हे मान्य आहे, पण सातत्याने? हे कसं शक्य आहे? ह्याचा अर्थ ती व्यक्ती जे सातत्याने हसते आहे, ती मल्टीटास्किंगच करते आहे, अवेळी, जे सपशेल चुकीचं आहे. असं करण्यासाठी नसतो बसलेले आपण तेथे. क्षणभर स्वतःला भाषण करणाऱ्याच्या जागी ठेवून बघावं बरं? जर तुम्ही खूप वर्ष मेहेनत घेतली आहे, खूप तय्यारी करून काही सुचवता आहे, शिकवता आहे, नवीन संकल्पना मांडता आहे आणि समोरचा डोकं खाली घालून फक्त बसलेला नाही तर सतत हसतो आहे, ह्याचा अर्थ तो प्रोग्रॅम / कोड / शैक्षणिक काही बघून तर असा सतत हसणार नाही ना? आणि हसण्यासारखं जर डोळ्यासमोर नसेल किंवा ऐकू येत नसेल तर मात्र काही तरी नक्की मोठ्ठी गडबड आहे हे नक्की. वेडा म्हणू शकतो अश्यांना जे भाषणं / शिकवणं सुरु असतांना हसतोय. असा स्मार्टनेस काय कामाचा. जे पेराल ते उगवेल, त्यामुळे उद्या तुम्हाला अश्यांचा त्रास होणार नाही कश्यावरुन, किंवा प्रत्येक घटक वापरण्याची वेळ असते, काही ठराविक काळ असतो, कधीही नाहीच. जे भाषणं करत आहेत, तुम्हाला काही तरी नावीन्याने सांगण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी काही कमावलं आहे, मिळवलं आहे, उंची गाठली आहे, आता तुमची बारी, गेलेला क्षण कधीही परत येत नसतो, त्यामुळे स्मार्ट असाल तर खरंच स्मार्टनेस दाखवा, सिद्ध करा, आटोक्यात राहा, डोळे उघडे ठेऊन वागा आणि आदर द्याल तर घ्याल / मिळवलं नंतर.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...