शनिवार, २३ मार्च, २०२४

चाळीशी


माझ्या लहानपणी पासून मी एक निरीक्षण केले होते आणि तेव्हा असे बोलले जायचे, किंबहुना हि वस्तू स्थिती होती कि चष्मा म्हणजे चाळीशी. एखाद्याला चष्मा आहे म्हणजे तो किंवा ती चाळीशीच्या आसपास आहे. "अलीबाबा आणि चाळिशीतले चोर" नावाचा नवा चित्रपट येऊ घातला आहे. त्या निमित्याने सर्व कलाकारांशी चर्चा झाली. मी ती बघितली, ऐकली, एक प्रश्न त्या कलाकारांना विचारण्यात आला, कि "चाळीशी म्हणजे काय?". तर उत्तर असे होते कि "कोणाही बद्दलचे गैर समज दूर झाले", "हा माझ्याशी असंच का वागला असेल, मग मी पण त्याचाशी तसेच वागणार ई." निघून गेले. असेल काही समस्या म्हणून असे बोलला किंवा वागला असेल अशी समजूत आपोआप निर्माण झाली = चाळीशी. हे प्रत्येकाने काबुल केले. कोणाच्या अध्यात मध्यात न पडणे, किंवा पडण्याचा मोह न होणे = चाळीशी. असे अनेक किस्से, अनुभव आणि घटना सांगितल्या गेल्या. 


आत्ता किंबहुना गेले काही वर्षे मात्र हि परिभाषा बदलली आहे. चष्मा म्हणजे चाळीशी असं समीकरण राहिलेले नाही. आताशा अगदी लहान वयात चार डोळे होतात, दोनाचे. ह्या मागची कारणे अनेक आहेत, वाढलेला  स्क्रीन टाइम, जीवनसत्त्वांची कमतरता, प्रदूषण आणि बरीच इतर. मला आज नवीन एक कारण सापडले आहे. ते असे. प्रत्येक वयात, ठिकठिकाणी इतकी चढाओढ निर्माण झाली आहे, बऱ्याच जबाबदाऱ्या वाढल्या आहेत, खूप स्थरावर कामे करायची आहेत, बाहेर देशात नोकरी / शिक्षण किंवा फिरायला जायचे आहे, पैसे ढिगाने मिळवायचे आहेत ई. मुळे मग जीवाचे रान करावे लागत आहे. अशात कशाला कोणाच्या अध्यात मध्यात पडायचे, आपले काम बरे आणि आपण बरे, नाही का? काल आपण कसे होतो आणि आज त्यात प्रगती आहे का हे बघितले तरी बास. म्हणजे पैशांची प्रगती नाही तर तब्बेतीची, स्वास्थ्याची, शिकण्याची आणि माणूस म्हणून घडण्याची. प्रगती पथावर गाडी असायलाच हवी ते दर्शवण्यासाठी हा चष्मा स्थानापन्न झाला आहे आपल्याकडे जरा लवकर मंडळी. त्या दोन जास्तीच्या डोळ्यांनी आधी स्व मग बाकीचे, खार तर नकोच बाकीचे, असं पवित्रा घ्या आणि बदल अनुभवा. त्याचा अर्थ बाकीच्यांची काळजी घ्यायची नाही असे नाही. तर समतोल साधायचा, अती नको. तुलना नकोच, दुसऱ्यांच्या मार्गात अडथळा नको, अती नको ते विचार नकोत, आणि अर्थात स्व कडे लक्ष केंद्रित हवे. 

प्रत्येकाला आताशा गेली १५ एक वर्षे मोठे व्हायची फार घाई झाली आहे. लवकर मोठं व्हायचं, सगळं अनुभवायचं असं झालायं. घ्या मग आता? ४०शी पण जवळ लवकर पुढ्यात उभी ठाकली आहे, चष्म्याच्या रूपात. आणि जर इतक्या लवकर चार डोळे लाभलेच आहेत तर मग तसेच वागा देखील ना, नेहेमीच.  वागायचं  नाही, तर ऐकायचं, बोलायचं, अनुभवायचं, मिरवायचं, ई. सगळ्याच कृती हो.  कधी असे आणि कधी तसे हे कसे चालणार? एक ठरवा आणि पुढे मार्गस्थ व्हा. 

४० म्हणजे नवीन ६० अशी मी एक जाहिरात बघितली इतक्यात. खूप तथ्य वाटले मला त्यात. 

चला तर मग, आजपासून प्रत्येक दिवस चार डोळ्यांसोबत अत्यानंदाने साजरा करू यात जसा कि एक सण. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...