गुरुवार, ७ मार्च, २०२४

मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण...


अनेक जाहीरांतींमध्ये एक पेव फुटलेले दिसतंय आज काल. आणि ते म्हणजे "हिरवा चहा प्या आणि तो पोटाचा घेर कमी करा हमखास". कुठल्याही रंगांचे पेय प्या पण घेर कमी होईलच असे नाही. असा चहा प्यायला कि घेर कमी झाला असता तर मग काय हवं होतं. बाकी अजून दिग्गज मंडळी जे व्यायाम, जिम वगैरे करतात ते मग अजून काही सुचवतात. माझ्या मते आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून बघितलं तर, व्यायाम, आहार, असले रंगीबेरंगी चहा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे चिडचिड ला हद्दपार केले तरच फक्त पोटाचा घेर नाही तर अजून बरेच काही निश्चित सध्या होईल. ज्या आपल्या माणसांबद्दल चिडणे होते, किंवा ज्या वेळी चिडायला होते ते हळूहळू बंद करा. प्रत्येक जण आपले मार्ग वापरू शकतो शांत होण्याचे. एक ठोकताळा इलाज नाही त्यावर. पण ह्याचा परिणाम नक्की, एकदा करून बघायला काय हरकत आहे. कदाचित ह्याच करता आपल्या सर्वांना शाळेत असतांना Active and Passive Voice - कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग शिकवले होते. ते विस्मरणात गेले आहेत ते वापरायला लागा आणि बघा मग कसे भन्नाट बदल अनुभवता येतील ते. कुठलीही सिद्धी प्राप्त होण्यासाठी मन प्रसन्न हवेच. आणि प्रसन्न मन हे शांत डोक्यामुळे सध्या होणार. त्यामुळे आत्तापासूनच स्वतःच्या स्वास्थ्यासाठी (शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक, सामाजिक, आणि इतर) राग शब्दकोशातून समूळ नष्ट कराच पट्टाकिनी. स्वतःचे लक्ष इतरत्र वेधून बघा, खूप कामात गुंतवा, काम आनंदाने पार पद, थोडासा उशीर झाला काम संपवायला तरी हरकत नाही, आप्स्वकिय म्हणजे पंचिंग बॅग नाही हे विसरू नका, राग आला तर त्या व्यक्ती ची चांगली बाजू आठवा किंवा अजून काही करा पण बाहेर पद. एकदा सवय कराच, न रागावता पण जगात येत सहज हे लक्षात येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...