गुरुवार, ११ एप्रिल, २०२४

आंब्याची पाने आणि गर्भधारणा


प्रत्येक शुभ प्रसंगाच्या वेळी भारतात दारावर आंब्याचे तोरण लावायची पद्धत आणि रीत आहे. ह्या शिवाय आंब्याच्या डहाळ्या पण देवघरावर, दारावर, गुढीसोबत लावतात, आणि आंब्याची पाने कलशाचा महत्वाचा भाग असतो. पूजा झाली, तो दिवस सरळ कि दुसऱ्या दिवशी "पुनरा गमना यच" असं म्हणून अक्षता वाहायच्या आणि मग ती आंब्यांची पाने निर्माल्य होतात. आताशा विहिरी नाहीत घरोघरी, नदीत टाकायचे नाही, प्रत्येकाच्या घरी कचरा गिरवयाची सोय नसते त्यामुळे कित्येकदा ते पायाशी, कचऱ्यात टाकले जातात. त्या दिवशीपुरतं महत्व त्याच, बास. 


अगदी तसेच आहे माझ्या पाहण्यात, अनेक कुटुंबात, अर्थात अपवाद असतात प्रत्येक वेळी पण फारच थोडके, हाताच्या बोटावर मोजण्या इतके पण नाही. गर्भधारणेच्या काळात जे काही ७-८ महिने असतात त्या पुरते होणाऱ्या आईचे लाड, किंवा काळजी म्हणता येईल, जसे बाळ झाले तसे बाळालाच फक्त महत्व.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...