माझ्या मोठ्या जावेची एक गोष्ट कथन करते. प्रत्येक मुलीचे असते तसे हिचे देखील मी सहज मनात मोजले कि किती घरात वावर झाला आणि मस्त वाटलं. बहुतांशी सगळ्याच आपण ह्या ना त्या कारणांनी बऱ्याच घरात राहतो लहानपणी पासून. आधी तर वडिलांची बदलीची नोकरी असायची त्यामुळे ठराविक वेळेनंतर वेगळ्या ठिकाणी राहणे अत्यावश्यक असायचेच. कोणालाच चुकले नाही ते. जेव्हा कोणीही नवीन जागी वास्तव्याला जातात तेव्हा कोणाला चुकल्या सारखे वाटते, कोणाला किंचीत कंटाळा पण येतो, का येथे आलो? हा विचार क्षणभरापेक्षा कमी कालावधीसाठी मनाला शिवून जातो, शेजार कसा मिळेल, बाई कधी रुळेल, नवीन ठिकाणी बस्तान बसेल ना, असे एक ना अनेक प्रश्नचिन्ह सतावतात. अहो माती, वर, पाणी बदल झाला कि पशु पाखी, झाडं वेळी, फुलं, प्राणी सगळेच किंचित सामावून घ्यायला वेळ घेतातच.
माझ्या मते, हा कालावधी फार अप्रतिम असतो, किंवा तसा घ्यावा सर्वांनी. कारण ह्या वेळी नवीन घर लावणे हे जास्त महत्वाचे असते. त्यात मग फक्त घरच्या खोल्या नाही तर जवळपासचे भाजी मंडई, किराणा वाले, छोटी मोठी दुकाने, वैद्य / आरोग्य विशेषज्ञ, बाकी कमी येणारी मंडळी कुठे स्थित आहेत, त्यांचे भाव, स्वभाव कसे आहेत, घरी कामं करणाऱ्या नवीन बायका ई. सगळेच आले. स्वतःचे घर घेतले असेल तर वस्तू पूजा यथासांग मनोभावे केली असते, भाड्याचे असेल तर छोटेखानी सत्यनारायण किंवा अशीच कलश पूजा करून प्रवेश केला असतो. त्यामुळे तो वास्तुपुरुष, किंवा ती वास्तुदेवता सुद्धा तुम्हाला सर्वांची / योग्य व्यक्तींची भेट घडवून आण्यात मोठे योगदान करत असते अदृश्य स्वरूपात. ती बस्तान बसण्याचा अवधीत मनःशांती आणि समाधान टिकवून ठेवण्यासाठी पण वातावरण निर्मिती करत असते, खुणावत असते, विविध्य स्वरूपात. ते फक्त ध्यान देऊन टीप आणि तसे वागा. नक्कीच सफलता सहज आणि पट्टाकिनी तुमच्या पदरात पडेल ह्यात काही शंकाच नाही.
आणि हेच नवीन गाडी, साडी, कचेरी, प्रत्येक ठिकाणी आपसूक होईल. भरभरून आशीर्वाद सदोदित आपल्या पाठीशी असतातच. त्यामुळे निसंकोच आनंद घ्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा