काल मी "कौन बनेगा करोडपती" चा एक भाग बघण्यात मग्न होते, त्याचा पुरेपूर आनंद उपभोगत होते. ती खेळाडू हिमाचल प्रदेशातून आली होती. तिच्या AV मध्ये म्हणते कशी कि पहाड / डोंगर तिच्या हिमाचल प्रदेशातले बर्फ असो नाहीतर भरपूर पाऊस किंवा कुठलेही वातावरण नेहेमीच ताड माड उभे राहतात नेहेमीच, कधीच तक्रार नाहीच.
इतक्यात आमच्या पुण्यात सगळीकडे रस्त्यांचे सुशोभी करण सुरु आहे. त्यात भर वाहतुकीच्या रस्त्याच्या कडेला अप्रतिम रंग संगतीचे फुलांची झाडे लावली आहे. आणि ती ज्या दिमाखात बहरलेली आहेत, ज्याचं नाव ते, भन्नाट अशी. इतकी धूळ, प्रचंड ऊन, सततची रहदारी, वाहने, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण पण ते त्यांचा स्थायी भाव काही सोडत नाहीत, खूप म्हणजे खूप फुले फुलवून येणा जाणाऱ्यांना आनंद मुक्तहस्ते वाटतात. अहाहा च. "काय वर्णू तव गूण....". नाहीतर अतिहुशार माणसे, अगदी छोट्या छोट्या कारणाने रुसून फुगून बसतात, उणेदुणे काढतात, तक्रारी तर विचारू नकाच. माणसांनी ह्या डोंगरा एवढं मोठ्ठं व्हावं आणि फुलांसारखे रंग उधळावे, म्हणजे दुसऱ्यांसाठी नेहेमी उदाहरण म्हणून कार्यरत राहिल्यामुळे मग तक्रारींना वाव मिळत नाही, वेळ नसतो काही निरूपयोगी करण्यासाठी. चला तर मग झाडांचे / वृक्षांचे, फळ आणि फुल झाडांचे (रस्त्यावर भरलेले खास करून), डोंगर दर्यांचे आणि इतर सगळ्यांचे काही गूण अंगिकारुयात हळूहळू आणि आपले एक मस्त व्यक्तिमत्व घडवू यात, उभे करू या. म्हणजे मग तुमच्याकडून इतरांना प्रेरणा मिळेल भरभरून अशी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा