काही दिवसांपूर्वी आम्ही सगळे एका रेस्टॉरंट मध्ये गेलो होतो, तेथे टिपलेला हा छोटेखानी प्रसंग. एक चौकोनी कुटुंब आले होते, २ एक वर्षांचा मुलगा, आई बाबा आणि अगदीच साधारणतः एक-दीड महिन्याचे पिल्लू, प्रचंड गार वातावरणात दोन तास, कोरी कोवळी बाळंतीण, अगदी शांत पणे यथेच्छ दोघांचं जेवण सुरु होतं. एका मागोमाग एक असे अनेक पदार्थांची रेलचेल. मोठ्या मुलाला स्टॅण्डवर मोबाईल लावून दिला होता, तो त्याला जमेल तसे अर्धे पोटात आणि बाकी जमिनीला भरवत वेळ घालवत होता. माझ्या चार डोळ्यांनी दिसले सहज म्हणून आश्चर्य वाटले. काय हे? आणि कशासाठी? गरज आहे का? बरं ते तिथलं खाणं हे मंगोलियन / चायनीज अश्या पद्धतीचं होतं जे सुधृढ माणसाला जरासं वेगळंच पचायला. जड म्हणायला हरकत नाही, वेगळ्या धाटणीतले मसाले, उग्र आणि आपल्या सारख्या भारतीयांना गरज नसलेले असे. मी फक्त सर्वांसोबत हजेरी लावली होती, घरी पोटभर व्यवस्थित जेवून गेले होते, त्या हि मुळे असेल कदाचित जास्त वेळ होता आजूबाजूला काय घडामोडी होतं आहेत हे टिपायला. मान पण धरली नव्हती त्या कोवळ्या पिल्लाची आणि ते अश्या ठिकाणी आले होते. चव बदल म्हणून आले असते तर एखाद वेळा अगदी ०.०००००००१ टक्के मी समजले असते जर ते काही तरी तोंडात टाकून झटदिशी निघून गेले असते. पण नाही हो. आणि असं कधीही घडायला नको पण जर समस्या उद्भवल्या दोघांना (बाळंतीण आणि बाळाला) तर डॉक्टर दोषी. मुळात काय काय चुकलं किंवा काय टाळणं आवश्यक होतं हे लक्षात येणं अतिशय अवघड. एकदा झालेला बिघाड मग ठीक करायचं का टाळायचं हे सांगणे नको. कशाला पैसे देऊन बाहेरचं खाऊन व्याधींना आमंत्रण द्यायचं? माझ्या समजण्याच्या पल्याड आहे हे सगळं. नवीन बाळ म्हणजे फार मोठी जबाबदारी. आईच्या शरीरात प्रचंड झालेले बदल. ह्यात स्थिरता यायला वेळ द्या. घरचं साजूक, ताज सेवन करा, काही महिने जबाबदारीने नियम पाळणे अत्यावश्यक आहे, सर्वांच्या स्वास्थ्यासाठी. मग ते पिल्लू कधीही जन्माला येऊ, आमच्या किंवा आताच्या जमान्यात. "प्रिव्हेन्शन इज बेटर द्यान क्युअर" हे ध्यानात असू द्या. आपल्या भारतीय संस्कृतीत तर गरम शेक दोनदा / एकदा तरी दिवसातून बाळ बाळंतिणीला ह्याला महत्व आहे. शिवाय व्यवस्थित कान, मान झाकून ठेवणं, कमीतकमी ३ महिने घरच्या वातावरणात राहून दोघांना जंतू संसर्गापासून काळजी पूर्वक वाचवणं, बाहेरच्या वातावरण आणि इतरांच्या संपर्कात न येऊ देणं ह्याला अनन्य साधारण महत्व आहे. आणि ह्या सर्वांना एक वैज्ञानिंक पाया देखील आहेच. मग हि शिकलेली हुशार माणसे असं का वागतात आणि खेळतात तब्बेतीशी? आम्ही त्या ठिकाणी जायच्या आधी ते वैविध्य पदार्थांचा आस्वाद घेत होते. आम्ही बाहेर पडलो तरी ते तेथेच होते. माझ्यामते ठराविक आहार, मोजक्या प्रमाणात खाणे योग्य अश्या वेळी. सर्व दृष्टीनेच "अति तेथे माती". टाळा हो. ते पिल्लू तर काहीच बोलू शकत नाही, थंडी वाजली तरी काहीच सांगू शकत नाही. इतक्या लहान वयापासून त्याला मजबूत घडवण्याची काहीही गरज नाही आणि ते साधणार पण नाहीच. खूप वाईट वाटलं मला, काहीच करता आलं नाही, हा फक्त पंक्ती प्रपंच काय तो. हे वाचून काही जण ह्या पुढे जागे झाले तरी पावलं. "अश्या घटना घडती आणि स्मृती देऊनी जाती".
गुरुवार, १४ मार्च, २०२४
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
2459: Freshly Ground Nostalgia
The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...
-
मी अनेक वर्षे एकाच संस्थेमध्ये कार्यरत होते. अखेरीस, मला एका नवीन इंजिनिअरिंग महाविद्यालयाची सुरुवात करण्यामध्ये हातभार लावण्याची सुवर्णसंधी...
-
माझ्या मुलाने भारतातील सर्वात आव्हानात्मक अभ्यासक्रम निवडल्यापासून, मला विद्यार्थ्यांसमोरील अडचणींची जाणीव झाली. मला खात्री आहे की अशा अडचणी...
-
परवा एक फोन आला. लहानपणापासून ओळख असलेली व्यक्ती. घरच्यांसारखीच. गप्पा सुरू झाल्या. बोलता बोलता त्यांनी अचानक विचारलं: “अजूनही लेक्चररच आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा