एक फारच भन्नाट हिंदी चित्रपट तय्यार केला आहे आणि तो मस्त चालला, त्याच शीर्षक आहे "अतिथी तुम कब जाओगे". मस्त हलकाफुलका मजेदार चित्रपट आहे तो. "असे पाहुणे येति आणिक स्मृती ठेवुनी जाती". हि एक फारच प्रसिद्ध म्हण आहे. प्रसिद्ध ह्या करता कि ह्या शब्दातून खूप काही शिकण्यासारखे आहे. पाहुणा कसा हवा हे चपराक पद्धतीने मांडलाय येथे. ज्याने कोणी हि म्हण लिहिली त्यांना साष्टांग नमन. आपल्या घरी पाहुणे आले तर, किंवा आपण कोणाकडे पाहुणे म्हणून गेलो तर कसे वागावे हे नमूद केले आहे. कोणच्या घरीच कशाला घरी, दारी कुठेही गेलात तरी आदर्श वागच. त्या व्यक्तीने पुन्हा पुन्हा यावे असे वाटले पाहिजे, सर्व कृती अश्या च असायला हव्यात. सामाजिक, आर्थिक, पारमार्थिक, वैयक्तिक भान ठेवायलाच पाहिजे. हाः, जर एखादा केमिकल लोचा झाला आहे, विस्मृतीच्या त्रास आहे, रुग्ण आहे तर वेगळी गोष्ट. पण जर सगळे आलबेल आहे तर मात्र माणसाने माणसाशी माणसा सारखे वागणे अत्यावश्यकच. आदर कमवावा लागतो, आणि तो टिकवण्यासाठी पण अथक मेहेनत आणि प्रयन्त करावेच लागतात. फक्त वय वाढलं म्हणजे सगळ्यांनी जबरदस्ती आदर द्यायचाच हे कुठे लिहिले आहे?
"अतिथी देवो भव" अगदी देवासारखे वागणे अपेक्षित आहे. अतिथीच्या वागण्यातून बोध घेता आला पाहिजे सर्वांनाच. एक उदाहरण म्हणून राहिले पाहिजे आणि ते देखील अगदी थोडे दिवस. कंटाळा येईल इतके दिवस किंवा महिनोन महिने नाहीच.
प्रत्येक अतिथी देव असतो का? तर मुळीच नाही. एखादा लाखातून देवासारखा असतो. इंजिनीरिंग भाषेत एक बेल कर्व असतो. घंटेच्या आकाराचा ग्राफ, त्यात दोन टोक असतात, त्यात अत्यंत कमी जनता असते. इथे पण अगदी तसेच आहे. देवत्व येण्याकरता तपश्चर्या लागते हो, आणि ती अत्याधुनिक, अध्यात्मिक आणि धार्मिक पद्धतीची हवी. नाते संबंध टिकवावे लागतात देवाला सुद्धा. त्यामुळे माणसात राहून देवत्व हे फार दुर्गम आहे. आणि येणाऱ्याने एक काही तरी निश्चित करावे, ते पाहुणे म्हणून आलेत का घरचे म्हणून? आणि तसे वागणे, बोलणे, चालणे ठेवावे.
दांभिक मुलाम्याचें सोनें । त्याला सांगा काय घेणें ।
गृहिणी म्हणून ठेवणें । काय कसबीण सदनांत ? ॥८५॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा