उपवास करावा तर माझ्या आईनेच. दोन प्रकार मी तिचे बघितले आहेत. एक म्हणजे त्या वेळी सर्व प्रवास बहुतांशी रेल्वे नी होत असे. तेव्हा ती आदल्या दिवशीपासून काहीही खात पीत नसे. आणि संपूर्ण प्रवासात पण नाहीच. इतके नियंत्रण स्वतःवर म्हणजे मला त्यावेळी खरंच कमाल वाटायची.
सणवार असले, मोठी एकादशी, महाशिवरात्री, वटसावित्री ई. दिवशी ती सर्वांसाठी उपवासाचे पदार्थ तर करत होतीच, शिवाय जर गरज पडली तर साधा स्वयंपाक पण होत असे. एवढं करून देखील ती अगदी शास्त्र म्हणून फळ, ताक, लिंबू सरबत, भाजलेले रताळे किंवा खजूर-तूप असे काही तरी सेवन करत होती. "एकादशी दुप्पट खाशी" असं तिने कधीच म्हणजे कधीच केले नाहीच. काय करण होते माहित नाही, पण ती उपवासाच्या दिवशी औषध पण घेत नसे. तिची काय श्रद्धा होती, किंवा काय विश्वास होता ते तिचं तिलाच ठाऊक.
तेव्हा पासून नकळत म्हणायला हरकत नाही पण ती दीक्षित पळत होती, किंवा पाळलं जायचं तिच्या कडून. तिची साग्रसंगीत पूजा झाल्याशिवाय ती काहीही खात नसे दररोज. दोन वेळा चहा, सुकामेवा, फळं आणि दोन वेळा साधं घरचं ठराविक प्रमाणातच, अधाश्यासारखं कधीच नाही. लग्न समारंभात देखील लग्न लागल्यावर दिलेला पेढा. बास. तिचे असे अनेक उपवास प्रकार होते. डायट म्हणून नाहीच पण तिची एक शिस्त होती. तशीच आपण देखील पाळूयात. घरचे ते सेवन करू या, आपल्या शरीराचे ऐकुया आणि स्वस्थ राहू यात. चला तर मग.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा