वर बघून चला किंवा जास्तीत जास्त सरळ बघा. गाडीवर किंवा गाडीत बसला असाल तर देखील वर बघणे सहज शक्य आहे जर चालवत नसाल तर. वैविध्य मंदिरांचे कळस, गगनचुंबी इमारती, आकाशातील नयनरम्य रांगोळी, झाडं, पानांचे रंग, फुले आणि असे बरेच काही. रांगोळ्या, झाडं, फुलं असे नैसर्गिक सौंदर्य तर सातत्याने बदलतं राहतं आणि डोळ्यांचे पारणे फेडते. कित्ती करावं त्या निसर्गाने आपल्यासाठी हो. बघा तर, त्या मोबाईल नामक अवयवात सतत डोळे घालून बसण्यापेक्षा. एकदा चाखून तर बघा म्हणजे रस निर्माण होईल आपोआप. आणखीन एक महत्वाचे कारण आहे. २०२४ ह्या वर्षी सुद्धा ते लागू आहे हे बघून मला आश्चर्याचा धक्काच बसला आणि ते देखील पुण्यासारख्या शहरात. खाली मान घालून गेले कि नको ते दृष्टीस पडतं. त्यामुळे समतोल साधा. मी आधी म्हटल्या प्रमाणे गाडीवर किंवा गाडीत असाल तर वर बघणे जास्त योग्य. कारण रस्त्यावर टाकलेली घाण, कचरा आणि उतारे दृष्टीस पडतं नाहीत आणि त्यामुळे मानसिक त्रास होत नाही. हे सगळे रस्त्यावर अतिउच्च शिक्षित, उच्च विद्याविभूषित आणि भल्यामोठ्या हुद्द्यावर कामं करणाऱ्यांनीच टाकले असणार. क्या बात है? सलाम त्या मंडळींना आणि त्यांच्या विचारांना. बघा वर बघणं जमलं तर, पाळा.
पायी व्यायाम म्हणून फिरायचे असल्यास जवळपासच्या मैदानात जा, बागेत जा, सोसायटीत चकरा मारा पण हि असली नको ती दृश्य बघत वाहतुकीच्या रस्त्यावर नकोच. टाळा ते.
आता ह्या उपर कुठलाच उतारा ह्या समस्येचा मला तरी आढळला नाहीच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा